शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

माजी आमदार विवेक पंडीत ठरले मुंबई विद्यापीठाचे टॉपर, M.A. ला 94 % गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 21:16 IST

विद्यार्थीदशेत तथा महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्यांना विविध चळवळीन आकर्षित केलं होतं. तर शालांत परीक्षेत म्हणजेचं एस एस सी परीक्षेत विवेक पंडित यांना फक्त 48 टक्के गुण मिळाले हो

ठळक मुद्देआता वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अगदी नेटाने अभ्यास करून एम ए (राज्यशास्त्र) या पदव्युत्तर विशेष पदवी परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण संपादित केले आहेत 

वसई - उभं आयुष्य आदिवासी बांधवांसाठी घालवणारे श्रमजीवी संघटनेचे सर्वेसर्वा व वसईचे माजी आमदार विवेक भाऊ पंडित यांनी वयाच्या 64 व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र)  परीक्षा विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. राज्यशास्त्र या विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा विशेष बहुमान प्राप्त केला असून या विशेष परीक्षेत त्यांनी 94 टक्के गुणांची कमाई केली आहे.

दरम्यान, विद्यार्थीदशेत तथा महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्यांना विविध चळवळीन आकर्षित केलं होतं. तर शालांत परीक्षेत म्हणजेचं एस एस सी परीक्षेत विवेक पंडित यांना फक्त 48 टक्के गुण मिळाले होते आणि त्यांनतर त्यांना पदवी परीक्षेच्या दरम्यान ते सातत्याने चळवळीत व्यस्त असल्याने अवघ्या 38 टक्के गुणांसह ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र, आता वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अगदी नेटाने अभ्यास करून एम ए (राज्यशास्त्र) या पदव्युत्तर विशेष पदवी परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण संपादित केले आहेत 

आपल्या या भरघोस यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार पंडित यांनी आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे तर आपण सतत काहींना काही शिकत राहिल्यानं  आपण विद्यार्थी असल्याची वारंवार खात्री होतच राहते. तसेच आपण इतरांना शिक्षणासाठी नेहमी प्रवृत्त करीत आलो आहोत,आता इतरांना अधिक हक्काने शिक्षणासाठी प्रवृत्त करता येईल, असेही ते म्हणाले. अर्थातच अभ्यास व शिक्षणामुळे मनाची कवाडं खुली होतात. तर अधुन मधून नवनवीन विचारांची त्यामध्ये भर देखील पडते व त्याचा एकूणच व्यक्ति मत्वाला विविधांगी फायदाही होत असतो. विद्यार्थीदशेत असताना चळवळीमुळे अभ्यासाकडे विशेष असे लक्ष देता आलं नाही, त्यामुळे शैक्षणिक प्रगती यथातथाच राहिली खरी, परंतु खरंच आपण खूप शिकावं अशी वडिलांची मनोमन इच्छा होती. या इच्छेला काही प्रमाणात तरी न्याय देता आल्याची भावना भाऊंनी यावेळी व्यक्त केली. आपल्या बालपणातील शिक्षणाशी  निगडित काही आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला आहे. आता यापुढील टप्प्यात भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेतील संसदीय समित्या व अमेरिकेतील संसदीय समित्या आता विकास प्रक्रिया याचा तौलनिक अभ्यास करून शेवटी शोधनिबंध लिहिणार असल्याचं ही माजी आमदार पंडित यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :MLAआमदारMumbai Universityमुंबई विद्यापीठcorona virusकोरोना वायरस बातम्या