शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

वणव्यांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:12 IST

वनविभागाकडून तपास सुरू

सुनील घरत

पारोळ : वन्यजीवांसाठी राखीव असणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला वणव्याचे ग्रहण लागले असून यात संचार करणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वणवे लागतात की लावले जातात, याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे.मुंबईच्या ऑक्सिजनची कांडी व वसई तालुक्याचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला दोन-तीन दिवसांपासून पूर्वेकडील माजिवली, देपीवली, मस्किना बाजूने मोठा वणवा लागला, तसेच पश्चिमेकडे व उत्तरेकडेही अनेक छोटे-मोठे वणवे लागले. यामुळे अभयारण्यात दिवसा धुराचे लोट उठताना दिसत आहेत, तर रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मांडवी गावाच्या समोरील बाजूने अगदी वर आगीच्या लालभडक ज्वाळा दिसत होत्या. सध्या लागत असलेल्या की लावल्या जाणाऱ्या या वणव्यांमुळे अभयारण्यातील प्राण्यांसह वनसंपदेला मोठी हानी पोहोचत असून फुलोऱ्यावर आलेल्या काळ्या मैनेला, दाट मोहोर धरलेल्या रायवळी आंब्यांना, हाटुरणे, शिवण, तोरण आदीसारख्या रानमेव्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जंगली रानमेव्यावर रोजगार मिळवणाऱ्या रहिवाशांचा रोजगार बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वसई पूर्वेतील परिसर हा मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा असलेला आहे. हा परिसर तुंगारेश्वर अभयारण्य व मांडवी वनक्षेत्र यांच्या अखत्यारीत येतो. या जंगलात अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे येथील वनक्षेत्र परिसर नष्ट होऊन वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याआधीच लाकूडतोडी, अतिक्रमण यामुळे जंगलपट्ट्याचे प्रमाण कमी झाले आहे. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे या भागातील जंगलपट्टा कमी होत आहे.

वणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पथके तयार केली असून घनदाट जंगल असल्याने काही ठिकाणी आग विझवताना अडचणी येत आहेत. त्यासाठी आमच्या विभागाची आठ पथके वणवा विझवण्यासाठी काम करत आहेत.- राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्रपाल

वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात असून वणवा रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने योग्य ती खबरदारी घेत वणव्यांवर उपाययोजना करावी, तसेच वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करावी.- लक्ष्मीप्रसाद पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यावरणमित्र बहुद्देशीय संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरार