शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

खरेदी केंद्रांवर जुन्या नोटा मिळणार हे कळताच शेतकऱ्यांनी धान्य नेले माघारी !

By admin | Updated: November 12, 2016 06:22 IST

धान्य खरेदी करतो परंतु त्याची रक्कम तुम्हाला जुन्या १००० व ५०० च्या नोटाच स्वीकाराव्या लागतील, असे बंधन धान्य एकाधिकार खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी

हुसेन मेमन, जव्हारधान्य खरेदी करतो परंतु त्याची रक्कम तुम्हाला जुन्या १००० व ५०० च्या नोटाच स्वीकाराव्या लागतील, असे बंधन धान्य एकाधिकार खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी, व्यापारी व मिलवाल्यांनी घातल्याने विक्रीसाठी आणलेले धान्य येथील शेतकऱ्यांनी परत नेले. चलन बदल्याने, आणि स्टेट बँकेत अधिक पैसा मिळत नसल्याने, व्यवहारात अडचणी दाखवीत शासनाचे आदिवासी विकास मंडळ व त्यांच्या एकाधिकार खरेदी केंद्रांवर व खाजगी दुकानदार आणि भगरिमलवाले शेतकऱ््यांना सांगत आहेत.की आम्ही धान्य घेतो, परंतु १०० आणि ५०० च्या नोटा मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांनी वर्ष भरात मेहनतीने पिकावेलेले धान्य खरेदी केले जातं नसल्याने शेतकऱ्यांनी विक्र ीसाठी आणलेले धान्य परत घरी घेवून जाण्याची वेळ आली . पालघर जिल्ह्यातील जव्हार आदिवासी तालुक्यात रोजगार नसल्याने, नेहमी पैशांची चणचण भासते. गरज असेल तसे भात, नागली, वरई, खुरासणी, उडीद ही धान्य येथील शेतकरी विक्रीस आणत असतो. त्यातून या आदिवासी कुटुंबांना थोडेफार पैसे मिळून, उदरनिर्वाह होतो. मात्र शासनाने या वर्षी १००० आणि ५००च्या चलनात बद्दल केल्याने, येथील शेतकऱ्यांनी वर्षभराची मेहनत करून वरई, उडीद, तूर हे पिकविलेले धान्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार खरेदी केंद्रांवर आणि खाजगी दुकानात व भगर मिलमध्ये आणल होते, परंतु जुन्या चलनात त्याची किंमत स्वीकारणे शेतकऱ्यांनी नाकारले. त्यामुळे त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. ज्यांना जुन्या चलनात पैसे नको असतील त्यांना ते पैसे नंतर दिले जातील, आता त्यांना फक्त आठवड्यानंतरची पट्टी (किती मालाचे किती पैसे दिले जातील याची चिठ्ठी) जाईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना माल आणण्याचा आणि परत नेण्याचा असा डबल भुर्दंड पडला. शिवाय इतर खर्च झाला तो वेगळाच. आधीच जवळ पैसे नाहीत नवीन आवक झाली नाही. फटका मात्र बसला, अशी त्यांची अवस्था झाली. यामुळे शनिवारपासून अन्य शेतकरी आपले धान्य बाजारात आणणारच नाहीत अशी अवस्था आहे. तर काही शेतकऱ््यांनी असा असा सवाल केला आहे की, खरेदी केंद्रावरील कर्मचारी देत असलेले उत्तर सरकारचे आहे ही व्यापाऱ्यांशी केलेल्या साट्यालोट्यामुळे ते देत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. याबाबतचा खुलासा महामंडळानेच करावा, अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे.