शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 00:44 IST

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा : पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय

वसई : कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची जनसुनावणी लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली होती. मात्र आता प्रलंबित असलेली जनसुनावणी आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारे नागरिकांचा सहभाग नसलेली, जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय करणारी जनसुनावणी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊ नये, अशी सूचना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच हरित सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागातर्फेप्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा दि. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता. त्यानंतर दि. २९ जानेवारी २०१९ रोजी हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी ठेवण्यात आली खरी, मात्र त्या वेळी हा प्रारूप आराखडा व यासंदर्भात हरकती घेणाºया नागरिकांची शासनाने कोणतीही बाजू न ऐकता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जनसुनावणी न घेताच बेकायदेशीररीत्या कायद्याचे उल्लंघन करून पोलीस बंदोबस्तात काही जणांची वैयक्तिक सुनावणी घेतल्याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.

दरम्यान, लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी दि. ६ मार्च २०२० रोजी जनसुनावणी घेण्यासंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात आली होती, परंतु ही सुनावणी देखील रद्द करून ती नव्याने दि. २१ मार्च रोजी घेण्यासंदर्भात पुन्हा वृत्तपत्रात जाहिरात सरकारने दिली होती. त्याच वेळी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे त्या दोन्हीही जनसुनावणी रद्द करण्यात आल्या होत्या. सरकारने आॅनलाइन पद्धतीने ठरवलेली जनसुनावणी ही पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी गैरसोयीची आणि अन्यायकारक आहे. जनसुनावणी ही प्रत्यक्ष नागरिकांच्या उपस्थितीतच झाली पाहिजे. हरकती घेणारे नागरिक आॅनलाइन पद्धतीने हरकती घेऊच शकत नाहीत. अद्ययावत उपकरणांची तोंडओळखही नसलेले नागरिक आॅनलाइन जनसुनावणीत सहभागी कसे होणार? त्यातच ग्रामीण भागात मोबाईल किंवा इंटरनेटचे नेटवर्क आहे का? तसेच हा आराखडा इंग्रजीत असल्याने मराठी भाषिक नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने कसे काय समजावणार? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.म्हणूनच पर्यावरण संवर्धन समिती वसई-विरारच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी यांना फेरविचार करून ही आॅनलाइन जनसुनावणी रद्द करावी व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नव्याने व्यवस्थितपणे नागरिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही जनसुनावणी घेण्यात यावी, अशी सूचना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीकेली आहे.मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनाही आर्जवंवसई-विरारमधील पर्यावरणसंवर्धन समितीच्या वतीने हरित वसईचे प्रणेते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि समीर वर्तक यांनी मागणीचे लेखी पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही पाठवले आहे. या पत्रात प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासंदर्भातील आॅनलाइन जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची जनसुनावणी ही आॅफलाईन आणि आॅनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाणार आहे. तसे याबाबत संबंधितांना कळवतो.- माणिक गुरसळ,जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या