शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्याचे दैन्य संपवा!

By admin | Updated: May 18, 2017 03:50 IST

१९९९ मध्ये जव्हार तालुक्याचे विभाजन करुन विक्रमगड तालुक्याची नव्याने निर्मिती झाली खरी मात्र त्यानंतर ज्या पध्दतीने विकास होणे गरजेचे होते तो झालेला नाही.

- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रमगड : १९९९ मध्ये जव्हार तालुक्याचे विभाजन करुन विक्रमगड तालुक्याची नव्याने निर्मिती झाली खरी मात्र त्यानंतर ज्या पध्दतीने विकास होणे गरजेचे होते तो झालेला नाही. त्यामुळे आज १७ वर्षे लोटूनही तालुक्याची दैना कायम आहे़आजही अनेक शासकीय कार्यालये अस्तित्वात आलेली नाहीत जी आहेत़ त्यामध्ये कर्मचारी अपुरे आहे़त वीज, पाणी, रोजगार या मूलभूत समस्यांनी तर विक्रमगडवासियांना पुर्ते ग्रासलेले आहे. एकतर तालुक्याचा विकास करा नाही तर हा तालुकाच रद्द करुन अन्य तालुक्यास जोडा अशी संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांमधून उमटत आहे़ तालुक्यात ९० टक्के आदिवासी आहे़ मुंबई ठाणे शहरालगत असूनही त्याला कुणी वाली नाही. विष्णू सवरांच्या रुपाने दोन दोन महत्वाची मंत्रीपदे या भागाला लाभली आहेत़ मात्र त्याचे प्रतिबिंब आजही विकासात पडलेले नाही. विक्रमगड तालुक्यातील विकासकामे, समस्या, अडचणी याबाबत आढावा घेण्यासाठी खासदार, आमदार व मंत्री महोदयांनी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावेळी समोर येणारे महत्वाचे प्रश्न अधिवेशनात मांडून त्याची सोडवणूक करायला हवी. परंतु सवरा यांनी विक्रमगड पंचायत समितीची आम सभा गेली दोन वर्षे न घेण्याचा पराक्रम केला आहे. तालुक्यात ९५ गाव-पाडयांचा समावेश करण्यात आला आहे़ त्यांचे प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणाकडेही नसल्यामुळे कुपोषण, बालमजुरी, बेकारी, रोजगार, शिक्षण अशा अनेक समस्या येथे कायम आहेत. धरणांसाठी ज्या आदिवासींच्या जमीनी गेल्यात त्यांना अल्प मोबदला मिळाला आहे़ देहेर्जे सारखा मोठा प्रकल्प आजही प्रलंबित आहे़ डी़ प्लस झोन मंजूर होउनही कारखाने न आल्याने तो फक्त कागदावरच राहीला आहे़. तालुक्यात २३६ जि़ प़ शाळा, तर २४६ अंगणवाडी व ५९ मिनी अंगणवाडी केंद्रे असून, या अंगणवाडयांना स्वत:ची वास्तू नाही़ विक्रमगड या आदिवासी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५५,०२७ हेक्टर असून ९५ गावे तर ४२३ पाडयांचा समावेश आहे़ पिकाखालील क्षेत्र-२०,५७९ हेक्टर तर कुरणाखालील क्षेत्र-२१,२१८ इतके आहे़तालुक्यात प्रामुख्याने भात,नागली, वरई अशी पिके घेंतली जातात़ सन-२००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,१४,२५४ च्या घरात पोहचलेली आहे़ ३९ ग्रामपंचायती व ३ ग्रामदान मंडळांचा समावेश आहे़ तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी, बालविकास विभाग, पशुधन विकास, तालुका भूमिअभिलेख, पोलिस स्टेशन, दूरध्वनी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय आदि कार्यालयात सुविधांचा अभाव असून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त आहेत़स्टेट बँक व न्यायालय यांना मंजुरी असूनही व त्यासाठी जागेचे आरक्षण करुनही ती सुरु करण्यात आलेली नाही़ त्यामुळे अनेक कार्यालयांचा कारभार आजही जव्हार तालुक्यावर अगर ठाणे/पालघर कार्यालयांवर अवलंबून आहे. धामणी, कवडास ही धरणे बांधण्यांत आली परंतु त्याचा तालुक्यातील जनतेला काहीच फायदा नाही. पाणीटंचाई समस्या आहेच तर देहेर्जेसारखे प्रकल्प प्रलंबित आहेत त्यास एकूण लागणारी ५३१़१८६ हे़ वनजमीन व २९९़९९८ हे़ खाजगी अशी ८३१़१८४ हे. जमीन आवश्यक आहे़. ती ती देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नाही आणि प्रकल्पही निधी अभावी रखडलेला आहे़ विक्रमगड शहरवासिंयाकरीता प्रशासकी भवन, मोठी नळ पाणी योजना, रस्ते, बंधारे यांची कामे, निकृष्ट झाली आहेत. त्यामुळेही जनता अत्यंत नाराज आहे. म्हणूनच नगर पंचायतीत भाजपाचा पराभव झाला. मुख्यमंत्री तोडगा काढतीलतालुक्यातील १० पाणी पुरवठा अर्धवट, एमआयडीसी नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोजगारासाठी गावच्या गावे स्थलंतरीत होण्याचे प्रमाण मोठे आहे. जवळजवळ सर्वच शासकीय कार्यालयांत रिक्तपदांबरोबरच महत्वाच्या पदांवर प्रभारी नेमणूका असे अनेक प्रश्न आजही भेडसावत असतांना आदिवासी विकास मंत्री गप्प आहेत. त्यावर मुख्यमंत्री तोडगा काढतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे़