शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
3
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
4
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
5
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
6
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
7
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
8
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
9
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
10
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
11
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
12
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
13
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
14
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..
15
विमानातून अचानक धूर... तुर्कीचे C-130 जॉर्जियात कोसळले; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
16
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
17
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
18
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
19
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
20
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा

पहिल्याच पावसात महावितरणची झाली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:42 IST

झाडे व फांद्यामुळे वीज पुरवठा खंडित; उष्म्यामुळे नागरिक त्रस्त, बॅँक व ऑनलाईन व्यवहार ठप्प

विरार : मान्सून पूर्व तयारी म्हणून महावितरणतर्फे वृक्ष छाटणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसाच्या सरित मोठ-मोठी झाडं खांबावर व विद्युत तारांवर पडल्याने तालुक्यातील अनेक भागात विजेचा लंपडाव सुरु झाला आहे.पावसाळा पूर्वकाळामध्ये महावितरणतर्फे सर्व कामे पूर्ण करून घेण्यात आली होती. फक्त पाणी लागल्यानेच नाही तर झाडांच्या फांद्या पडल्याने देखील विद्युत यंत्रणा खंडीत होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन महावितरणने उंच व विजेच्या तारांना लागणारी झाडांची छाटणी केली. तसेच ज्या झाडांमुळे वादळ वारा आल्यावर जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान होऊ शकते अशा झाडांची देखील छाटणी केली. परंतु, महावितरणची वृक्ष छाटणी प्रक्रिया पहिल्याच पावसात फसली आहे.वसई विरार शहरात पावसासोबतच वादळी वाऱ्यांनीदेखील हजेरी लावली तर यावेळी मोठ मोठी झाडं विजेच्या तारांवर व विद्युत यंत्रणांवर पडली. सोमवारी १२ तास, मंगळवारी १५ तास तर त्यानंतर सतत वीज पुरवठा खंडित होत होता. वृक्षांची छाटणी करून देखील झाडांमुळे विद्युत यंत्रणा बांधित झाली. विरार पूर्वेला अनेक ठिकाणी फांद्या, ट्रान्सफॉर्मर पडले व वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांना या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महावितरण विभागाने संपूर्ण तयारी केली होती. मात्र, महावितरणच्या तयारीला यश आलेले नाही.‘‘आमच्या परिसरात झाड पडलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडून मदत न मिळाल्यामुळे आम्हीच ते झाड उचलून बाजूला केले असे भारती जोग यांचे म्हणणे आहे. अर्नाळा, विराट नगर, मानवेल पाडा, यशवंत नगर, जकात नका इत्यादी ठिकाणी झाडं पडून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांना उष्म्याचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी सोसायटीमध्ये देखील झाडं पडली होती.महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना उष्म्यामध्ये दिवस काढावे लागत आहेत. मात्र, पडलेली झाडे उचलून वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्याचे काम देखील महावितरण लवकर करत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.सोमवार, मंगळवारी झाडांमुळे इतके नुकसान झाल्याने व वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी वृक्ष छाटणीसाठी महापालिकेला पाचारण केले. महावितरण विभागाने व्यवस्थित तपासणी न करता वृक्ष छाटणीचे काम केले असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वीज यंत्रणा बाधित झाल्याची टिका होत आहे.वादळ वारा होता त्यामुळे झाडं पडली. महावितरणा विभागाला जी झाडं धोकादायक वाटली त्यांची छाटणी करण्यात आली आहे. नागरिकांना पुन्हा त्रास होणार नाही यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत.’’- ए. एस. मिर्झा, महावितरण विभाग अधिकारी

टॅग्स :mahavitaranमहावितरण