शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वनगा परिवार तोडण्याचे पाप उद्धवांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

आम्ही श्रीनिवासला उमेदवारी देणारच होतो. त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा देण्याचे मान्यही केले होते.

जव्हार : वनगा परिवार तोडण्याचे पाप श्रीनिवासला उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याचे फळ त्यांना जनता भोगायला लावेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत केली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी आणि त्यांच्या काळातल्या शिवसेनेने कधीही कुणाच्या पाठीत वार केला नाही. परंतु सध्याच्या शिवसेनेकडून मात्र ते काम जोरात सुरू आहे. कुणाच्याही अश्रूंचे राजकीय भांडवल करू नये हा सभ्यतेचा संकेत आहे. परंतु तोही सध्या शिवसेनेकडून पाळला जात नाही. त्यामुळे जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले.आम्ही श्रीनिवासला उमेदवारी देणारच होतो. त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा देण्याचे मान्यही केले होते. असे असताना अचानक त्यांनी श्रीनिवासची दिशाभूल केली. हा प्रकार वनगांनी आदिवासींच्या कल्याणासाठी जो संघर्ष केला त्याचा अवमान करणारा आहे, असेही ते म्हणाले.गेल्या १५ वर्षांत आदिवासींना जेवढे वनपट्टे दिले गेले नाहीत, तेवढे ते आम्ही साडेतीन वर्षांत दिले. त्यासोबत त्यांना शासकीय योजनांचे लाभही मिळवून दिले, असे ते म्हणाले. आपल्या सत्ताकाळात पालघर जिल्ह्यातील कुपोषण घटले. महाराष्टÑ हागणदारीमुक्त झाला, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना