शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पांढरा कांदा वसईतून हद्दपार होण्याची भीती; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 12:09 IST

मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे.

विरार : वसई तालुक्यात सर्वात जास्त पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जात असे. परंतु मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे. होणाऱ्या नुकसानीमुळे कांद्याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, तालुक्यातून पांढरा कांदा हद्दपार होताना दिसत आहे.

वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणत पांढऱ्या कांद्याचे उत्पादन पूर्वीपासून घेतले जात होते. परंतु या उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत चालली आहे. जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली जाते आणि या लागवडीसाठी जमीनही दमट स्वरूपाची असावी लागते. परंतु जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कांद्याचे बीज खराब झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची शेती परवडत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे, असे काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

पांढऱ्या कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने वसईतील शिरगाव, खानिवडे, शिवनसई, पारोळ, थल्याचा पाडा, अर्नाळा, वसईगाव या ठिकाणी घेतले जाते. साधारण एका कांद्याची माळ ४० ते ५० रुपयांपर्यंत विकली जाते. त्या माळेचे वजन दोन ते तीन किलो असते. हा कांदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतो. परंतु शेतकऱ्यांना कांद्याची लागवड ही अवकाळी पावसामुळे दोन वेळा करावी लागली असल्यामुळे कांद्याचे पीक उशिरा येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

पांढरा कांदा हा औषधी म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे त्याला दर जास्त आणि बाजारात मागणीही असते. मात्र यंदा अवकाळीने पांढऱ्या कांद्याचे पीक वाया गेले.

गेल्या दोन - तीन वर्षांपासून मी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेते. परंतु या उत्पादनातून मला नफा आलेला नाही. कांद्याची लागवड झाल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शहरात कांदा पोहोचलेला नाही. - सुगंधा जाधव,माजी सभापती, भाताणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार