शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

वणव्यांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:12 IST

वनविभागाकडून तपास सुरू

सुनील घरत

पारोळ : वन्यजीवांसाठी राखीव असणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला वणव्याचे ग्रहण लागले असून यात संचार करणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वणवे लागतात की लावले जातात, याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे.मुंबईच्या ऑक्सिजनची कांडी व वसई तालुक्याचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला दोन-तीन दिवसांपासून पूर्वेकडील माजिवली, देपीवली, मस्किना बाजूने मोठा वणवा लागला, तसेच पश्चिमेकडे व उत्तरेकडेही अनेक छोटे-मोठे वणवे लागले. यामुळे अभयारण्यात दिवसा धुराचे लोट उठताना दिसत आहेत, तर रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मांडवी गावाच्या समोरील बाजूने अगदी वर आगीच्या लालभडक ज्वाळा दिसत होत्या. सध्या लागत असलेल्या की लावल्या जाणाऱ्या या वणव्यांमुळे अभयारण्यातील प्राण्यांसह वनसंपदेला मोठी हानी पोहोचत असून फुलोऱ्यावर आलेल्या काळ्या मैनेला, दाट मोहोर धरलेल्या रायवळी आंब्यांना, हाटुरणे, शिवण, तोरण आदीसारख्या रानमेव्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जंगली रानमेव्यावर रोजगार मिळवणाऱ्या रहिवाशांचा रोजगार बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वसई पूर्वेतील परिसर हा मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा असलेला आहे. हा परिसर तुंगारेश्वर अभयारण्य व मांडवी वनक्षेत्र यांच्या अखत्यारीत येतो. या जंगलात अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे येथील वनक्षेत्र परिसर नष्ट होऊन वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याआधीच लाकूडतोडी, अतिक्रमण यामुळे जंगलपट्ट्याचे प्रमाण कमी झाले आहे. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे या भागातील जंगलपट्टा कमी होत आहे.

वणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पथके तयार केली असून घनदाट जंगल असल्याने काही ठिकाणी आग विझवताना अडचणी येत आहेत. त्यासाठी आमच्या विभागाची आठ पथके वणवा विझवण्यासाठी काम करत आहेत.- राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्रपाल

वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात असून वणवा रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने योग्य ती खबरदारी घेत वणव्यांवर उपाययोजना करावी, तसेच वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करावी.- लक्ष्मीप्रसाद पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यावरणमित्र बहुद्देशीय संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरार