शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तराप्यावरून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:21 IST

शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत.

- वसंत भोईरवाडा : शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत. वारंवार पुलाची मागणी करूनही शासनाकडून होत असलेले हे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका संभवत आहेयेथील एनशेत गावाजवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या पलीकडे असलेल्या विलकोस या गावातील ग्रामस्थ नदीवर पुल व्हावा यासाठी २५ वर्षे संघर्ष करीत आहेत. उन्हाळयÞात ग्रामस्थ व विद्यार्थी नदीला पाणी कमी असल्याने नदीपलीकडे जावू शकतात. या ग्रामस्थांना वाडा शहराची बाजारपेठ जवळ पडत असल्याने दैनंदिन कामकाज व व्यवहारासाठी जाणे-येणे नियमतिपणे या नदीपात्रातून सुरु असते.पावसाळयÞात मात्र या नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने नदीपलीकडे जाणे शक्य होत नाही. त्यांना १५ ते २० किलोमीटर अतंर वळसा घालून वाडा येथे जावे लागते. या नदीवर पूल नसल्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी दररोज वाडा शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येत असतात. मात्र नदी पार करण्यासाठी पूल नसल्याने बांबू अथवा प्लास्टिक पाईप एकित्रत बांधून तयार केलेल्या तराप्यावरु न जीवघेणा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर दर वर्षी येते. मात्र नदीची पातळी खोल असल्याने हा प्रवास कधीही जीवावर बेतणारा ठरू शकतो, याची कल्पना असताना शिक्षणाच्या ओढीने हे विद्यार्थी हा संघर्ष करीत आहेत. वैतरणा नादीवरील हा पूल झाला तर तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावे तालुक्याशी जोडली जातील.निर्णय प्रक्रियेच्या लालफितीत अडकलाय पूलवैतरणा नदीवर ऐनशेत येथे पूल होणे ही मागणी वर्षानुवर्षाची आहे. परंतु अद्याप पूलाला चालना मिळाली नाही. तराप्याचा आधार घेवून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करत आहेत. या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाली असल्याचे सा.बां. विभागाने दिली असून प्रशासकीय मंजुरीकरिता प्रस्तावित असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रकाश पातकर यांनी सांगितले.परंतु प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी त्यानंतर निविदा प्रक्रि या यासाठी आणखी किती कालावधी जाईल हे निश्चित नसल्याने व प्रशासकीय कामकाजात होणारी दिरंगाई पाहता एकविसाव्या शतकातही आणखी किती वर्ष हा जीवधेणा संघर्ष ह्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार