शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आदिवासींसाठी दिवाळी म्हणजे चवळी खाण्याचा सण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:34 IST

आपापल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे दशमी किंवा एकादशीला आदिवासी भगत म्हणजे पारंपरिक पुजारी आपापल्या कुळाचे दुरुंग पुजण्यासाठी दुरुंगावर म्हणजे डोंगरावर जातात.

- अनिरुद्ध पाटील

दिवाळीचा सण आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. पालघर जिल्ह्यात वारली, कोकणा, धोडिया, दुबळा, ठाकर, कातकरी, कोली मल्हार आदी जमातींचे वास्तव्य आहे. त्यापैकी वारली ही येथील प्रमुख जमात असून, दिवाळीत रंगीबेरंगी कपडे परिधान करणे,  नृत्य आणि पारंपरिक खाद्यपदार्थ ‘चवळी खाण्याच्या सणाला’ विशेष आहे. शेतात पिकलेल्या नव्या धान्याबद्दल निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही थोर संस्कृती होय. अश्विन एकादशीपासून दिवाळीला प्रारंभ होतो. शेतात चांगले धान्य पिकावे, रोगराई येऊ नये, कुटुंब, गाईगुरे सुरक्षित राहावीत आणि वाडवडिलांपासून चालत आलेली मौखिक विद्या टिकून अधिक परिणामकारक व्हावी म्हणून प्रत्येक घरातील प्रमुख ज्येष्ठ-आषाढ महिन्यात नवीन भातपेरणी करून कोलीदेवाचा सण केल्यापासून काकडी, चवळी, बोंबिल, ऊस, मुळा अशा अनेक गोष्टी अश्विन चतुर्दशीपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत वर्ज्य करतो.

आपापल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे दशमी किंवा एकादशीला आदिवासी भगत म्हणजे पारंपरिक पुजारी आपापल्या कुळाचे दुरुंग पुजण्यासाठी दुरुंगावर म्हणजे डोंगरावर जातात. आदिवासींच्या दिवाळीला दुरुंग (दुर्ग/डोंगर) पूजेने सुरूवात होते.  दुरुंगाला शेंदूर लागत नाही तोपर्यंत आदिवासी घरच्या कुलदेवांना नवीन शेंदूर लावला जात नाही हे विशेष! अश्विन द्वादशीला काही गावांमध्ये वाघबारस साजरी केली जाते. गावाला व गाईगुरांना सुरक्षित ठेवल्याबद्दल आभार मानले जातात. दिवाळीपर्यंत आदिवासी माणूस कुडा झाडाची पाने वापरत नाही. या दिवशी कुडा वृक्षाच्या पानात शेंदूर कालवून देवाला लावल्यावर आपल्या दैनंदिन गरजांसाठी तो कुडावृक्षाची पाने वापरू लागतो. कुलदेवांना नवीन तांदळांवर ठेवून त्यांना नवीन पिकलेली चवळी दिली जाते. यानंतर विविध गावांतून एकत्र आलेले एका कुळातील रक्ताचे बांधव मोठी मेजवानी करून तारपा नृत्यावर ठेका धरतात. दिवाळीच्या आधी येणारा आठवडी बाजार हा दिवाळीचा बाजार म्हणून ओळखला जातो.

दिवाळी बाजारात आदिवासी बांधवांची दिवाळी सणाला आवश्यक वस्तूंची खरेदी होते.  या दिवशी घरात कोणी बाळाची काळजी घेण्यासाठी बालघी, गुराखी किंवा नांगर हाकण्यासाठी नांगऱ्या ठेवला असेल तर त्यासाठी नवीन कपडे घेतात. चतुर्दशीला प्रत्येक घरी मीठ घालून उकडलेली शेतातील चवळी, सुक्या बोंबलाची भाजी आणि सावेल्या किंवा पानोळ्या भाकरी ही परंपरेने चालत आलेली खाद्यसंस्कृती आहे.  सावेल्या आवडीने खाल्ल्या जातात. यासाठी काकडी किसून तांदळाच्या पिठात कालवली जाते. आजकाल चवीसाठी वेलदोडे, किसलेले नारळ, जिरे इ. वस्तूसुद्धा घालतात. हे सर्व मिश्रण चाई नावाच्या वेलावर येणाऱ्या पानावर थापून शिजवले जाते. या दिवशी कुटुंबप्रमुख आई-वडील आणि कुटुंबातील भगत विद्या शिकत असणारा उमेदवार काकडी, बोंबिल आणि चवळी सेवन करत असल्याने या तीन वस्तूंना मानाचे स्थान असते.

आदिवासींमध्ये चवळी खाण्याचा रिवाज आटोपल्यावर गावागावात तारपकरी आपला तारपा सरसावून मोकळ्या जागेत येतात आणि रात्रभर तारप्यावर बेधुंद नाच चालू राहतो. तरुण-तरुणींच्या नाचण्याच्या उत्साहाला या दिवशी भरती आलेली असते. पूर्वी भाताच्या पाऊली - पेंढ्याने साकारलेली घरे असायची. घरावरच्या या पेंढ्याला कोहीट म्हणतात. प्रतिपदेला पाण्यातील प्रत्येक घरावरची थोडी थोडी कोहीट जमा करून गुरचरणातून किंवा डोंगरातून ज्या मार्गाने गाईगुरे गावात येतात त्या गाईंच्या मार्गावर पसरली जाते. जेव्हा गाईगुरे जंगलातून गावात येण्याची वेळ होते तेव्हा ही कोहीट पेटवली जाते. सर्व गावकरी मार्गाच्या दोन्ही बाजूला ठाल्या घेऊन वाजवतात. त्या आवाजाने गुरे घाबरून त्या पेटलेल्या आगीतून उड्या मारत गावात प्रवेश करतात. हा सण निसर्ग आणि आदिवासी यांचे नाते, शेतकऱ्याला मदत करणाऱ्या व्यक्ती व प्राणी यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा होतो.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024