शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
6
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
7
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
8
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
9
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
10
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
11
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
12
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
13
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
14
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
15
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
16
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
17
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
19
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
20
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू

माजी आमदार क्षितिज ठाकूर महावितरणविरोधात आक्रमक, महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 21:08 IST

बविआच्या वतीने तब्बल 24 मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले.

नालासोपारा :- सर्वसामान्य वीज ग्राहकांना अखंडित आणि योग्य दरात वीज हवी आहे. परंतु परिवर्तनानंतर शासनाची भूमिका ही व्यापाऱ्यासारखी झालेली आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे महावितरणच्या वीजबिलांत प्रचंड वाढ होत असून त्याची झळ सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत आहे. त्यापेक्षा पूर्वीचे दिवस चांगले होते. सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही हे कुठपर्यंत सहन करायचे ? महावितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही; तर याविरोधात एक दिवस आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा सज्जड इशारा माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिला.

वारंवार खंडित होणारी वीज आणि अवाजवी बिलांमुळे विरार पूर्व विभागातील संतप्त रहिवाशांनी बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणविरोधात रविवारी सकाळी मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी; या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. जी. डी. गार्डन सभागृहात आयोजित या सभेत बविआच्या वतीने तब्बल 24 मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. याच विविध समस्यांवर क्षितिज ठाकूर यांनी व्यासपीठावर उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रसंगी समस्यांनी ग्रस्त ग्राहकांना अधिकाऱ्यांसमक्ष उभे करून त्यांच्या समस्यांवर खुलासा करण्यास भाग पाडले.

वसई-विरार शहराला होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे शहरवासीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकार अखंडित वीजपुरवठा देण्याचे आश्वासन देते आणि शहरात मात्र तासनतास वीज नसते. या सरकारच्या दुटप्पी धोरणावर क्षितिज ठाकूर यांनी ताशेरे ओढले. वीज वापर नसतानाही सर्वसामान्य वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत. ही समस्या सोडविण्याऐवजी महावितरणचे अधिकारी आधी बिले भरा असे सांगून ग्राहकांना वेठीस धरत आहेत. बिले भरली की त्यांच्या तक्रारींकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत याकडे लक्ष वेधतानाच यात सुधारणा झाली पाहिजे,असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.

शहरातील प्रस्तावित रोहित्रांकरता जागांचा प्रश्न सोडवता आला असता; पण जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठीचा मंजूर निधी महावितरणने वर्ग करून का घेतला नाही?असा अधिकाऱ्यांना निरुत्तरित करणारा प्रश्न त्यांनी केला. शिवाय; विरार-चिखलडोंगरी येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन मागील वर्षी झाले होते; हे काम एक वर्षानंतरही पुढे का जाऊ शकलेले नाही? याबाबत खुलासा विचारत शासनावर अप्रत्यक्षरीत्या त्यांनी शरसंधान साधले.

वसई-विरार शहरातील प्रस्तावित वीज उपकेंद्र,भूमिगत वीज वाहिनी, रोहित्र आणि अन्य विकासकामांसाठी सरकारने 1700 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. या कामांची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे. शिवाय; सर्वसामान्य वीज ग्राहकांनी उपस्थित केलेल्या त्यांच्या समस्यांचे निरसन महावितरणने कशापद्धतीने केलेले आहे? वीज अपघातांमुळे दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना महावितरणने आतापर्यंत किती मदत केली आहे? अशा अनेक प्रश्नांची लेखी उत्तरे येत्या मंगळवारपर्यंत महावितरणने सादर करावीत, असा निर्वाणीचा इशाराही सरतेशेवटी क्षितिज ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

या सभेला महावितरण विरार पूर्व विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ईश्वर भारती, सहाय्यक अभियंता अमोल घोडके, बविआचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक आणि अन्य माजी नगरसेवक, नगरसेविका, बविआचे कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Kshitij thakurक्षितिज ठाकूरVasai Virarवसई विरारmahavitaranमहावितरण