शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

अर्नाळ्याच्या महिलेच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:38 IST

Court News: २०१६ साली अर्नाळा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिची हत्या करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चारही आरोपींना वसई न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - २०१६ साली अर्नाळा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिची हत्या करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चारही आरोपींना वसई न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कविता बडाल (२७) हिने मार्केटिंगच्या कामासंदर्भात मिटींग कामी १५ मे २०१६ रोजी ग्लोबल सिटी, विरार येथे जात असल्याचे घरात सर्वांना सांगुन गेली होती. ती घरी परत आली नसल्याने घरच्यांनी १६ मे रोजी अर्नाळा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग दाखल करण्यात आली होती. १७ मे रोजी पहाटे तिचे वडील किशनलाल कोठारी यांच्या फोनवर मुलगी कविता हिच्या मोबाईल नंवरवरुन फोन आला. परंतु फोनवरुन आरोपीने मुलगी व्यवस्थित पाहिजे असेल तर ३० लाख रुपये आणि ३ किलो सोने पाहिजे अशी खंडणी मागितली. परत साडे दहाला फोन करेन व जागा सांगेल असे सांगितले. पुन्हा दुपारी १२.५५ वाजता आरोपीने फोन करून रोख रक्कम व सोने घेऊन सुरतच्या दिशेने येण्यासाठी सांगितले. तसेच गाडीने निघ व गाडीचा नंबर एसएमएस करून दीड तासात पोहोचला पाहिजे असे सांगून जास्त हुशारी केली तर मुलीचा मृतदेह मिळेल अशी धमकी दिली. अर्नाळा पोलिसांनी यानंतर आरोपींवर खंडणी, अपहरण या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.

आरोपी मोहितकुमार भगत (२५), रामअवतार शर्मा (२६), शिवा शर्मा (२५) या तिघांना महामार्गावरील खानिवडे टोल नाका येथे १९ मे २०१६ रोजी अर्नाळा पोलिसांनी सापळा रचून खंडणीचे पैसे घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर या तीन आरोपींची साथीदार महिला युनिता शरवंदन (२५) हिलाही अटक करण्यात आली होती. यानंतर हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला होता. या चारही आरोपींनी गुन्ह्याचा कट रचून कविता हिच्यासोबत आर्थिक वादातून झालेल्या कारणावरून तिचा गळा दाबून तिला जिवे ठार मारुन तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने बॅगेत भरून वानगाव येथे घेवून जावुन जाळुन पुरावा नष्ट केला होता. अर्नाळ्याचे तत्कालीन तपास पोलीस अधिकारी के. डी. कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले, पोलीस नाईक मंदार दळवी, पोलीस हवालदार मुकेश पवार यांच्या पथकाने सखोल तपास करून भक्कम पुरावे गोळा केले होते. वसई न्यायालयात हे पुरावे सादर करण्यात आले होते. पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकील जयप्रकाश पाटील, तत्कालीन पोलीस अधिकारी के डी कोल्हे यांचा मोलाचा वाटा आहे.

योग्य पुरावे, पोलिसांनी केलेला तपास यामुळे दोषी चारही आरोपींना वसई न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.- जयप्रकाश पाटील, (सरकारी वकील, वसई)

 आमच्या टीमने या गुन्ह्याच्या प्रकरणी योग्य तपास करून योग्य कागदपत्रे, पुरावे वसई न्यायालयात सादर केले होते. यामुळे न्यायालयाने दोषी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. - के डी कोल्हे (तपास अधिकारी)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयVasai Virarवसई विरार