शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कचरा गाडी सगळीकडे दुर्गंधी सोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:43 IST

गाड्यांचा अजब प्रकार : इडीटी पावडरचा तुटवडा असल्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता

नालासोपारा : वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुविधा मिळणार आणि शहरांचा विकास होईल असे गाजर नागरिकांना दाखवून राजकारण्यांनी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करून वसई विरार शहर महानगरपालिका ३ जुलै २००९ रोजी उदयास आली. दहा वर्षे मनपा उदयाला येऊन सुद्धा नागरिकांना मूलभूत सुविधा, आरोग्य , पाणी, रस्ते यापासून वंचीत आहे. सोयीसुविधांसाठी करोडचे बजेट मनपा पास करते पण लोकांच्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष करत आहे यांचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. मनपाच्या कचऱ्याच्या गाड्या कशा दुर्गंधी पसरवत आहे व कसे रोगराईला आमंत्रण देत आहे ही बाब उघड झाली आहे.

नालासोपारा शहरात सुमारे १० ते १५ लाख लोकसंख्या आहे. पूर्वेकडे आणि पच्छिमेकडील कचरा गोळा करण्यासाठी मनपाच्या लहान मोठ्या मिळून ५० च्या वर गाड्या आहे. पण ज्या विभागात या गाड्या कचरा गोळा करण्यास जातात त्याठिकाणी घाण वास आणि घाण पाणी रस्त्यावर पडले जाते. कचरा उचलून झाल्यावर त्याठिकाणी इिडटी पावडर मारावे लागते पण इटीडी पावडरचा तुटवडा असल्यामुळे सफाई कर्मचारी रोगराई किंवा दुर्गंधी पसरू नये म्हणून पावडर मारत नाही. रस्त्यावरून येणाºया जाणाºया लोकांना अक्षरशा नाक धरून जावे लागते आहे.

इटीडीचा तुटवडानालासोपारा शहराची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. प्रत्येक विभागात कचºयाच्या गाड्या कचरा गोळा करण्यासाठी जातात पण कचरा उचलून झाल्यावर इिडटी पावडर रोगराई, दुर्गंधी आणि घाण पसरू नये म्हणून मारावी लागते. पण इतकी लोकसंख्या असतानाही अगदी थोड्या फार प्रमाणात पावडर स्वच्छता विभागात असते. तुटपुंज्या पावडरने नालासोपारा नागरिकांचे आरोग्याकडे काय लक्ष देणार.

सफाई कर्मचाऱ्यांच्या साहित्याचीही कमतरतामहानगरपालिकेच्या कचरा गाड्यांवरील कर्मचाºयांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून पायात गंबूट, हातामध्ये हातमोजे, नाकाचे मास्क अश्या अनेक वस्तूंची सोय करून देणे गरजेचे होते पण या साहित्यांची कमतरता असल्याने त्यांच्या आरोग्याशीही महापालिका प्रशासन खेळत आहे.

कचºयाच्या गाड्यांसोबत इिडटी पावडर मारण्यासाठी तुटवडा असल्यामुळे देत नाही. कमी पुरवठा होत असल्यामुळे सफाई कर्मचारी इिडटी पावडर मारू शकत नाही. ५० च्या वर कचºयाच्या गाड्या असल्यामुळे कोणाकोणाला इडीटी पावडर देणार. - सिताराम तारमाळे,स्वच्छता निरीक्षक, नालासोपारा

दुर्घधी आणि वास याव्यतिरिक्त घाण पसरू नये म्हणून उपाययोजना करायला सांगणार. कचºयाच्या गाडीने घाण उचलल्यावर त्याठिकाणी वास पसरू नये म्हणून इिडटी पावडर मारणे आवश्यक आहे. कचरा उचलल्यावर इिडटी पावडर सफाई कर्मचारी का मारत नाही आणि किती इिडटी पावडर स्वच्छता विभागात आहे याची माहिती घेऊन उपाययोजना करणार. - बळीराम पवार, आयुक्त,वसई विरार महानगरपालिका

मोठे मोठे गाजर दाखवून मनपा आल्यावर सुविधा मिळणार असे सांगितले पण प्रत्यक्षात उलटेच अनुभवायला मिळत आहे. गेल्या मिहन्यापासून मनपाचे पाणी लोकांना मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. आता या कचºयाच्या गाड्या कचरा उचलल्यावर दुर्गंधी आणि घाण वास पसरू नये म्हणून काही उपाययोजना करत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी मनपा जीवघेणा खेळ खेळत आहे. - हेमंत रोखीत, संतप्त नागरिक