शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुंबई-बडोदा महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा; शेतात पाणी साचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:28 IST

‘लोकमत’मधील वृत्तानंतर कंपनीकडून पाहणी

सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामामुळे नैसर्गिक नाले बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरलेले भात बियाणे कुजण्याची भीती असून दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भातील बातमी प्रकाशित होताच शनिवारी एक्स्प्रेस वेचे काम करीत असलेल्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. दोन दिवसांत शेतातील पाण्याचा निचरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, गिराळे- नगावे गावातील शेतकरी  आक्रमक झाले असून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

पालघर तालुक्यातील १८० हेक्टर जमीन ही मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामासाठी संपादित केली असून १५ ते २० फूट उंच भराव टाकण्यात आला आहे. मात्र, या एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूंनी  शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती आहे. या कंपनीमार्फत नैसर्गिक नाले बंद करून  पाणी जाणाऱ्या मार्गात  बदल केला आहे. त्यामुळे चार-पाच दिवसांपासून पाणी शेतातच साचले आहे. मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अरविंद श्रीवास्तव, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर ललित जोशी, प्रवीण भिंगारे यांनी शनिवारी गिराळे येथे जाऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली.

न्याय मिळाला नाही, तर आंदोलन नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे  शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पंचायत समितीच्या सदस्य कामिनी पाटील व तुषार पाटील, गिराळे- नगावे येथील  सरपंच मयुरी पारधी, उपसरपंच कल्याणी पाटील, सदस्य अमोल पाटील, पोलिस, केतन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरी