शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

जिल्ह्यातील शेकोटी संस्कृती लोप पावण्याची भीती; मोबाइलमध्ये जातो जास्त वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:10 IST

पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत.

पाराेळ : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गावोगावी थंडीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवल्या जात असत. एकत्र बसून शेकोटीची ऊब घेण्याबरोबरच तेथे जमलेल्या ग्रामस्थांच्या दिवसभरातील कामे, शेती, घरातील सुखदु:ख या विषयावर चर्चा रंगत असत. गावातील एकोप्याचे दर्शन यातून घडत असे. पण, गेल्या काही दिवसांत शेकोटीसाठी सहज उपलब्ध न होणारे सरपण आणि नागरिकांचा मोबाइल, लॅपटॉप यासारख्या उपकरणांत जाणारा अतिरिक्त वेळ यामुळे गावागावांतील शेकोट्यांचे प्रमाण आता कमी होते आहे. येत्या काळात ही शेकोटी संस्कृती हळूहळू लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे.

पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत. पण, आता गावपाड्यांवरची घरेही सजवलेली आहेत. पूर्वी अंगण शेणामातीने सारवलेले दिसे. आता नवनवीन फरशा बसवलेल्या दिसतात. अंगणातील फरशीचे नुकसान होऊ नये म्हणूनही या शेकोट्या जास्त पेटवल्या जात नाही. त्यातच शेकोटीसाठी लागणारे सरपण जंगलातूनही फारसे मिळत नाही. त्यामुळेही त्या कमी झाल्या आहेत. या शेकोट्यांभोवती जमून ग्रामस्थांच्या गप्पा रंगायच्या. मात्र, आता रिकाम्या वेळात प्रत्येक जण हातातील मोबाइलमध्ये दंग दिसतो. तरुणाई तर मिळेल त्या रिकाम्या वेळेत मोबाइलमध्येच डोकेे घालून बसते.

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी थंडी निसर्गाचा समतोल बिघडल्याने आता डिसेंबर महिन्यात थोडी जाणवू लागली आहे. परिणामी, त्या थंडीचा नागरिक आनंद घेत आहेत. मात्र, शेकोट्यांचे प्रमाण जिल्ह्यातील गावागावांतून कमी होत असल्याची खंत वयस्कर लोक व्यक्त करत आहेत.