शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

पांढरा कांदा वसईतून हद्दपार होण्याची भीती; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 12:09 IST

मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे.

विरार : वसई तालुक्यात सर्वात जास्त पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जात असे. परंतु मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे. होणाऱ्या नुकसानीमुळे कांद्याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, तालुक्यातून पांढरा कांदा हद्दपार होताना दिसत आहे.

वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणत पांढऱ्या कांद्याचे उत्पादन पूर्वीपासून घेतले जात होते. परंतु या उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत चालली आहे. जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली जाते आणि या लागवडीसाठी जमीनही दमट स्वरूपाची असावी लागते. परंतु जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कांद्याचे बीज खराब झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची शेती परवडत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे, असे काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

पांढऱ्या कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने वसईतील शिरगाव, खानिवडे, शिवनसई, पारोळ, थल्याचा पाडा, अर्नाळा, वसईगाव या ठिकाणी घेतले जाते. साधारण एका कांद्याची माळ ४० ते ५० रुपयांपर्यंत विकली जाते. त्या माळेचे वजन दोन ते तीन किलो असते. हा कांदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतो. परंतु शेतकऱ्यांना कांद्याची लागवड ही अवकाळी पावसामुळे दोन वेळा करावी लागली असल्यामुळे कांद्याचे पीक उशिरा येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

पांढरा कांदा हा औषधी म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे त्याला दर जास्त आणि बाजारात मागणीही असते. मात्र यंदा अवकाळीने पांढऱ्या कांद्याचे पीक वाया गेले.

गेल्या दोन - तीन वर्षांपासून मी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेते. परंतु या उत्पादनातून मला नफा आलेला नाही. कांद्याची लागवड झाल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शहरात कांदा पोहोचलेला नाही. - सुगंधा जाधव,माजी सभापती, भाताणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार