शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उच्चशिक्षित तरूणाने फुलवला शेतीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 23:48 IST

वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील शेतकऱ्याचे प्रयत्न : पपई, केळीची केली लागवड; गोट फार्मचीही उभारणी

वसंत भोईर

वाडा : वाडा हा शेतीप्रधान तालुका आहे. या तालुक्यात पावसाळ्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. आता शेतीकडे बघण्याचा तरूणांचा कल बदलत असून उच्चशिक्षित तरूणही शेतीकडे वळत असल्याचे दिसते आहे. तालुक्यातील आंबिस्ते येथील उच्चशिक्षित यतीश सावंत या तरूणाने पपई तसेच केळीची शेती केली असून ती यशस्वी झाली आहे. या शेतीबरोबरोच त्याने गोट फार्मही उभारला असून यातून तो लाखोंचे उत्पन्न घेत आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. याबरोबरच फळशेती, फुलशेती, मत्स्यशेती, कडधान्ये आदी पिकेही येथे घेतली जातात. युवावर्ग शेतीकडे फारसा फिरकत नसतानाही तालुक्यातील आंबिस्ते येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या उच्चशिक्षित तरूणाने नोकरी न करता शेती सुरू केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेती केली असून ती आता चांगलीच बहरली आहे.यतीश यांनी आपल्या दीड एकर जागेत पपई शेती केली असून चारच महिन्यात पपईचे भरघोस पीक आल्याचे दिसते आहे. आॅगस्ट महिन्यात शेतीची नांगरणी करून वाफे बनवून त्यावर शेणखत टाकून मल्चिंग पेपर टाकून तैवान या जातीच्या पपईच्या रोपांची लागवड केली. चारच महिन्यात ही रोपे पाच ते सहा फूट वाढली असून एका रोपाला २२ ते २३ च्या आसपास पपई आले आहेत. एका रोपाला साधारणपणे ५० किलोपर्यंत पपई येतात, असे यतीश यांनी सांगितले. दीड एकरात साधारणपणे पंधराशे रोपांची लागवड केली आहे. ठिबक सिंचनाद्वारे त्यांना पाणी, खते दिली जात आहेत. या दीड एकरासाठी एक ते सव्वा लाखांचा खर्च झाला असून हे पीक दोन वर्षांपर्यंत येईल. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये चांगले उत्पन्न मिळणार आहे.पपई, केळी या पिकांत रोगांचे प्रमाण कमी असल्याने ही शेती चांगल्या प्रकारे बहरली आहे. याचबरोबर यतीश याने दीड एकरात केळी शेतीही केली असून जी ९ या वाणाच्या जातीची त्याने लागवड केली आहे. केळीचे पीकही बहरले असून सुमारे ११ महिन्यात हे पीक येण्यास सुरवात होईल. आणि आठ ते दहा वर्षे केळीचे पीक घेता येईल, असे यतीशचे म्हणणे आहे. ही दोन्हीही पिके चांगली बहरली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती केल्याने कमी मजुरांत ही शेती तो करतो आहे. शेती करताना अनेकांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे यतीशने सांगितले. पपई, केळी लागवडीबरोबरच गोट फार्म असून त्यातूनही चांगले उत्पन्न मिळते.शेतीची आवड आणि करण्याची जिद्द असेल तर कोणताही तरूण मागे राहू शकत नाही. आधुनिक शेती केली तर नक्कीच फायदा होतो. तरूणांनी शेतीकडे वळले पाहिजे.- यतीश सावंत, युवा शेतकरी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार