शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारीची मृत्यूघंटा वाजली; मासेमारी व्यवसाय येणार संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:45 IST

ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सागरीक्षेत्रातील सुमारे ३५ मैलाचा (नॉटिकल) पट्टा मर्चंट शिपींग कॅरिडोर म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्याने मच्छीमार व्यवसायाची मृत्यूघंटा वाजली आहे.

- हितेन नाईकपालघर : ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सागरीक्षेत्रातील सुमारे ३५ मैलाचा (नॉटिकल) पट्टा मर्चंट शिपींग कॅरिडोर म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्याने मच्छीमार व्यवसायाची मृत्यूघंटा वाजली आहे. नेमक्या याच क्षेत्रात उत्तम आर्थिक उत्पन्न देणारे मासे मुबलक मिळत असतात. तेच सागरीक्षेत्र आता मासेमारीसाठी उपलब्ध होणार नाही. कारण ते मर्चंट शिपींगसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे मच्छिमारीचा व्यवसाय संपुष्टात येणार आहे. या व्यवसायातील करोडो मच्छिमार बांधव देशोधडीला लागणार आहेत. भाजप सरकारचा हा निर्णय संपूर्ण मासेमारी व्यवसायावरच नांगर फिरवणारा असल्याने १० कोटी मच्छीमारांवर हे संकट येणार आहे.केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय महासंचालकांकडून (डीजीएस) सागर माला प्रकल्पाच्या नावाखाली समुद्रात गुजरातमधील (कच्छ) खंबायतच्या आखातापासून ते तामिळनाडूच्या कन्याकुमारी दरम्यानच्या पश्चिम किनारपट्टीक्षेत्रात व्यापारी मालवाहतूक करण्यासाठी स्वतंत्र समुद्री मार्गाची आखणी करण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. समुद्रात मच्छिमार नौका आणि व्यापारी जहाजे यांच्यात होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे ८५ हजार चौरस किलोमीटर्स क्षेत्र निषिद्ध, २० नॉटिकल मैल विस्तारलेला (३७.०४ किमी) तर किनाऱ्यापासून १५ नॉटिकल मैल (२७.७८ किमी) इतक्या समुद्री मार्गाची आखणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मच्छिमार विरोधी निर्णयामुळे पश्चिम किनारपट्टीवरील जलवाहतूक पूर्णपणे विभक्त करण्याचा डाव भाजपच्या सरकारने आखला असून त्यामुळे हे क्षेत्र पारंपरिक मच्छीमारासाठी निषिद्ध म्हणून घोषित करण्यात येणार आहे. या मार्गातून महाकाय जहाजे, जलद वेगाने जाणाºया बोटीची मार्गक्रमणा होणार असल्याने चुकून एखादा मिच्छमार त्या मार्गिकेत शिरला आणि त्याच्या बोटीला अपघात झाल्यास, जीवितहानी अथवा त्यांच्या जाळ्याचे नुकसान झाल्यास कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही. उलट त्या आखलेल्या मार्गक्र माणिकेत अनवधानाने प्रवेश केल्यास मच्छीमाराना फौजदारी कारवाईला आणि शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. संबंधित वृत्त/२मच्छिमारीतून होणार दहा कोटी तडीपारसागरीमाला प्रकल्पांतर्गत मर्चंट कॉरिडॉर उभारण्याचा घाट घातल्याने किनारपट्टीवर राहणाºया १० कोटी मच्छिमारांना त्यांच्या वंशपरंपरागत व्यवसायातून हद्दपार केले जाणार आहे. ४० नॉटिकल पुढे पापलेट, दाढा, घोळ, रावस, शिवंड आदी मासे जास्त प्रमाणात सापडत नसल्याने मासेमारी व्यवसायच बंद पडण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यात सुमारे १ लाख मच्छिमार कुटुंबीय असून ८२ गावातून मासेमारी केली जाते. १० ते १२ लाख मच्छीमारांची संख्या असून आॅनलाइन प्रणालीद्वारे ३ हजार ७० बोटी आहेत. २०१६-१७ या वर्षात ६३ हजार ७१३ मेट्रिक टनांचे १८१ कोटी ५५ लाखांचे मत्स्योत्पादन होत असल्याची माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांनी लोकमतला दिली.मर्चंट शिपिंग कॉरिडोरमुळे किनारपट्टीवरील मच्छिमार देशोधडीला लागणार आहेत. आम्हाला उध्वस्त करायला निघालेल्या वाढवणं, जेएसडब्लू, आदी विनाशकारी प्रकल्प रद्द करावेत या मागणीसाठी ३० आॅक्टोबर रोजी किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांनी बंद पुकारण्याचा निर्णय गोवा येथे झालेल्या एनएफएफ च्या बैठकीत घेण्यात आला आहे.- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, एनएफएफ.वडराई येथे ५५ मच्छिमार बोटी असून सुमारे २ हजार माच्छमार या व्यवसायावर अवलंबून आहेत.अश्या अनेक गावातील व्यवसाय कॉरिडॉर मुळे संपुष्टात येणार असल्याने ३० आॅक्टोबरचे बंद आंदोलन एकजुटीने संपूर्ण ताकदीने उभारू.- मानेंद्र आरेकर, चेअरमन, वडराई मच्छिमार सहकारी संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरार