शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाचे अधिकार मिळणार; आदिवासींवरील अन्यायासंदर्भात राज्यपालांचा पालघर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:56 IST

रोजगार, पाणी आणि जंगलाचे कायद्याप्रमाणे जे अधिकार दिलेले आहेत, ते आदिवासींना मिळत नाहीत.

विक्रमगड : रोजगार, पाणी आणि जंगलाचे कायद्याप्रमाणे जे अधिकार दिलेले आहेत, ते आदिवासींना मिळत नाहीत. जे अधिकार आदिवासींना मिळाले आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. वन अधिकारी मनमानी करतात. आदिवासींची शेतघरे तोडून टाकतात. त्यांना विहिरी खोदण्यास मज्जाव करतात, आदी अनेक तक्रारी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर राज्यपालांनी स्वत: पालघर जिल्ह्याचा दौरा करीत ‘आदिवासींना जंगलाचे अधिकार मिळावेत,’ अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासींनी वनाचे अधिकार मिळावेत, यासाठी मंगळवारी पालघर जिल्ह्यातील काही भागांचा दौरा केला. विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा येथील डोयाचा पाडा येथे वयम् संस्थेच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर यांना वन विभागाकडून नाहक खोटे गुन्हे नोंदवून त्रास दिला जात आहे. वनखात्याने आदिवासींच्या नावे वनपट्टे नावे करून दिलेले आहेत. या वनपट्ट्यात आदिवासी आपले घर बांधणे, विहिरी खोदणे अशी कामे करत असताना या भागातील वन विभाग अधिकारी त्यांच्यावर कारवाई करीत असून गुन्हे दाखल करीत आहेत. याबाबत वयम् या संस्थेने राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आदिवासींची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी राज्यपालांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी राज्यपालांनी आदिवासींना व प्लॉटधारकांना कायद्याप्रमाणे जे अधिकार दिले आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी करावी, अशा सूचना वन विभागाला दिल्या. ज्याप्रमाणे वन विभागाने जमीन दिल्या आहे, त्यात विहीर, घरे बांधू द्यावीत, आदिवासींवर कोणतीही कार्यवाही करू नये अशा सूचना राज्यपालांनी वन विभागाला दिल्या आहेत. तसेच कायद्यात काही अडचण निर्माण होत असल्यास केंद्र सरकार व राज्य सरकार सहकार्य करील, असेही आश्वासन या वेळी राज्यपालांनी दिले.

वनपट्टेधारकांनी या वनाचे रक्षण करावे व वन उत्पादने वाढवून रोजगार, शिक्षण याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. केंद्र सरकार व राज्य सरकार आपल्या हिताचे सरकार आहे. आपल्या भविष्यासाठी वीज, घर, गॅस, शौचालय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे कोणत्याही समस्येचे निराकारण करण्यासाठी स्वत: लक्ष देईन, असे आश्वासन या वेळी राज्यपालांनी दिले. या वेळी वयम् संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली.

डोयापाडा येथील कार्यक्रमासाठी राज्यपाल येत असताना मार्गावरील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, सर्वश्री उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, विकास गजरे, अर्चना कदम, संदीप पवार, संजय अहिरे आदी विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आदिवासींचे मागण्यांचे निवेदन

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात वन अधिनियम १९२७ चे अनुसूचित विभागात बदल करून ग्रामसभांना अधिकार द्या, गावठाण विस्तार योजना कार्यान्वित करा, वन जिल्हा समितीचे दावे जलदगतीने निकालात काढा, आदिवासींवर खोटे गुन्हे नोंदविले आहे ते परत घ्या, अशा मागण्यात केल्या आहेत.

राज्यपालांच्या दौऱ्यात प्रशासन मात्र सज्ज दिसून आले. एका दिवसात रस्ते डांबरीकरण, शाळांना रंग, परिसरात स्वच्छ झाला. त्यामुळे असे दौरे नेहमी व्हावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी कृष्णा भवनामृत संघाच्या आश्रमास भेट देऊन सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीpalgharपालघरMaharashtraमहाराष्ट्र