शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी-मच्छीमारांना ओखीचा फटका, २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:19 IST

ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे

हितेन नाईकपालघर : ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. या हंगामात पेरणी केलेली पिके वाया जाणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे तर दुसरीकडे डहाणू, पालघर, वसई तालुक्यात मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीमुळे मच्छीमार व्यवसाय ही उध्वस्त होण्याच्या मार्गावर उभा राहिला आहे.पालघर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४ लाख ६९ हजार ६९९ हेक्टर इतके असून त्यातील १ लाख ३३ हजार ४७ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र गणले जाते. जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ८५२ शेतकरी असून ७१ हजार ३३१ (४८ टक्के) शेतकरी हे अत्यल्प भूधारक, ४४ हजार ९३९ (३१ टक्के) शेतकरी अल्प भूधारक,तर ३० हजार ५२८ (२१ टक्के) शेतकरी इतर भूधारक आहेत. इतर ६६ हजार ६०० (४५ टक्के) शेतकरी हे आदिवासी आहेत.जिल्ह्यातील आठही तालुक्यात सध्याच्या हंगामात टोमॅटो, भेंडी, वांगी, कारली, मिरची, कांदा, बटाटा, दुधी, पडवळ, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, पालेभाज्या आदी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून जिल्ह्यात रब्बी पीक हंगामासाठी मका, गहू व इतर तृणधान्य, हरभरा, इतर कडधान्य, तीळ, सूर्यफूल व इतर गळीतधान्य साठी ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. त्यातील वसई तालुका सोडल्यास सातही तालुक्यात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून या पिकाअंतर्गत विविध तालुक्यात १३८८.८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. या खालोखाल विविध कडधान्ये मिळून एकूण २०६८.४ हेक्टर क्षेत्र लागवडी खालील आहे. तसेच ४६६.५ हेक्टर क्षेत्र तीळ पिकाखालील आहे.२० सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने तीन दिवस धुमाकूळ घातल्या नंतर कापून बांधावर सुकविण्यासाठी ठेवलेली पिके, कुजून साचलेल्या पाण्यावर तरंगून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते.त्यानंतर उरलेली पावली ही ओखी वादळाच्या तडाख्याने कुजून गेल्याने शेतकºयांचे दुहेरी मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका किनारपट्टीच्या पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणात बसला असून किनारपट्टी पासून १० ते २० किलोमीटर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिकू, आंबा, मिरची व फुले उत्पादकाना मोठा फटका बसणार आहे. रोपे कुजून अथवा विविध रोगांचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घटणार असल्याचे शेतकरी बागायतदारांचे म्हणणे आहे.मुंबईहून गुजरातपर्यंत फेमस असलेला जिल्ह्यातील वसई व विक्र मगड तालुक्यातील मोगरा व इतर फुले,डहाणू तालुक्यातील लिली, जरबेरा, केळवे-माहीम मधील पानवेली आदी फुलांच्या उत्पादक बागायतदार- शेतकºयांनाही यामुळे मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागणार आहे.ठाणे, पालघर जिल्ह्याना ११२ किमीच्या सागरी किनारा प्राप्त झाला असून नायगाव ते बोर्डी किनाºया दरम्यान, एकूण ३ हजार २ नौकाद्वारे मासेमारी केली जाते. ५१ सहकारी संस्थांच्या माध्यमातून मासे खरेदी-विक्र ी केली जात असून वर्षभरात ३ हजार मेट्रिक टन उत्पादन होते. वसई, उत्तन, पालघर, डहाणू मधून दिड ते दोन हजार बोटी द्वारे पापलेट, दाढा, घोळ, वाम, सुरमई आदी माश्यांची मासेमारी केली जाते. किनाºयावरून ४० ते ५० नॉटिकल समुद्री क्षेत्रातून ओखी वादळाच्या इशाºयावरून प्रशासनाने माघारी परत बोलविल्या मुळे मासेमारी न करताच त्यांना रिकाम्या हाताने परत बंदरात यावे लागल्याने त्यांचे डिझेल, बर्फ, आॅइल, मजुरी इ.चा लाखो रु पयांचा खर्च वाया गेला आहे. पालघर व डहाणू तालुक्यात मोठया प्रमाणात बोंबील, मांदेळी, करंदी माश्यांची मासेमारी करून ती सुकवून त्याची विक्र ी केली जाते. त्यांनी पकडून आणलेली व वाळत घातलेले सर्व मासे ह्या पावसात भिजून,कुजून खराब झाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.ह्या सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.बोर्डी : ओखी वादळाच्या तडाख्याने डहाणू खाडीत नांगरलेली जलारामप्रसाद (आयएनडी-एमएच-२-एमएम २६१३) ही नौका सोमवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता झाली होती. त्यानंतर नौकामालक प्रकाश दामोदर धानमेहेर यांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, खाडीत शेकडो बोटी नांगरलेल्या असताना त्या परिसरातच शोधकार्याला यश आले असून पाण्यात बुडालेली नौका सापडल्याची माहिती बोटमालकांनी प्रशासनाला कळवली आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ