शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांनी थेट समुद्रातच काढला मोर्चा, पाइपलाइनचे काम बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:51 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. या दगडांवर आदळून अपघातग्रस्त झालेल्या बोटींसह मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाचा मोबदला देण्यास चालढकल केली जात होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार महिलांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबियांसह थेट समुद्रात घुसून घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले.देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये तारापूर एक नंबरवर पोहोचली असून स्थानिक शेतकरी, मच्छीमारांची शेती, बागायती किनारपट्टीवरील खाडी - खाजणापर्यंत मर्यादित राहिलेले प्रदूषण आता थेट समुद्रात ७.१ किलोमीटर्सपर्यंत पोहोचणार आहे. तारापूरच्या रासायनिक सांडपाणी (सीईटीपी) प्रक्रिया केंद्रातून नवापूर गावामार्गे थेट समुद्रात जाणाºया पाईपलाईनमुळे आता सुमारे १ ते दीड हजार कारखान्यातील प्रदूषित रासायनिक पाण्यावर पुरेशी प्रक्रि या न करताच हे पाणी दूरवर फेकण्यात येणार आहे. त्यामुळे यावर स्थानिकांचे कुठलेही नियंत्रण राहणार नसल्याने समुद्राची परिस्थिती मुंबई-माहिमच्या मिठी नदी सारखी होणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत.दीड वर्षापूर्वी समुद्रात पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतलेल्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ठाणे यांनी समुद्रात उत्खनन करताना फोडण्यात आलेल्या मोठमोठ्या खडकांचा ढीग समुद्रात रचून ठेवला होता. या पाण्याखाली असलेल्या ढिगावर कुठलेही मार्गदर्शक चिन्हे ठेकेदारांनी लावलेले नसल्याने नवापूर, उच्छेळी, दांडी गावातील अनेक बोटींना अपघात होऊन, त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे मच्छीमारांनी मोर्चा नेत काम बंद पाडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शुक्रवारी दुपारी तीनही गावातील ६० ते ७० मच्छीमार नौकांनी एमआयडीसी, एमपीसीबी यांच्या विरोधात घोषणा देत सनदशीर मार्गाने थेट समुद्र गाठला आणि पाइपलाइनचे काम बंद पाडले.आम्ही मत्स्य दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीने संकटग्रस्त असताना आमच्या नुकसानीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात आल्याने पहिले नुकसान भरपाईचे बोला नंतरच काम सुरू करा, असे बजावल्यानंतर ठेकेदाराला काम बंद करणे भाग पडले. यावेळी दांडी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तामोरे, जि.प.सदस्य तुळशीदास तामोरे, अभामा समितीचे कुंदन दवणे, विजय तामोरे, दशरथ तामोरे, राजेंद्र पागधरे, परेश पागधरे आदीसह महिला, मुले असे शेकडो ग्रामस्थांनी या मोर्चात सहभाग घेतला.समुद्रातील या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी एमआयडीसीमधून सुरू असलेल्या प्रदूषणाची गंभीर स्थिती न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने कारवाईचा फास आवळला. तारापूरच्या २०० उद्योगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तपासणी पूर्ण केली असून शर्ती-अटीचे उल्लंघन केलेल्या अनेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मच्छीमारांनी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली असून आम्ही मत्स्य व्यवसाय विभागाकडून अहवाल मागितला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाल्यावर त्याचे वितरण करण्यात येईल.- राजेंद्र तोतला, उपअभियंता, एमआयडीसी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfishermanमच्छीमार