शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:58 IST

वसई - विरार शहर महानगरपालिकेने तयार केलेले फेरीवाला धोरण बुधवारी संपन्न झालेल्या महासभेतच नियोजनशून्य असल्याचा आरोप करीत फेटाळण्यात आले आहे.

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेने तयार केलेले फेरीवाला धोरण बुधवारी संपन्न झालेल्या महासभेतच नियोजनशून्य असल्याचा आरोप करीत फेटाळण्यात आले आहे. मुळातच हे धोरण करताना पालिका प्रशासनाने कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही, तसेच हे धोरण पालिका व फेरीवाले यांच्या बाजूनं सकारात्मक नसल्याचा आरोप सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी केला आहे. या फेरीवाला धोरणातील तरतुदींवर सर्वच नगरसेवकांनी जोरदार टीका केली. त्यामुळे या धोरणाला तूर्तास स्थगिती दिली असून आता हे धोरण नव्याने तयार केले जाणार आहे.वसई-विरार शहर दिवसेंदिवस अनिधकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले जात असून दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, अतिक्र मण या समस्या वाढल्या आहेत. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहराचे नियोजनच कोलमडले आहे. यासाठी केंद्र शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना, नागरी उपजीविका अभियानांतर्गत फेरीवाल्यांच्या समस्या सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी २०१४ मध्ये फेरीवाला धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते.>स्थायीने मंजुरी दिली पण धोरण शून्यपालिकेच्या स्थायी समितीने २०१५ मध्ये या धोरणासाठी मंजुरी दिली. मात्र त्यानंतरही हे फेरीवाला धोरण तयार झाले नाही, अखेर पाच वर्षांनी पालिकेने हे धोरण तयार केले आणि अचानकपणे बुधवारी झालेल्या महासभेत सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवले. धोरणच तकलादू असल्याने त्याला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. हे धोरण तयार करताना प्रशासनाने कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचे सांगत प्रभाग समिती सभापती, स्थानिक नगरसेवक यांनाही काहीही विचारले नसल्याचे नगरसेवक पंकज ठाकूर यांनी सांगितले.याबाबत माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. फेरीवाल्यांना उपजीविकेचे साधन मिळायला हवे, मात्र नियोजन नसलेले हे धोरण असल्याचे ते म्हणाले. शहरात जागोजागी बेकायदा फेरीवाल्यांचा गराडा पडला आहे. त्याच ठिकाणी फेरीवाला क्षेत्र कसे काय घोषित केले जाऊ शकते, असा गंभीर सवाल त्यांनी केला.>जुन्या पालिकेसमोरच फेरीवाल्यांचे अतिक्र मण !जुन्या पालिकेसमोर बाजार बंद करण्यात आला, मात्र पालिकेच्या मुख्यालयाच्या परिसरातच फेरीवाल्यांनी अतिक्र मण करून तो गिळंकृत केला असल्याचे चित्र आहे,तर ज्या रस्त्यांवरून फेरीवाले हटवा अशी मागणी केली जात होती, तिथेच फेरीवाला क्षेत्र टाकले असेही त्यांनी सांगितले.>धोरणास स्थगिती देण्याची अजीव पाटील यांची मागणीपालिकेतील विद्यमान व हुशार नगरसेवक आजव पाटील यांनीही या धोरणावर जोरजार टीका करताना ज्या ठिकाणी फेरीवाला क्षेत्र दाखवले तेथे रस्ताच नसल्याचे सांगितले. तसेच या फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याची मागणी केली आहे.>धोरण नियोजनशून्यचमहापालिकेतील सत्ताधारी बविआ आणि इतर सेना - भाजपचे नगरसेवक यांनी प्रशासनाने एवढे मोठे धोरण परस्पर कसे ठरवले, असा सज्जड सवाल आयुक्तांना केला. तसेच रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला क्षेत्र ठेवल्याबद्दल जोरदार आक्षेप घेतला. इतर सदस्यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.>आयुक्तांनी दिली स्थगितीसत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी नियोजनशून्य धोरण असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी या धोरणाला तूर्तास स्थगिती दिली आणि सर्वव्यापी असे धोरण नव्याने तयार करून सर्व सूचनांचा विचार करून ते सादर करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.>फेरीवाला धोरण तयार करताना सर्व गोष्टींचा विचार, सर्वेक्षण, आढावा घेतला जाईल. शहर स्वच्छ झालेच पाहिजे ही भूमिका महत्त्वाची आहे, तेव्हा सर्वांना विचारात घेऊन हे धोरण करावे, अशा पूर्वीही सूचना होत्या. यावेळेस सभागृहातील सदस्यांचा विरोध पाहून सर्वांच्या सूचना विचारात घेऊन पुन्हा नव्याने हे धोरण तयार केले जाईल.-बी. जी. पवार, महापालिका आयुक्त,वसई विरार महापालिका, मुख्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरार