शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुंबई-बडोदा महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा; शेतात पाणी साचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:28 IST

‘लोकमत’मधील वृत्तानंतर कंपनीकडून पाहणी

सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामामुळे नैसर्गिक नाले बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरलेले भात बियाणे कुजण्याची भीती असून दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भातील बातमी प्रकाशित होताच शनिवारी एक्स्प्रेस वेचे काम करीत असलेल्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. दोन दिवसांत शेतातील पाण्याचा निचरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, गिराळे- नगावे गावातील शेतकरी  आक्रमक झाले असून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

पालघर तालुक्यातील १८० हेक्टर जमीन ही मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामासाठी संपादित केली असून १५ ते २० फूट उंच भराव टाकण्यात आला आहे. मात्र, या एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूंनी  शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती आहे. या कंपनीमार्फत नैसर्गिक नाले बंद करून  पाणी जाणाऱ्या मार्गात  बदल केला आहे. त्यामुळे चार-पाच दिवसांपासून पाणी शेतातच साचले आहे. मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अरविंद श्रीवास्तव, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर ललित जोशी, प्रवीण भिंगारे यांनी शनिवारी गिराळे येथे जाऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली.

न्याय मिळाला नाही, तर आंदोलन नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे  शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पंचायत समितीच्या सदस्य कामिनी पाटील व तुषार पाटील, गिराळे- नगावे येथील  सरपंच मयुरी पारधी, उपसरपंच कल्याणी पाटील, सदस्य अमोल पाटील, पोलिस, केतन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरी