शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मिळणार आठवडाभरात नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:24 IST

शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी २५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जिल्हा महसूल विभागामार्फत शासनाकडे मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील १८ कोटी ०४ लाख ०९ हजर रुपये शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत या आठवड्यात वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर-दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे ६२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे २५ हजार ५८०.६६ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. या आपद्ग्रस्तांना शासनाच्या शेतपिकासाठी जिरायत आश्वासित सिंचनाखालील पिके याअंतर्गत यापूर्वी शासनामार्फत ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्‍टर इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी शासन निर्णयान्वये ३ हजार २०० रुपये प्रति हेक्‍टर वाढ होऊन एकूण १० हजार रुपये प्रति हेक्‍टर करण्यात आली आहे. बहुवर्षीय पिकासाठी यापूर्वी १८ हजार प्रति हेक्टरी इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी ७ हजार रुपये प्रति हेक्टरी वाढ करून एकूण २५ हजार प्रति हेक्टर शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

अनुदान वाटप करण्याचे तहसीलदारांना आदेशn जिल्ह्यासाठी एकूण २५ कोटी ५८ लाख ५२ हजार रुपये अनुदानाची गरज होती. त्यापैकी ९ नोव्हेंबर रोजी ७ कोटी ५४ लाख ४३ हजार अनुदान महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन अंतर्गत यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्याचे वाटप संबंधित तहसीलदारामार्फत बाधित शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. n शासनाकडून ७ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये उर्वरित संपूर्ण रक्कम १८ कोटी ०४ लाख ०९ हजार अनुदान महसूल व वन विभागाच्या मदत व पुनर्वसन अंतर्गत प्राप्त झाली आहे. हे अनुदान तहसीलदारांना वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार