शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:58 IST

वसई - विरार शहर महानगरपालिकेने तयार केलेले फेरीवाला धोरण बुधवारी संपन्न झालेल्या महासभेतच नियोजनशून्य असल्याचा आरोप करीत फेटाळण्यात आले आहे.

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेने तयार केलेले फेरीवाला धोरण बुधवारी संपन्न झालेल्या महासभेतच नियोजनशून्य असल्याचा आरोप करीत फेटाळण्यात आले आहे. मुळातच हे धोरण करताना पालिका प्रशासनाने कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही, तसेच हे धोरण पालिका व फेरीवाले यांच्या बाजूनं सकारात्मक नसल्याचा आरोप सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी केला आहे. या फेरीवाला धोरणातील तरतुदींवर सर्वच नगरसेवकांनी जोरदार टीका केली. त्यामुळे या धोरणाला तूर्तास स्थगिती दिली असून आता हे धोरण नव्याने तयार केले जाणार आहे.वसई-विरार शहर दिवसेंदिवस अनिधकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले जात असून दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, अतिक्र मण या समस्या वाढल्या आहेत. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहराचे नियोजनच कोलमडले आहे. यासाठी केंद्र शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना, नागरी उपजीविका अभियानांतर्गत फेरीवाल्यांच्या समस्या सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी २०१४ मध्ये फेरीवाला धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते.>स्थायीने मंजुरी दिली पण धोरण शून्यपालिकेच्या स्थायी समितीने २०१५ मध्ये या धोरणासाठी मंजुरी दिली. मात्र त्यानंतरही हे फेरीवाला धोरण तयार झाले नाही, अखेर पाच वर्षांनी पालिकेने हे धोरण तयार केले आणि अचानकपणे बुधवारी झालेल्या महासभेत सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवले. धोरणच तकलादू असल्याने त्याला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. हे धोरण तयार करताना प्रशासनाने कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचे सांगत प्रभाग समिती सभापती, स्थानिक नगरसेवक यांनाही काहीही विचारले नसल्याचे नगरसेवक पंकज ठाकूर यांनी सांगितले.याबाबत माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. फेरीवाल्यांना उपजीविकेचे साधन मिळायला हवे, मात्र नियोजन नसलेले हे धोरण असल्याचे ते म्हणाले. शहरात जागोजागी बेकायदा फेरीवाल्यांचा गराडा पडला आहे. त्याच ठिकाणी फेरीवाला क्षेत्र कसे काय घोषित केले जाऊ शकते, असा गंभीर सवाल त्यांनी केला.>जुन्या पालिकेसमोरच फेरीवाल्यांचे अतिक्र मण !जुन्या पालिकेसमोर बाजार बंद करण्यात आला, मात्र पालिकेच्या मुख्यालयाच्या परिसरातच फेरीवाल्यांनी अतिक्र मण करून तो गिळंकृत केला असल्याचे चित्र आहे,तर ज्या रस्त्यांवरून फेरीवाले हटवा अशी मागणी केली जात होती, तिथेच फेरीवाला क्षेत्र टाकले असेही त्यांनी सांगितले.>धोरणास स्थगिती देण्याची अजीव पाटील यांची मागणीपालिकेतील विद्यमान व हुशार नगरसेवक आजव पाटील यांनीही या धोरणावर जोरजार टीका करताना ज्या ठिकाणी फेरीवाला क्षेत्र दाखवले तेथे रस्ताच नसल्याचे सांगितले. तसेच या फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याची मागणी केली आहे.>धोरण नियोजनशून्यचमहापालिकेतील सत्ताधारी बविआ आणि इतर सेना - भाजपचे नगरसेवक यांनी प्रशासनाने एवढे मोठे धोरण परस्पर कसे ठरवले, असा सज्जड सवाल आयुक्तांना केला. तसेच रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला क्षेत्र ठेवल्याबद्दल जोरदार आक्षेप घेतला. इतर सदस्यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.>आयुक्तांनी दिली स्थगितीसत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी नियोजनशून्य धोरण असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी या धोरणाला तूर्तास स्थगिती दिली आणि सर्वव्यापी असे धोरण नव्याने तयार करून सर्व सूचनांचा विचार करून ते सादर करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.>फेरीवाला धोरण तयार करताना सर्व गोष्टींचा विचार, सर्वेक्षण, आढावा घेतला जाईल. शहर स्वच्छ झालेच पाहिजे ही भूमिका महत्त्वाची आहे, तेव्हा सर्वांना विचारात घेऊन हे धोरण करावे, अशा पूर्वीही सूचना होत्या. यावेळेस सभागृहातील सदस्यांचा विरोध पाहून सर्वांच्या सूचना विचारात घेऊन पुन्हा नव्याने हे धोरण तयार केले जाईल.-बी. जी. पवार, महापालिका आयुक्त,वसई विरार महापालिका, मुख्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरार