शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अर्नाळ्याच्या महिलेच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:38 IST

Court News: २०१६ साली अर्नाळा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिची हत्या करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चारही आरोपींना वसई न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - २०१६ साली अर्नाळा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिची हत्या करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चारही आरोपींना वसई न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कविता बडाल (२७) हिने मार्केटिंगच्या कामासंदर्भात मिटींग कामी १५ मे २०१६ रोजी ग्लोबल सिटी, विरार येथे जात असल्याचे घरात सर्वांना सांगुन गेली होती. ती घरी परत आली नसल्याने घरच्यांनी १६ मे रोजी अर्नाळा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग दाखल करण्यात आली होती. १७ मे रोजी पहाटे तिचे वडील किशनलाल कोठारी यांच्या फोनवर मुलगी कविता हिच्या मोबाईल नंवरवरुन फोन आला. परंतु फोनवरुन आरोपीने मुलगी व्यवस्थित पाहिजे असेल तर ३० लाख रुपये आणि ३ किलो सोने पाहिजे अशी खंडणी मागितली. परत साडे दहाला फोन करेन व जागा सांगेल असे सांगितले. पुन्हा दुपारी १२.५५ वाजता आरोपीने फोन करून रोख रक्कम व सोने घेऊन सुरतच्या दिशेने येण्यासाठी सांगितले. तसेच गाडीने निघ व गाडीचा नंबर एसएमएस करून दीड तासात पोहोचला पाहिजे असे सांगून जास्त हुशारी केली तर मुलीचा मृतदेह मिळेल अशी धमकी दिली. अर्नाळा पोलिसांनी यानंतर आरोपींवर खंडणी, अपहरण या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.

आरोपी मोहितकुमार भगत (२५), रामअवतार शर्मा (२६), शिवा शर्मा (२५) या तिघांना महामार्गावरील खानिवडे टोल नाका येथे १९ मे २०१६ रोजी अर्नाळा पोलिसांनी सापळा रचून खंडणीचे पैसे घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर या तीन आरोपींची साथीदार महिला युनिता शरवंदन (२५) हिलाही अटक करण्यात आली होती. यानंतर हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला होता. या चारही आरोपींनी गुन्ह्याचा कट रचून कविता हिच्यासोबत आर्थिक वादातून झालेल्या कारणावरून तिचा गळा दाबून तिला जिवे ठार मारुन तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने बॅगेत भरून वानगाव येथे घेवून जावुन जाळुन पुरावा नष्ट केला होता. अर्नाळ्याचे तत्कालीन तपास पोलीस अधिकारी के. डी. कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले, पोलीस नाईक मंदार दळवी, पोलीस हवालदार मुकेश पवार यांच्या पथकाने सखोल तपास करून भक्कम पुरावे गोळा केले होते. वसई न्यायालयात हे पुरावे सादर करण्यात आले होते. पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकील जयप्रकाश पाटील, तत्कालीन पोलीस अधिकारी के डी कोल्हे यांचा मोलाचा वाटा आहे.

योग्य पुरावे, पोलिसांनी केलेला तपास यामुळे दोषी चारही आरोपींना वसई न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.- जयप्रकाश पाटील, (सरकारी वकील, वसई)

 आमच्या टीमने या गुन्ह्याच्या प्रकरणी योग्य तपास करून योग्य कागदपत्रे, पुरावे वसई न्यायालयात सादर केले होते. यामुळे न्यायालयाने दोषी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. - के डी कोल्हे (तपास अधिकारी)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयVasai Virarवसई विरार