शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

चौपदरीकरण सुनावणी तहकूब; लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही, बोलावली बैठक, सुरू केली जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 6:22 AM

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने आज पालघर मध्ये विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची सर्वंकष माहिती देण्याबाबत ची गुरूवारची जनसुनावणी मात्र प्रकल्पाविषयी ची योग्य माहिती न देणे, सर्व बाधितासह गावांना, लोकप्रतिनिधींना आमंत्रित न करणे यामुळे स्थानिक संतप्त झाल्याने तहकूब करावी लागली.

पालघर : मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने आज पालघर मध्ये विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची सर्वंकष माहिती देण्याबाबत ची गुरूवारची जनसुनावणी मात्र प्रकल्पाविषयी ची योग्य माहिती न देणे, सर्व बाधितासह गावांना, लोकप्रतिनिधींना आमंत्रित न करणे यामुळे स्थानिक संतप्त झाल्याने तहकूब करावी लागली.पूर्ण तयारीनीशी याल तरच ही जनसुनावणी होईल असे स्थानिकांनी बजावल्या नंतर ही जनसुनावणी स्थगित करण्याची घोषणा ह्या प्रकल्पाचे उपमुख्य व्यवस्थापक आनंद कुलकर्णी ह्याना करावी लागली. पुढील जनसुनावणीची तारीख लवकरच घोषित करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन(एमआरव्हीसी)ही रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांनी स्थापन केलेली कंपनी असून त्याद्वारे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) अंतर्गत रेल्वे चे प्रकल्प साकारले जातात. ३ हजार ५५२ कोटी रु पये खर्चाच्या व सुमारे ६१.७७८ किमी लांबीच्या विरार-डहाणू लोहमार्गाच्या चौपदरीकरण मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत हे काम होणार असून पालघर स्टेशनच्या पूर्वेला फ्रेट कॅरिडोर उभारला जाणार असल्याने हे चौपदरीकरण पश्चिमेला करण्यात येणार आहे. पालघर नगरपरिषद इमारती सह मनोर रोड वरील माजी आमदार नवनीतभाई शहा यांच्या घरापासून सरळ रेषेतील पन्नास- शंभरवर्षाच्या जुन्या घर मालकांना व दुकानदारासह वसई, विरार, वैतरणा, सफाले, केळवे रोड, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणू इ.रेल्वे स्थानका नजीकच्या शेतकरी व घर मालकांना आजच्या जनसुनावणी मध्ये उपस्थित राहण्याची पत्रे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन व महसूल विभागाने पाठवली होती. त्यामुळे पश्चिमेकडील जमिनी संपादित करून त्यावरील घरे, इमारती, दुकाने भुईसपाट होण्याची शक्यता आहे. पालघर स्टेशन ते मनोर कडे जाणारा रस्ताही ह्या चौपदीकरणात बाधित होणार असल्याने शहरातील वाहतूकीचा प्रश्न अधिक जटील बनणार आहे. नियोजनाचा अभाव आणि चुकीच्या नोटिसांबाबत अधिकाºयांना फैलावर घेऊन निषेध करीत ही जनसुनावणी पूर्ण तयारीनिशी जाहीर करण्याची मागणी उपस्थितांनी केली. आमदार विलास तरे, ह्या उपमुख्य व्यवस्थापक आनंद कुलकर्णी, सहाय्यक अभियंता मेहर सिंग इ.अधिकारी उपस्थित होते.कुठे, कसे, किती होणार आहे भूसंपादनवसई : डोंगरे, नारिंगी, घासकोपरी, शिरगाव, कासराळी, पालघर : वाढीव, सरावली, करवाळे, सरतोंडी, सफाले, उंबरपाडा, नंदाडे तर्फे माहीम, कपासे, माकूणसार, रोठे, केळवे रोड, कसबे-माहीम, नवली, पालघर, गोठणपूर, कोळगाव, उमरोली, बिरवाडी, पंचाळी, कंबळगाव, खैरे, बोईसर, राणी शिगाव, तर डहाणू: वाणगाव, कापशी, आसनगाव व पळे येथील जमिनी संपादित होतील.वसई : ६ गावांमध्ये १० हेक्टर खाजगी, २. हेक्टर शासकीय , ३ हेक्टर वन अशी १७ हेक्टर जमीन पालघर : २१ गावांतील २४ हेक्टर खाजगी, २ सरकारी व १ वन मिळून २७ हेक्टर जमीन डहाणू : ४ गावांतील ६ हेक्टर खाजगी, ४ हेक्टर शासकीय , ३ हेक्टर वन अशा १४ हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार