शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

शेतकऱ्यांना बांधावरची तूर लागवड फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:55 IST

भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

बोर्डी : निसर्गाचे लहरी हवामान व पावसामुळे खरिपातील भातपिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होऊन आधार मिळत असल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. काही वर्षांपासून परतीच्या पावसाने खरिपातील भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याला आर्थिक हातभार देण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात भातासोबत तूर बियाण्याचे वाटप करण्यात आले. भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दुर्गम आदिवासी भागात रोजच्या आहारात या डाळींचा समावेश झाल्यास कुपोषणाच्या मुक्तीसाठी हातभार लागेल, असे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तसेच नावीन्यपूर्ण बाब म्हणून आदिवासी उपयोजनेतून चार हजार ४१० किलो बियाणे बांधावर तुरीच्या लागवडीसाठी विनामूल्य वाटप करण्यात आलेले आहेत. त्यापैकी डहाणू तालुक्यात एकूण ७५० एकर क्षेत्रावर बांधावर तुरीची लागवड केलेली आहे. सध्या तुरीच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. तुरीच्या अतिरिक्त पिकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यामधून साधारणत: एकरी १२० ते १३० किलो उत्पादन मिळणार आहे. तुरीची या वर्षीची लागवड आणि उत्पन्न यांची तुलना केल्यास शेतकरी समाधानी आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रोत्साहन म्हणून राबविण्यात आली. जूनमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत प्रति कुटुंब २५० ग्रॅम तूर बियाणे शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आले. सहा महिन्यांत शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे, तरी बांधावरील तूर उत्पादनातून शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ घरी ठेवून उर्वरित विक्री करून चार पैसे मिळवू शकतो, अशी मागणी मंडळ कृषी अधिकारी सुनील बोरसे यांनी दिली.कृषी विभागामार्फत २५० ग्रॅम तूर बियाणे उपलब्ध झाले. बांधावर लागवड केली असून, चांगले उत्पादन मिळणार आहे. रब्बी हंगामात सात किलो हरभऱ्यापासून ४० ते ५० किलो उत्पादन अपेक्षित आहे.- शांती रविया दुबळा, शेतकरी, पाटीलपाडा