शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केंद्रांवर जुन्या नोटा मिळणार हे कळताच शेतकऱ्यांनी धान्य नेले माघारी !

By admin | Updated: November 12, 2016 06:22 IST

धान्य खरेदी करतो परंतु त्याची रक्कम तुम्हाला जुन्या १००० व ५०० च्या नोटाच स्वीकाराव्या लागतील, असे बंधन धान्य एकाधिकार खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी

हुसेन मेमन, जव्हारधान्य खरेदी करतो परंतु त्याची रक्कम तुम्हाला जुन्या १००० व ५०० च्या नोटाच स्वीकाराव्या लागतील, असे बंधन धान्य एकाधिकार खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी, व्यापारी व मिलवाल्यांनी घातल्याने विक्रीसाठी आणलेले धान्य येथील शेतकऱ्यांनी परत नेले. चलन बदल्याने, आणि स्टेट बँकेत अधिक पैसा मिळत नसल्याने, व्यवहारात अडचणी दाखवीत शासनाचे आदिवासी विकास मंडळ व त्यांच्या एकाधिकार खरेदी केंद्रांवर व खाजगी दुकानदार आणि भगरिमलवाले शेतकऱ््यांना सांगत आहेत.की आम्ही धान्य घेतो, परंतु १०० आणि ५०० च्या नोटा मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांनी वर्ष भरात मेहनतीने पिकावेलेले धान्य खरेदी केले जातं नसल्याने शेतकऱ्यांनी विक्र ीसाठी आणलेले धान्य परत घरी घेवून जाण्याची वेळ आली . पालघर जिल्ह्यातील जव्हार आदिवासी तालुक्यात रोजगार नसल्याने, नेहमी पैशांची चणचण भासते. गरज असेल तसे भात, नागली, वरई, खुरासणी, उडीद ही धान्य येथील शेतकरी विक्रीस आणत असतो. त्यातून या आदिवासी कुटुंबांना थोडेफार पैसे मिळून, उदरनिर्वाह होतो. मात्र शासनाने या वर्षी १००० आणि ५००च्या चलनात बद्दल केल्याने, येथील शेतकऱ्यांनी वर्षभराची मेहनत करून वरई, उडीद, तूर हे पिकविलेले धान्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार खरेदी केंद्रांवर आणि खाजगी दुकानात व भगर मिलमध्ये आणल होते, परंतु जुन्या चलनात त्याची किंमत स्वीकारणे शेतकऱ्यांनी नाकारले. त्यामुळे त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. ज्यांना जुन्या चलनात पैसे नको असतील त्यांना ते पैसे नंतर दिले जातील, आता त्यांना फक्त आठवड्यानंतरची पट्टी (किती मालाचे किती पैसे दिले जातील याची चिठ्ठी) जाईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना माल आणण्याचा आणि परत नेण्याचा असा डबल भुर्दंड पडला. शिवाय इतर खर्च झाला तो वेगळाच. आधीच जवळ पैसे नाहीत नवीन आवक झाली नाही. फटका मात्र बसला, अशी त्यांची अवस्था झाली. यामुळे शनिवारपासून अन्य शेतकरी आपले धान्य बाजारात आणणारच नाहीत अशी अवस्था आहे. तर काही शेतकऱ््यांनी असा असा सवाल केला आहे की, खरेदी केंद्रावरील कर्मचारी देत असलेले उत्तर सरकारचे आहे ही व्यापाऱ्यांशी केलेल्या साट्यालोट्यामुळे ते देत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. याबाबतचा खुलासा महामंडळानेच करावा, अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे.