शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 00:44 IST

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा : पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय

वसई : कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची जनसुनावणी लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली होती. मात्र आता प्रलंबित असलेली जनसुनावणी आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारे नागरिकांचा सहभाग नसलेली, जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय करणारी जनसुनावणी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊ नये, अशी सूचना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच हरित सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागातर्फेप्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा दि. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता. त्यानंतर दि. २९ जानेवारी २०१९ रोजी हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी ठेवण्यात आली खरी, मात्र त्या वेळी हा प्रारूप आराखडा व यासंदर्भात हरकती घेणाºया नागरिकांची शासनाने कोणतीही बाजू न ऐकता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जनसुनावणी न घेताच बेकायदेशीररीत्या कायद्याचे उल्लंघन करून पोलीस बंदोबस्तात काही जणांची वैयक्तिक सुनावणी घेतल्याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.

दरम्यान, लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी दि. ६ मार्च २०२० रोजी जनसुनावणी घेण्यासंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात आली होती, परंतु ही सुनावणी देखील रद्द करून ती नव्याने दि. २१ मार्च रोजी घेण्यासंदर्भात पुन्हा वृत्तपत्रात जाहिरात सरकारने दिली होती. त्याच वेळी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे त्या दोन्हीही जनसुनावणी रद्द करण्यात आल्या होत्या. सरकारने आॅनलाइन पद्धतीने ठरवलेली जनसुनावणी ही पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी गैरसोयीची आणि अन्यायकारक आहे. जनसुनावणी ही प्रत्यक्ष नागरिकांच्या उपस्थितीतच झाली पाहिजे. हरकती घेणारे नागरिक आॅनलाइन पद्धतीने हरकती घेऊच शकत नाहीत. अद्ययावत उपकरणांची तोंडओळखही नसलेले नागरिक आॅनलाइन जनसुनावणीत सहभागी कसे होणार? त्यातच ग्रामीण भागात मोबाईल किंवा इंटरनेटचे नेटवर्क आहे का? तसेच हा आराखडा इंग्रजीत असल्याने मराठी भाषिक नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने कसे काय समजावणार? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.म्हणूनच पर्यावरण संवर्धन समिती वसई-विरारच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी यांना फेरविचार करून ही आॅनलाइन जनसुनावणी रद्द करावी व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नव्याने व्यवस्थितपणे नागरिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही जनसुनावणी घेण्यात यावी, अशी सूचना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीकेली आहे.मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनाही आर्जवंवसई-विरारमधील पर्यावरणसंवर्धन समितीच्या वतीने हरित वसईचे प्रणेते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि समीर वर्तक यांनी मागणीचे लेखी पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही पाठवले आहे. या पत्रात प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासंदर्भातील आॅनलाइन जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची जनसुनावणी ही आॅफलाईन आणि आॅनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाणार आहे. तसे याबाबत संबंधितांना कळवतो.- माणिक गुरसळ,जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या