शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

शेतकऱ्यांना बांधावरची तूर लागवड फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:55 IST

भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

बोर्डी : निसर्गाचे लहरी हवामान व पावसामुळे खरिपातील भातपिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होऊन आधार मिळत असल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. काही वर्षांपासून परतीच्या पावसाने खरिपातील भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याला आर्थिक हातभार देण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात भातासोबत तूर बियाण्याचे वाटप करण्यात आले. भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दुर्गम आदिवासी भागात रोजच्या आहारात या डाळींचा समावेश झाल्यास कुपोषणाच्या मुक्तीसाठी हातभार लागेल, असे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तसेच नावीन्यपूर्ण बाब म्हणून आदिवासी उपयोजनेतून चार हजार ४१० किलो बियाणे बांधावर तुरीच्या लागवडीसाठी विनामूल्य वाटप करण्यात आलेले आहेत. त्यापैकी डहाणू तालुक्यात एकूण ७५० एकर क्षेत्रावर बांधावर तुरीची लागवड केलेली आहे. सध्या तुरीच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. तुरीच्या अतिरिक्त पिकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यामधून साधारणत: एकरी १२० ते १३० किलो उत्पादन मिळणार आहे. तुरीची या वर्षीची लागवड आणि उत्पन्न यांची तुलना केल्यास शेतकरी समाधानी आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रोत्साहन म्हणून राबविण्यात आली. जूनमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत प्रति कुटुंब २५० ग्रॅम तूर बियाणे शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आले. सहा महिन्यांत शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे, तरी बांधावरील तूर उत्पादनातून शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ घरी ठेवून उर्वरित विक्री करून चार पैसे मिळवू शकतो, अशी मागणी मंडळ कृषी अधिकारी सुनील बोरसे यांनी दिली.कृषी विभागामार्फत २५० ग्रॅम तूर बियाणे उपलब्ध झाले. बांधावर लागवड केली असून, चांगले उत्पादन मिळणार आहे. रब्बी हंगामात सात किलो हरभऱ्यापासून ४० ते ५० किलो उत्पादन अपेक्षित आहे.- शांती रविया दुबळा, शेतकरी, पाटीलपाडा