शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पहिल्याच पावसात महावितरणची झाली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:42 IST

झाडे व फांद्यामुळे वीज पुरवठा खंडित; उष्म्यामुळे नागरिक त्रस्त, बॅँक व ऑनलाईन व्यवहार ठप्प

विरार : मान्सून पूर्व तयारी म्हणून महावितरणतर्फे वृक्ष छाटणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसाच्या सरित मोठ-मोठी झाडं खांबावर व विद्युत तारांवर पडल्याने तालुक्यातील अनेक भागात विजेचा लंपडाव सुरु झाला आहे.पावसाळा पूर्वकाळामध्ये महावितरणतर्फे सर्व कामे पूर्ण करून घेण्यात आली होती. फक्त पाणी लागल्यानेच नाही तर झाडांच्या फांद्या पडल्याने देखील विद्युत यंत्रणा खंडीत होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन महावितरणने उंच व विजेच्या तारांना लागणारी झाडांची छाटणी केली. तसेच ज्या झाडांमुळे वादळ वारा आल्यावर जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान होऊ शकते अशा झाडांची देखील छाटणी केली. परंतु, महावितरणची वृक्ष छाटणी प्रक्रिया पहिल्याच पावसात फसली आहे.वसई विरार शहरात पावसासोबतच वादळी वाऱ्यांनीदेखील हजेरी लावली तर यावेळी मोठ मोठी झाडं विजेच्या तारांवर व विद्युत यंत्रणांवर पडली. सोमवारी १२ तास, मंगळवारी १५ तास तर त्यानंतर सतत वीज पुरवठा खंडित होत होता. वृक्षांची छाटणी करून देखील झाडांमुळे विद्युत यंत्रणा बांधित झाली. विरार पूर्वेला अनेक ठिकाणी फांद्या, ट्रान्सफॉर्मर पडले व वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांना या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महावितरण विभागाने संपूर्ण तयारी केली होती. मात्र, महावितरणच्या तयारीला यश आलेले नाही.‘‘आमच्या परिसरात झाड पडलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडून मदत न मिळाल्यामुळे आम्हीच ते झाड उचलून बाजूला केले असे भारती जोग यांचे म्हणणे आहे. अर्नाळा, विराट नगर, मानवेल पाडा, यशवंत नगर, जकात नका इत्यादी ठिकाणी झाडं पडून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांना उष्म्याचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी सोसायटीमध्ये देखील झाडं पडली होती.महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना उष्म्यामध्ये दिवस काढावे लागत आहेत. मात्र, पडलेली झाडे उचलून वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्याचे काम देखील महावितरण लवकर करत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.सोमवार, मंगळवारी झाडांमुळे इतके नुकसान झाल्याने व वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी वृक्ष छाटणीसाठी महापालिकेला पाचारण केले. महावितरण विभागाने व्यवस्थित तपासणी न करता वृक्ष छाटणीचे काम केले असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वीज यंत्रणा बाधित झाल्याची टिका होत आहे.वादळ वारा होता त्यामुळे झाडं पडली. महावितरणा विभागाला जी झाडं धोकादायक वाटली त्यांची छाटणी करण्यात आली आहे. नागरिकांना पुन्हा त्रास होणार नाही यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत.’’- ए. एस. मिर्झा, महावितरण विभाग अधिकारी

टॅग्स :mahavitaranमहावितरण