शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

मच्छीमारांनी थेट समुद्रातच काढला मोर्चा, पाइपलाइनचे काम बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:51 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. या दगडांवर आदळून अपघातग्रस्त झालेल्या बोटींसह मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाचा मोबदला देण्यास चालढकल केली जात होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार महिलांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबियांसह थेट समुद्रात घुसून घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले.देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये तारापूर एक नंबरवर पोहोचली असून स्थानिक शेतकरी, मच्छीमारांची शेती, बागायती किनारपट्टीवरील खाडी - खाजणापर्यंत मर्यादित राहिलेले प्रदूषण आता थेट समुद्रात ७.१ किलोमीटर्सपर्यंत पोहोचणार आहे. तारापूरच्या रासायनिक सांडपाणी (सीईटीपी) प्रक्रिया केंद्रातून नवापूर गावामार्गे थेट समुद्रात जाणाºया पाईपलाईनमुळे आता सुमारे १ ते दीड हजार कारखान्यातील प्रदूषित रासायनिक पाण्यावर पुरेशी प्रक्रि या न करताच हे पाणी दूरवर फेकण्यात येणार आहे. त्यामुळे यावर स्थानिकांचे कुठलेही नियंत्रण राहणार नसल्याने समुद्राची परिस्थिती मुंबई-माहिमच्या मिठी नदी सारखी होणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत.दीड वर्षापूर्वी समुद्रात पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतलेल्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ठाणे यांनी समुद्रात उत्खनन करताना फोडण्यात आलेल्या मोठमोठ्या खडकांचा ढीग समुद्रात रचून ठेवला होता. या पाण्याखाली असलेल्या ढिगावर कुठलेही मार्गदर्शक चिन्हे ठेकेदारांनी लावलेले नसल्याने नवापूर, उच्छेळी, दांडी गावातील अनेक बोटींना अपघात होऊन, त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे मच्छीमारांनी मोर्चा नेत काम बंद पाडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शुक्रवारी दुपारी तीनही गावातील ६० ते ७० मच्छीमार नौकांनी एमआयडीसी, एमपीसीबी यांच्या विरोधात घोषणा देत सनदशीर मार्गाने थेट समुद्र गाठला आणि पाइपलाइनचे काम बंद पाडले.आम्ही मत्स्य दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीने संकटग्रस्त असताना आमच्या नुकसानीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात आल्याने पहिले नुकसान भरपाईचे बोला नंतरच काम सुरू करा, असे बजावल्यानंतर ठेकेदाराला काम बंद करणे भाग पडले. यावेळी दांडी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तामोरे, जि.प.सदस्य तुळशीदास तामोरे, अभामा समितीचे कुंदन दवणे, विजय तामोरे, दशरथ तामोरे, राजेंद्र पागधरे, परेश पागधरे आदीसह महिला, मुले असे शेकडो ग्रामस्थांनी या मोर्चात सहभाग घेतला.समुद्रातील या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी एमआयडीसीमधून सुरू असलेल्या प्रदूषणाची गंभीर स्थिती न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने कारवाईचा फास आवळला. तारापूरच्या २०० उद्योगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तपासणी पूर्ण केली असून शर्ती-अटीचे उल्लंघन केलेल्या अनेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मच्छीमारांनी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली असून आम्ही मत्स्य व्यवसाय विभागाकडून अहवाल मागितला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाल्यावर त्याचे वितरण करण्यात येईल.- राजेंद्र तोतला, उपअभियंता, एमआयडीसी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfishermanमच्छीमार