शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नामांकित शाळांच्या विरोधात डहाणूत पालकांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:13 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत जानेवारी महिन्यात पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणा-या श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीला आजारपणातून घरी आणल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.

- शौकत शेखडहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत जानेवारी महिन्यात पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणा-या श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीला आजारपणातून घरी आणल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. तर गंजाड मणीपुर येथील राकेश रामा भावर या ९ वर्र्षांच्या आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पालकांनी निषेध मोर्चा काढुन निदर्शने केली.या शाळा व्यावस्थापन आणि शाळांवर कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने शासनाला जाब विचारण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकल्प अधिकाºयांना आदिवासी संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले.डहाणू, तलासरी, पालघर, वसई या तालुक्यातील गरजु व हुशार विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाकडून दरवर्षी दर्जेदार इंग्रजी शिक्षणासाठी सातारा, महाबळेश्वर, पुणे, नाशिक, जुन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणाºया नामांकित इंग्लिश मीडियम शाळेत पाठवले जाते.मात्र, चांगल्या शिक्षणासाठी पोटच्या गोळ्यांना पालक शेकडो किमी दुर पाठवत असलेतरी तेथे त्यांनी आदिवासी व मागासलेले असल्याने होणारी हेळसांड थांबलेली नसून भेटायला जाणाºया पालकांनाही तुसडेपणाने वागविले जाते अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत.परगावी शिकणाºया प्रत्येक विद्यार्थ्यावर शासन निवासी शिक्षणासाठी ९५ हजार रुपये खर्च करते. मात्र य नामांकित शाळा आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार केले जातात. परिणामी या आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांची हेळसांड होत असल्याचा पालक असणाºया विलास सुमडा यांनी आरोप केला आहे. डहाणू केटी नगर येथून डहाणू प्रकल्प कार्यालयापर्यंत काढलेल्या निषेध मोर्चामध्ये पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील शेकडो पालकांनी एकत्र येऊन शासन व प्रशासनाचा निषेध केला.

टॅग्स :Schoolशाळा