शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

उच्चशिक्षित तरूणाने फुलवला शेतीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 23:48 IST

वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील शेतकऱ्याचे प्रयत्न : पपई, केळीची केली लागवड; गोट फार्मचीही उभारणी

वसंत भोईर

वाडा : वाडा हा शेतीप्रधान तालुका आहे. या तालुक्यात पावसाळ्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. आता शेतीकडे बघण्याचा तरूणांचा कल बदलत असून उच्चशिक्षित तरूणही शेतीकडे वळत असल्याचे दिसते आहे. तालुक्यातील आंबिस्ते येथील उच्चशिक्षित यतीश सावंत या तरूणाने पपई तसेच केळीची शेती केली असून ती यशस्वी झाली आहे. या शेतीबरोबरोच त्याने गोट फार्मही उभारला असून यातून तो लाखोंचे उत्पन्न घेत आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. याबरोबरच फळशेती, फुलशेती, मत्स्यशेती, कडधान्ये आदी पिकेही येथे घेतली जातात. युवावर्ग शेतीकडे फारसा फिरकत नसतानाही तालुक्यातील आंबिस्ते येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या उच्चशिक्षित तरूणाने नोकरी न करता शेती सुरू केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेती केली असून ती आता चांगलीच बहरली आहे.यतीश यांनी आपल्या दीड एकर जागेत पपई शेती केली असून चारच महिन्यात पपईचे भरघोस पीक आल्याचे दिसते आहे. आॅगस्ट महिन्यात शेतीची नांगरणी करून वाफे बनवून त्यावर शेणखत टाकून मल्चिंग पेपर टाकून तैवान या जातीच्या पपईच्या रोपांची लागवड केली. चारच महिन्यात ही रोपे पाच ते सहा फूट वाढली असून एका रोपाला २२ ते २३ च्या आसपास पपई आले आहेत. एका रोपाला साधारणपणे ५० किलोपर्यंत पपई येतात, असे यतीश यांनी सांगितले. दीड एकरात साधारणपणे पंधराशे रोपांची लागवड केली आहे. ठिबक सिंचनाद्वारे त्यांना पाणी, खते दिली जात आहेत. या दीड एकरासाठी एक ते सव्वा लाखांचा खर्च झाला असून हे पीक दोन वर्षांपर्यंत येईल. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये चांगले उत्पन्न मिळणार आहे.पपई, केळी या पिकांत रोगांचे प्रमाण कमी असल्याने ही शेती चांगल्या प्रकारे बहरली आहे. याचबरोबर यतीश याने दीड एकरात केळी शेतीही केली असून जी ९ या वाणाच्या जातीची त्याने लागवड केली आहे. केळीचे पीकही बहरले असून सुमारे ११ महिन्यात हे पीक येण्यास सुरवात होईल. आणि आठ ते दहा वर्षे केळीचे पीक घेता येईल, असे यतीशचे म्हणणे आहे. ही दोन्हीही पिके चांगली बहरली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती केल्याने कमी मजुरांत ही शेती तो करतो आहे. शेती करताना अनेकांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे यतीशने सांगितले. पपई, केळी लागवडीबरोबरच गोट फार्म असून त्यातूनही चांगले उत्पन्न मिळते.शेतीची आवड आणि करण्याची जिद्द असेल तर कोणताही तरूण मागे राहू शकत नाही. आधुनिक शेती केली तर नक्कीच फायदा होतो. तरूणांनी शेतीकडे वळले पाहिजे.- यतीश सावंत, युवा शेतकरी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार