शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सूर्याच्या पाण्यापासून विक्रमगडचे शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:55 IST

धरण उशाला; तरी कोरड घशाला

विक्रमगड : तालुक्यात १९७८ साली धामणी-कवडास या ठिकाणी सूर्या धरणाचे काम सुरु करण्यांत आले होते़ हे धरण विक्रमगड तालुक्यात येत असून या धरणांत लाखो गॅलन पाण्याचा मोठा साठा आहे़ परंतु गेल्या २० ते २५ वर्षात या धरणातील पाण्याच्यासाठयापैकी १ लिटर पाणी देखील स्थानिक लहान मोठया शेतकरी वर्गास गाव-पाडयांतील रहिवाशांच्या गावात पुरविण्यांत आले नसल्याचा आरोप येथील जनता करीत आहे़ या धरणाच्या पाण्यापासून विक्रमगड तालुका वंचित राहीलेला आहे.एकीकडे पाणी टंचाई व पाण्याचा साठा असूनही पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे अशी खंत येथील शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.विक्रमगड तालुक्यांतील बहुसंख्य शेतक-यांना हया धरणाचे पाणी देण्यासाठी साधा विचार देखील झाल्याचे दिसून येत नाही़ विक्रमगड तालुक्यातील तलवाडा मार्गे हे पाणी विक्रमगड तालुक्यात फिरविले तर हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येऊन शेतकरीवर्गाचा मोठा फायदा होईल़ व नगदी पिके घेता येऊन त्यांची आर्थिक उन्नती होईल़ या भागातील शेतकरी फुलबाग (मोगरा, झेंडु आदी़), भाजीपाला (गवार वगैरे) कडधान्यांमध्ये (काळा हरभरा), बागायतीमध्ये (आंबा, चिकू) यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेत आहे ज़र या धरणाचे पाणी या तालुक्यांस दिले गेले तर येथील शेतकरी द्राक्षे, ऊस अशा बारमाही पिकांचे उत्पादन वाढवू शकतील़व निश्चितपणे पश्चिम महाराष्टÑाप्रमाणे पिके घेऊ शकल्यास त्यांना दुधाचा व पोल्ट्रीचा व्यवसाय करता येईल.तालुक्याची उन्नती होईलस्थंलातरीत जो मजुर आहे त्यांस देखील जागेवर काम मिळेल व त्यांची परवड थांबेल त्यामुळे संबंधीत विभाग व शासनाने यांचा सखोल गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे़ विक्रमगड तालुक्यांत धरण आहे परंतु त्यांचा लाभ शेजारील ५ तालुक्यांस होतो व तेथील शेतकरी वर्ग नगदी पिके घेवुन आपली प्रगती करीत आहेत.

टॅग्स :Damधरण