शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पोल्ट्रीधारकांनी लांबवलेल्या कोंबड्यांमुळे संसर्गाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:05 IST

जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गटाच्या पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील सुमारे ५० कोंबड्यांचा तीन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता.

पालघर : पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ माजली आहे, मात्र जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागाकडून माहिती आधीच लीक झाल्याचा फायदा उचलत अनेक पोल्ट्रीधारक, दुकानदारांनी सोमवारीच आपल्या कोंबड्या, अंडी सुरक्षित ठिकाणी हलविल्याने बर्ड फ्लूचा प्रसार जिल्ह्यात वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

परिसरातील १९ पोल्ट्री फार्म आणि शेकडो दुकानांतील कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत कांबळे यांच्या जलद प्रतिसाद दलामार्फत हाती घेतली जाणार होती, मात्र या कारवाईची माहिती लीक झाल्याने काही पोल्ट्रीधारक आणि दुकानदारांनी आपल्याजवळील सर्व माल आधीच इतरत्र हलविल्याने बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गटाच्या पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील सुमारे ५० कोंबड्यांचा तीन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. हा बर्ड फ्लूचा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त झाल्यानंतर शासकीय यंत्रणा सतर्क झाली आणि मृत पक्ष्यांचे अवशेष तपासणीसाठी पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले. पालघरमधील सूर्या कॉलनीमध्ये असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली.

अचानक कोंबड्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याने या पोल्ट्री फॉर्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तो सील करण्यात आला. या पोल्ट्री फॉर्ममध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश निषिद्ध केला. मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पुणे येथे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मात्र अहवाल लीक झाल्याने पोल्ट्रीधारकांनी त्यांच्याकडील कोंबड्या रातोरात अन्यत्र हलवल्या असून या कोंबड्यांची विक्री झाली तर जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार