शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आदिवासींसाठी दिवाळी म्हणजे चवळी खाण्याचा सण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:34 IST

आपापल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे दशमी किंवा एकादशीला आदिवासी भगत म्हणजे पारंपरिक पुजारी आपापल्या कुळाचे दुरुंग पुजण्यासाठी दुरुंगावर म्हणजे डोंगरावर जातात.

- अनिरुद्ध पाटील

दिवाळीचा सण आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. पालघर जिल्ह्यात वारली, कोकणा, धोडिया, दुबळा, ठाकर, कातकरी, कोली मल्हार आदी जमातींचे वास्तव्य आहे. त्यापैकी वारली ही येथील प्रमुख जमात असून, दिवाळीत रंगीबेरंगी कपडे परिधान करणे,  नृत्य आणि पारंपरिक खाद्यपदार्थ ‘चवळी खाण्याच्या सणाला’ विशेष आहे. शेतात पिकलेल्या नव्या धान्याबद्दल निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही थोर संस्कृती होय. अश्विन एकादशीपासून दिवाळीला प्रारंभ होतो. शेतात चांगले धान्य पिकावे, रोगराई येऊ नये, कुटुंब, गाईगुरे सुरक्षित राहावीत आणि वाडवडिलांपासून चालत आलेली मौखिक विद्या टिकून अधिक परिणामकारक व्हावी म्हणून प्रत्येक घरातील प्रमुख ज्येष्ठ-आषाढ महिन्यात नवीन भातपेरणी करून कोलीदेवाचा सण केल्यापासून काकडी, चवळी, बोंबिल, ऊस, मुळा अशा अनेक गोष्टी अश्विन चतुर्दशीपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत वर्ज्य करतो.

आपापल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे दशमी किंवा एकादशीला आदिवासी भगत म्हणजे पारंपरिक पुजारी आपापल्या कुळाचे दुरुंग पुजण्यासाठी दुरुंगावर म्हणजे डोंगरावर जातात. आदिवासींच्या दिवाळीला दुरुंग (दुर्ग/डोंगर) पूजेने सुरूवात होते.  दुरुंगाला शेंदूर लागत नाही तोपर्यंत आदिवासी घरच्या कुलदेवांना नवीन शेंदूर लावला जात नाही हे विशेष! अश्विन द्वादशीला काही गावांमध्ये वाघबारस साजरी केली जाते. गावाला व गाईगुरांना सुरक्षित ठेवल्याबद्दल आभार मानले जातात. दिवाळीपर्यंत आदिवासी माणूस कुडा झाडाची पाने वापरत नाही. या दिवशी कुडा वृक्षाच्या पानात शेंदूर कालवून देवाला लावल्यावर आपल्या दैनंदिन गरजांसाठी तो कुडावृक्षाची पाने वापरू लागतो. कुलदेवांना नवीन तांदळांवर ठेवून त्यांना नवीन पिकलेली चवळी दिली जाते. यानंतर विविध गावांतून एकत्र आलेले एका कुळातील रक्ताचे बांधव मोठी मेजवानी करून तारपा नृत्यावर ठेका धरतात. दिवाळीच्या आधी येणारा आठवडी बाजार हा दिवाळीचा बाजार म्हणून ओळखला जातो.

दिवाळी बाजारात आदिवासी बांधवांची दिवाळी सणाला आवश्यक वस्तूंची खरेदी होते.  या दिवशी घरात कोणी बाळाची काळजी घेण्यासाठी बालघी, गुराखी किंवा नांगर हाकण्यासाठी नांगऱ्या ठेवला असेल तर त्यासाठी नवीन कपडे घेतात. चतुर्दशीला प्रत्येक घरी मीठ घालून उकडलेली शेतातील चवळी, सुक्या बोंबलाची भाजी आणि सावेल्या किंवा पानोळ्या भाकरी ही परंपरेने चालत आलेली खाद्यसंस्कृती आहे.  सावेल्या आवडीने खाल्ल्या जातात. यासाठी काकडी किसून तांदळाच्या पिठात कालवली जाते. आजकाल चवीसाठी वेलदोडे, किसलेले नारळ, जिरे इ. वस्तूसुद्धा घालतात. हे सर्व मिश्रण चाई नावाच्या वेलावर येणाऱ्या पानावर थापून शिजवले जाते. या दिवशी कुटुंबप्रमुख आई-वडील आणि कुटुंबातील भगत विद्या शिकत असणारा उमेदवार काकडी, बोंबिल आणि चवळी सेवन करत असल्याने या तीन वस्तूंना मानाचे स्थान असते.

आदिवासींमध्ये चवळी खाण्याचा रिवाज आटोपल्यावर गावागावात तारपकरी आपला तारपा सरसावून मोकळ्या जागेत येतात आणि रात्रभर तारप्यावर बेधुंद नाच चालू राहतो. तरुण-तरुणींच्या नाचण्याच्या उत्साहाला या दिवशी भरती आलेली असते. पूर्वी भाताच्या पाऊली - पेंढ्याने साकारलेली घरे असायची. घरावरच्या या पेंढ्याला कोहीट म्हणतात. प्रतिपदेला पाण्यातील प्रत्येक घरावरची थोडी थोडी कोहीट जमा करून गुरचरणातून किंवा डोंगरातून ज्या मार्गाने गाईगुरे गावात येतात त्या गाईंच्या मार्गावर पसरली जाते. जेव्हा गाईगुरे जंगलातून गावात येण्याची वेळ होते तेव्हा ही कोहीट पेटवली जाते. सर्व गावकरी मार्गाच्या दोन्ही बाजूला ठाल्या घेऊन वाजवतात. त्या आवाजाने गुरे घाबरून त्या पेटलेल्या आगीतून उड्या मारत गावात प्रवेश करतात. हा सण निसर्ग आणि आदिवासी यांचे नाते, शेतकऱ्याला मदत करणाऱ्या व्यक्ती व प्राणी यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा होतो.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024