शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मॉबलिंचिंगवर नियंत्रण आणण्यातील अपयश भोवले; गौरव सिंग सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:47 IST

जमावाकडून तिघांच्या हत्येचे प्रकरण

हितेन नाईक 

पालघर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील मॉबलिंचिंग प्रकरणात तीन निरपराध प्रवाशांना पोलिसांच्या ताब्यात आणि जिवंत असतानाही जमावाने पोलिसांसमोरच ठार मारले. त्याप्रसंगी निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण राखण्यात पोलीस अधीक्षक गौरव सिंग अपयशी ठरल्यानेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.केवळ संशय निर्माण झाल्याने गडचिंचले येथील प्रकार घडला. या प्रकरणातकायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, तसेच पोलीस यंत्रणेचे ‘सुपर व्हिजन’ हाताळण्यात पोलीस अधीक्षकांना अपयश आल्याचे वास्तव समोर आले होते.

याच प्रकरणात सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव काळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे यांच्यासह तीन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आल्याने पोलिसांच्या विरोधात निर्माण झालेले वातावरण काही वेळाने निवळेल, असा कयास पोलीस प्रशासनाकडून बांधला जात होता. परंतु १४ एप्रिल रोजी डॉ. विश्वास वळवी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतरही जिल्ह्यात सुरू असलेल्या अफवांवर नियंत्रण आणण्यात पोलीस अधीक्षक सिंग यांना अपयश आले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी तिघांची निर्घृण हत्या पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते.

या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन लोकांना वाचवण्याचे व जमावावर नियंत्रण आणण्यात उपस्थित पोलिसांसह पोलीस अधीक्षकांचे ‘सुपर व्हिजन स्लॅग’ झाल्याचे दिसल्याची चर्चा खुद्द पोलीस खात्यातच दबक्या आवाजात सुरू होती.घटनेच्या २० दिवसांनंतर गुरुवारी (७ मे) गृहमंत्र्यांनी गडचिंचले येथे भेट देत लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटीचेंबरमध्ये खा. राजेंद्र गावित, आ. श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, सुनील भुसारा आदींशी गृहराज्यमंत्री देशमुख यांनी चर्चा केली. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचा अंदाज आहे. यामुळेच गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यापुढे पालघरचा कार्यभार विक्रांत देशमुख किंवा विजयकांत सागर यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.जिल्ह्यात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्नजिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गृहमंत्र्यांना धारेवर धरले. अफवांमुळे जिल्ह्यात लागोपाठ दोन वेळा जमावाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांनंतर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हाच योग्य ते नियोजन न केल्याने वसई तालुक्यातील निर्मळ येथे एका परप्रांतीयाच्या घरावर ४० ते ५० लोकांच्या जमावाने हल्ला केला. म्हणजेच लोकांमध्ये कायद्याची भीतीच नाही, पोलिसांचे नियंत्रण नसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गृह विभागाचे हे अपयश असल्याची टीका पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. यावर राज्य शासन योग्य निर्णय घेईल, असे गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यानंतर पालघरवरून संध्याकाळी घरी गेल्यानंतर गृहमंत्र्यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याची घोषणा केली.

टॅग्स :MurderखूनAnil Deshmukhअनिल देशमुख