शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

प्रचाराची पहिली फेरी पूर्ण

By admin | Updated: June 8, 2015 04:36 IST

रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरूवात करीत सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला.

दीपक मोहीते, वसई रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरूवात करीत सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान विश्रांती घेणारे उमेदवार दुपारी देखील प्रचार करीत होते.मतदानापूर्वीचा हा रविवार उमेदवारांना महत्त्वाचा होता. पुढील रविवारी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी दिवसभर प्रचारावर लक्ष केंद्रीत केले. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या टीकेनंतर बविआच्या कार्यकर्त्यांनीही आता जोरदार मोहीम उघडली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.२ जूनला प्रचारास प्रारंभ झाला. गेल्या ६ दिवसांमध्ये बविआ, सेना-भाजपा युती या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा मागमूसही दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड सुरूच असून येत्या दोन दिवसात काही कार्यकर्ते बविआच्या गोटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. दोन दिवसापूर्वी वाळे गावांतील अनेक कार्यकर्त्यांनी बविआमध्ये प्रवेश केला. युतीने पहिली जाहीर सभा घेण्यासंदर्भात प्रथम क्रमांक पटकावला. लवकरच बविआतर्फे माणिकपूर क्रिकेट ग्राऊंडवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बविआमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रत्येक पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून झालेली नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना अपयश आले आहे. आपल्या नातेवाईकांना (विशेष करून पत्नी) रिंगणात उतरवून स्वत: भूमिगत होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. काही पदाधिकारी व कार्यकत्यांनी पर्यटनाला जाणे पसंत केले आहे. तिकीट वाटपपूर्ण झाल्यानंतर पहिले दोन दिवस नाराजी असलेल्या इच्छूक उमेदवारांची समजूत काढण्यात गेले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात झाली. तेव्हा नाराज अचानक भूमिगत झाले. त्यामुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांना साकडे४दिवसभर प्रचार केल्यानंतर रात्री मुख्य कार्यालयात दुसऱ्या दिवसाच्या प्रचाराची रणनीती आखली जात आहे. दररोज सुमारे ५०० ते ६०० मतदारांना गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यानुसार वेगवेगळे गट स्थापन करून माहिती पत्रके, पक्षाची चिन्हे आदी साहित्याचे वाटप केले जात आहेत. ४उपप्रदेशातील ढगाळ वातावरण लक्षात घेता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास प्रचारामध्ये अडथळे निर्माण होऊन उमेदवारांना प्रचार करणे कठीण होणार आहे. गृहनिर्माण संस्थाच्या अध्यक्ष व सचिवांची भेट घेऊन संस्थेतील सदस्यांना मतदान करण्यासाठी आपले वजन वापरा, असे साकडे घालण्यात येत आहेत.४प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मतदारांना आपलेसे करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जाणार आहेत. मंदिर, विवाह सोहळ्यामध्ये उमेदवार हजर होत आहे. १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. त्यानंतर आप्त, मित्र परिवार यांच्यामार्फत मतदारांना गाठण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे.