शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शेतकऱ्यांना बांधावरची तूर लागवड फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:55 IST

भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

बोर्डी : निसर्गाचे लहरी हवामान व पावसामुळे खरिपातील भातपिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होऊन आधार मिळत असल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. काही वर्षांपासून परतीच्या पावसाने खरिपातील भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याला आर्थिक हातभार देण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात भातासोबत तूर बियाण्याचे वाटप करण्यात आले. भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दुर्गम आदिवासी भागात रोजच्या आहारात या डाळींचा समावेश झाल्यास कुपोषणाच्या मुक्तीसाठी हातभार लागेल, असे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तसेच नावीन्यपूर्ण बाब म्हणून आदिवासी उपयोजनेतून चार हजार ४१० किलो बियाणे बांधावर तुरीच्या लागवडीसाठी विनामूल्य वाटप करण्यात आलेले आहेत. त्यापैकी डहाणू तालुक्यात एकूण ७५० एकर क्षेत्रावर बांधावर तुरीची लागवड केलेली आहे. सध्या तुरीच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. तुरीच्या अतिरिक्त पिकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यामधून साधारणत: एकरी १२० ते १३० किलो उत्पादन मिळणार आहे. तुरीची या वर्षीची लागवड आणि उत्पन्न यांची तुलना केल्यास शेतकरी समाधानी आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रोत्साहन म्हणून राबविण्यात आली. जूनमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत प्रति कुटुंब २५० ग्रॅम तूर बियाणे शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आले. सहा महिन्यांत शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे, तरी बांधावरील तूर उत्पादनातून शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ घरी ठेवून उर्वरित विक्री करून चार पैसे मिळवू शकतो, अशी मागणी मंडळ कृषी अधिकारी सुनील बोरसे यांनी दिली.कृषी विभागामार्फत २५० ग्रॅम तूर बियाणे उपलब्ध झाले. बांधावर लागवड केली असून, चांगले उत्पादन मिळणार आहे. रब्बी हंगामात सात किलो हरभऱ्यापासून ४० ते ५० किलो उत्पादन अपेक्षित आहे.- शांती रविया दुबळा, शेतकरी, पाटीलपाडा