शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा गाडी सगळीकडे दुर्गंधी सोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:43 IST

गाड्यांचा अजब प्रकार : इडीटी पावडरचा तुटवडा असल्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता

नालासोपारा : वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुविधा मिळणार आणि शहरांचा विकास होईल असे गाजर नागरिकांना दाखवून राजकारण्यांनी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करून वसई विरार शहर महानगरपालिका ३ जुलै २००९ रोजी उदयास आली. दहा वर्षे मनपा उदयाला येऊन सुद्धा नागरिकांना मूलभूत सुविधा, आरोग्य , पाणी, रस्ते यापासून वंचीत आहे. सोयीसुविधांसाठी करोडचे बजेट मनपा पास करते पण लोकांच्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष करत आहे यांचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. मनपाच्या कचऱ्याच्या गाड्या कशा दुर्गंधी पसरवत आहे व कसे रोगराईला आमंत्रण देत आहे ही बाब उघड झाली आहे.

नालासोपारा शहरात सुमारे १० ते १५ लाख लोकसंख्या आहे. पूर्वेकडे आणि पच्छिमेकडील कचरा गोळा करण्यासाठी मनपाच्या लहान मोठ्या मिळून ५० च्या वर गाड्या आहे. पण ज्या विभागात या गाड्या कचरा गोळा करण्यास जातात त्याठिकाणी घाण वास आणि घाण पाणी रस्त्यावर पडले जाते. कचरा उचलून झाल्यावर त्याठिकाणी इिडटी पावडर मारावे लागते पण इटीडी पावडरचा तुटवडा असल्यामुळे सफाई कर्मचारी रोगराई किंवा दुर्गंधी पसरू नये म्हणून पावडर मारत नाही. रस्त्यावरून येणाºया जाणाºया लोकांना अक्षरशा नाक धरून जावे लागते आहे.

इटीडीचा तुटवडानालासोपारा शहराची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. प्रत्येक विभागात कचºयाच्या गाड्या कचरा गोळा करण्यासाठी जातात पण कचरा उचलून झाल्यावर इिडटी पावडर रोगराई, दुर्गंधी आणि घाण पसरू नये म्हणून मारावी लागते. पण इतकी लोकसंख्या असतानाही अगदी थोड्या फार प्रमाणात पावडर स्वच्छता विभागात असते. तुटपुंज्या पावडरने नालासोपारा नागरिकांचे आरोग्याकडे काय लक्ष देणार.

सफाई कर्मचाऱ्यांच्या साहित्याचीही कमतरतामहानगरपालिकेच्या कचरा गाड्यांवरील कर्मचाºयांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून पायात गंबूट, हातामध्ये हातमोजे, नाकाचे मास्क अश्या अनेक वस्तूंची सोय करून देणे गरजेचे होते पण या साहित्यांची कमतरता असल्याने त्यांच्या आरोग्याशीही महापालिका प्रशासन खेळत आहे.

कचºयाच्या गाड्यांसोबत इिडटी पावडर मारण्यासाठी तुटवडा असल्यामुळे देत नाही. कमी पुरवठा होत असल्यामुळे सफाई कर्मचारी इिडटी पावडर मारू शकत नाही. ५० च्या वर कचºयाच्या गाड्या असल्यामुळे कोणाकोणाला इडीटी पावडर देणार. - सिताराम तारमाळे,स्वच्छता निरीक्षक, नालासोपारा

दुर्घधी आणि वास याव्यतिरिक्त घाण पसरू नये म्हणून उपाययोजना करायला सांगणार. कचºयाच्या गाडीने घाण उचलल्यावर त्याठिकाणी वास पसरू नये म्हणून इिडटी पावडर मारणे आवश्यक आहे. कचरा उचलल्यावर इिडटी पावडर सफाई कर्मचारी का मारत नाही आणि किती इिडटी पावडर स्वच्छता विभागात आहे याची माहिती घेऊन उपाययोजना करणार. - बळीराम पवार, आयुक्त,वसई विरार महानगरपालिका

मोठे मोठे गाजर दाखवून मनपा आल्यावर सुविधा मिळणार असे सांगितले पण प्रत्यक्षात उलटेच अनुभवायला मिळत आहे. गेल्या मिहन्यापासून मनपाचे पाणी लोकांना मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. आता या कचºयाच्या गाड्या कचरा उचलल्यावर दुर्गंधी आणि घाण वास पसरू नये म्हणून काही उपाययोजना करत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी मनपा जीवघेणा खेळ खेळत आहे. - हेमंत रोखीत, संतप्त नागरिक