शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

मच्छीमारांनी थेट समुद्रातच काढला मोर्चा, पाइपलाइनचे काम बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:51 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. या दगडांवर आदळून अपघातग्रस्त झालेल्या बोटींसह मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाचा मोबदला देण्यास चालढकल केली जात होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार महिलांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबियांसह थेट समुद्रात घुसून घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले.देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये तारापूर एक नंबरवर पोहोचली असून स्थानिक शेतकरी, मच्छीमारांची शेती, बागायती किनारपट्टीवरील खाडी - खाजणापर्यंत मर्यादित राहिलेले प्रदूषण आता थेट समुद्रात ७.१ किलोमीटर्सपर्यंत पोहोचणार आहे. तारापूरच्या रासायनिक सांडपाणी (सीईटीपी) प्रक्रिया केंद्रातून नवापूर गावामार्गे थेट समुद्रात जाणाºया पाईपलाईनमुळे आता सुमारे १ ते दीड हजार कारखान्यातील प्रदूषित रासायनिक पाण्यावर पुरेशी प्रक्रि या न करताच हे पाणी दूरवर फेकण्यात येणार आहे. त्यामुळे यावर स्थानिकांचे कुठलेही नियंत्रण राहणार नसल्याने समुद्राची परिस्थिती मुंबई-माहिमच्या मिठी नदी सारखी होणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत.दीड वर्षापूर्वी समुद्रात पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतलेल्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ठाणे यांनी समुद्रात उत्खनन करताना फोडण्यात आलेल्या मोठमोठ्या खडकांचा ढीग समुद्रात रचून ठेवला होता. या पाण्याखाली असलेल्या ढिगावर कुठलेही मार्गदर्शक चिन्हे ठेकेदारांनी लावलेले नसल्याने नवापूर, उच्छेळी, दांडी गावातील अनेक बोटींना अपघात होऊन, त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे मच्छीमारांनी मोर्चा नेत काम बंद पाडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शुक्रवारी दुपारी तीनही गावातील ६० ते ७० मच्छीमार नौकांनी एमआयडीसी, एमपीसीबी यांच्या विरोधात घोषणा देत सनदशीर मार्गाने थेट समुद्र गाठला आणि पाइपलाइनचे काम बंद पाडले.आम्ही मत्स्य दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीने संकटग्रस्त असताना आमच्या नुकसानीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात आल्याने पहिले नुकसान भरपाईचे बोला नंतरच काम सुरू करा, असे बजावल्यानंतर ठेकेदाराला काम बंद करणे भाग पडले. यावेळी दांडी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तामोरे, जि.प.सदस्य तुळशीदास तामोरे, अभामा समितीचे कुंदन दवणे, विजय तामोरे, दशरथ तामोरे, राजेंद्र पागधरे, परेश पागधरे आदीसह महिला, मुले असे शेकडो ग्रामस्थांनी या मोर्चात सहभाग घेतला.समुद्रातील या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी एमआयडीसीमधून सुरू असलेल्या प्रदूषणाची गंभीर स्थिती न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने कारवाईचा फास आवळला. तारापूरच्या २०० उद्योगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तपासणी पूर्ण केली असून शर्ती-अटीचे उल्लंघन केलेल्या अनेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मच्छीमारांनी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली असून आम्ही मत्स्य व्यवसाय विभागाकडून अहवाल मागितला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाल्यावर त्याचे वितरण करण्यात येईल.- राजेंद्र तोतला, उपअभियंता, एमआयडीसी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfishermanमच्छीमार