शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मिळणार आठवडाभरात नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:24 IST

शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी २५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जिल्हा महसूल विभागामार्फत शासनाकडे मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील १८ कोटी ०४ लाख ०९ हजर रुपये शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत या आठवड्यात वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर-दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे ६२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे २५ हजार ५८०.६६ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. या आपद्ग्रस्तांना शासनाच्या शेतपिकासाठी जिरायत आश्वासित सिंचनाखालील पिके याअंतर्गत यापूर्वी शासनामार्फत ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्‍टर इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी शासन निर्णयान्वये ३ हजार २०० रुपये प्रति हेक्‍टर वाढ होऊन एकूण १० हजार रुपये प्रति हेक्‍टर करण्यात आली आहे. बहुवर्षीय पिकासाठी यापूर्वी १८ हजार प्रति हेक्टरी इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी ७ हजार रुपये प्रति हेक्टरी वाढ करून एकूण २५ हजार प्रति हेक्टर शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

अनुदान वाटप करण्याचे तहसीलदारांना आदेशn जिल्ह्यासाठी एकूण २५ कोटी ५८ लाख ५२ हजार रुपये अनुदानाची गरज होती. त्यापैकी ९ नोव्हेंबर रोजी ७ कोटी ५४ लाख ४३ हजार अनुदान महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन अंतर्गत यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्याचे वाटप संबंधित तहसीलदारामार्फत बाधित शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. n शासनाकडून ७ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये उर्वरित संपूर्ण रक्कम १८ कोटी ०४ लाख ०९ हजार अनुदान महसूल व वन विभागाच्या मदत व पुनर्वसन अंतर्गत प्राप्त झाली आहे. हे अनुदान तहसीलदारांना वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार