शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तराप्यावरून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:21 IST

शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत.

- वसंत भोईरवाडा : शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत. वारंवार पुलाची मागणी करूनही शासनाकडून होत असलेले हे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका संभवत आहेयेथील एनशेत गावाजवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या पलीकडे असलेल्या विलकोस या गावातील ग्रामस्थ नदीवर पुल व्हावा यासाठी २५ वर्षे संघर्ष करीत आहेत. उन्हाळयÞात ग्रामस्थ व विद्यार्थी नदीला पाणी कमी असल्याने नदीपलीकडे जावू शकतात. या ग्रामस्थांना वाडा शहराची बाजारपेठ जवळ पडत असल्याने दैनंदिन कामकाज व व्यवहारासाठी जाणे-येणे नियमतिपणे या नदीपात्रातून सुरु असते.पावसाळयÞात मात्र या नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने नदीपलीकडे जाणे शक्य होत नाही. त्यांना १५ ते २० किलोमीटर अतंर वळसा घालून वाडा येथे जावे लागते. या नदीवर पूल नसल्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी दररोज वाडा शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येत असतात. मात्र नदी पार करण्यासाठी पूल नसल्याने बांबू अथवा प्लास्टिक पाईप एकित्रत बांधून तयार केलेल्या तराप्यावरु न जीवघेणा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर दर वर्षी येते. मात्र नदीची पातळी खोल असल्याने हा प्रवास कधीही जीवावर बेतणारा ठरू शकतो, याची कल्पना असताना शिक्षणाच्या ओढीने हे विद्यार्थी हा संघर्ष करीत आहेत. वैतरणा नादीवरील हा पूल झाला तर तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावे तालुक्याशी जोडली जातील.निर्णय प्रक्रियेच्या लालफितीत अडकलाय पूलवैतरणा नदीवर ऐनशेत येथे पूल होणे ही मागणी वर्षानुवर्षाची आहे. परंतु अद्याप पूलाला चालना मिळाली नाही. तराप्याचा आधार घेवून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करत आहेत. या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाली असल्याचे सा.बां. विभागाने दिली असून प्रशासकीय मंजुरीकरिता प्रस्तावित असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रकाश पातकर यांनी सांगितले.परंतु प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी त्यानंतर निविदा प्रक्रि या यासाठी आणखी किती कालावधी जाईल हे निश्चित नसल्याने व प्रशासकीय कामकाजात होणारी दिरंगाई पाहता एकविसाव्या शतकातही आणखी किती वर्ष हा जीवधेणा संघर्ष ह्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार