शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

जिल्ह्यातील शेकोटी संस्कृती लोप पावण्याची भीती; मोबाइलमध्ये जातो जास्त वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:10 IST

पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत.

पाराेळ : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गावोगावी थंडीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवल्या जात असत. एकत्र बसून शेकोटीची ऊब घेण्याबरोबरच तेथे जमलेल्या ग्रामस्थांच्या दिवसभरातील कामे, शेती, घरातील सुखदु:ख या विषयावर चर्चा रंगत असत. गावातील एकोप्याचे दर्शन यातून घडत असे. पण, गेल्या काही दिवसांत शेकोटीसाठी सहज उपलब्ध न होणारे सरपण आणि नागरिकांचा मोबाइल, लॅपटॉप यासारख्या उपकरणांत जाणारा अतिरिक्त वेळ यामुळे गावागावांतील शेकोट्यांचे प्रमाण आता कमी होते आहे. येत्या काळात ही शेकोटी संस्कृती हळूहळू लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे.

पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत. पण, आता गावपाड्यांवरची घरेही सजवलेली आहेत. पूर्वी अंगण शेणामातीने सारवलेले दिसे. आता नवनवीन फरशा बसवलेल्या दिसतात. अंगणातील फरशीचे नुकसान होऊ नये म्हणूनही या शेकोट्या जास्त पेटवल्या जात नाही. त्यातच शेकोटीसाठी लागणारे सरपण जंगलातूनही फारसे मिळत नाही. त्यामुळेही त्या कमी झाल्या आहेत. या शेकोट्यांभोवती जमून ग्रामस्थांच्या गप्पा रंगायच्या. मात्र, आता रिकाम्या वेळात प्रत्येक जण हातातील मोबाइलमध्ये दंग दिसतो. तरुणाई तर मिळेल त्या रिकाम्या वेळेत मोबाइलमध्येच डोकेे घालून बसते.

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी थंडी निसर्गाचा समतोल बिघडल्याने आता डिसेंबर महिन्यात थोडी जाणवू लागली आहे. परिणामी, त्या थंडीचा नागरिक आनंद घेत आहेत. मात्र, शेकोट्यांचे प्रमाण जिल्ह्यातील गावागावांतून कमी होत असल्याची खंत वयस्कर लोक व्यक्त करत आहेत.