शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

मच्छीमारांनी थेट समुद्रातच काढला मोर्चा, पाइपलाइनचे काम बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:51 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. या दगडांवर आदळून अपघातग्रस्त झालेल्या बोटींसह मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाचा मोबदला देण्यास चालढकल केली जात होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार महिलांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबियांसह थेट समुद्रात घुसून घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले.देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये तारापूर एक नंबरवर पोहोचली असून स्थानिक शेतकरी, मच्छीमारांची शेती, बागायती किनारपट्टीवरील खाडी - खाजणापर्यंत मर्यादित राहिलेले प्रदूषण आता थेट समुद्रात ७.१ किलोमीटर्सपर्यंत पोहोचणार आहे. तारापूरच्या रासायनिक सांडपाणी (सीईटीपी) प्रक्रिया केंद्रातून नवापूर गावामार्गे थेट समुद्रात जाणाºया पाईपलाईनमुळे आता सुमारे १ ते दीड हजार कारखान्यातील प्रदूषित रासायनिक पाण्यावर पुरेशी प्रक्रि या न करताच हे पाणी दूरवर फेकण्यात येणार आहे. त्यामुळे यावर स्थानिकांचे कुठलेही नियंत्रण राहणार नसल्याने समुद्राची परिस्थिती मुंबई-माहिमच्या मिठी नदी सारखी होणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत.दीड वर्षापूर्वी समुद्रात पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतलेल्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ठाणे यांनी समुद्रात उत्खनन करताना फोडण्यात आलेल्या मोठमोठ्या खडकांचा ढीग समुद्रात रचून ठेवला होता. या पाण्याखाली असलेल्या ढिगावर कुठलेही मार्गदर्शक चिन्हे ठेकेदारांनी लावलेले नसल्याने नवापूर, उच्छेळी, दांडी गावातील अनेक बोटींना अपघात होऊन, त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे मच्छीमारांनी मोर्चा नेत काम बंद पाडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शुक्रवारी दुपारी तीनही गावातील ६० ते ७० मच्छीमार नौकांनी एमआयडीसी, एमपीसीबी यांच्या विरोधात घोषणा देत सनदशीर मार्गाने थेट समुद्र गाठला आणि पाइपलाइनचे काम बंद पाडले.आम्ही मत्स्य दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीने संकटग्रस्त असताना आमच्या नुकसानीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात आल्याने पहिले नुकसान भरपाईचे बोला नंतरच काम सुरू करा, असे बजावल्यानंतर ठेकेदाराला काम बंद करणे भाग पडले. यावेळी दांडी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तामोरे, जि.प.सदस्य तुळशीदास तामोरे, अभामा समितीचे कुंदन दवणे, विजय तामोरे, दशरथ तामोरे, राजेंद्र पागधरे, परेश पागधरे आदीसह महिला, मुले असे शेकडो ग्रामस्थांनी या मोर्चात सहभाग घेतला.समुद्रातील या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी एमआयडीसीमधून सुरू असलेल्या प्रदूषणाची गंभीर स्थिती न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने कारवाईचा फास आवळला. तारापूरच्या २०० उद्योगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तपासणी पूर्ण केली असून शर्ती-अटीचे उल्लंघन केलेल्या अनेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मच्छीमारांनी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली असून आम्ही मत्स्य व्यवसाय विभागाकडून अहवाल मागितला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाल्यावर त्याचे वितरण करण्यात येईल.- राजेंद्र तोतला, उपअभियंता, एमआयडीसी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfishermanमच्छीमार