शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तराप्यावरून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:21 IST

शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत.

- वसंत भोईरवाडा : शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत. वारंवार पुलाची मागणी करूनही शासनाकडून होत असलेले हे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका संभवत आहेयेथील एनशेत गावाजवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या पलीकडे असलेल्या विलकोस या गावातील ग्रामस्थ नदीवर पुल व्हावा यासाठी २५ वर्षे संघर्ष करीत आहेत. उन्हाळयÞात ग्रामस्थ व विद्यार्थी नदीला पाणी कमी असल्याने नदीपलीकडे जावू शकतात. या ग्रामस्थांना वाडा शहराची बाजारपेठ जवळ पडत असल्याने दैनंदिन कामकाज व व्यवहारासाठी जाणे-येणे नियमतिपणे या नदीपात्रातून सुरु असते.पावसाळयÞात मात्र या नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने नदीपलीकडे जाणे शक्य होत नाही. त्यांना १५ ते २० किलोमीटर अतंर वळसा घालून वाडा येथे जावे लागते. या नदीवर पूल नसल्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी दररोज वाडा शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येत असतात. मात्र नदी पार करण्यासाठी पूल नसल्याने बांबू अथवा प्लास्टिक पाईप एकित्रत बांधून तयार केलेल्या तराप्यावरु न जीवघेणा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर दर वर्षी येते. मात्र नदीची पातळी खोल असल्याने हा प्रवास कधीही जीवावर बेतणारा ठरू शकतो, याची कल्पना असताना शिक्षणाच्या ओढीने हे विद्यार्थी हा संघर्ष करीत आहेत. वैतरणा नादीवरील हा पूल झाला तर तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावे तालुक्याशी जोडली जातील.निर्णय प्रक्रियेच्या लालफितीत अडकलाय पूलवैतरणा नदीवर ऐनशेत येथे पूल होणे ही मागणी वर्षानुवर्षाची आहे. परंतु अद्याप पूलाला चालना मिळाली नाही. तराप्याचा आधार घेवून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करत आहेत. या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाली असल्याचे सा.बां. विभागाने दिली असून प्रशासकीय मंजुरीकरिता प्रस्तावित असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रकाश पातकर यांनी सांगितले.परंतु प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी त्यानंतर निविदा प्रक्रि या यासाठी आणखी किती कालावधी जाईल हे निश्चित नसल्याने व प्रशासकीय कामकाजात होणारी दिरंगाई पाहता एकविसाव्या शतकातही आणखी किती वर्ष हा जीवधेणा संघर्ष ह्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार