शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

मीरा-भाईंदरमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:41 IST

तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वेगाने चालवण्याची नशा तर अतिशय घातक बनलेली आहे.

- धीरज परब

तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वेगाने चालवण्याची नशा तर अतिशय घातक बनलेली आहे. शर्यती लावणे, दुचाकी चालवताना थरारक प्रकार करणे, वेगाने कट मारत दुचाकी चालवणे यामुळे शहरात अनेक तरुणांचे बळी गेले आहेत. स्टंटबाजांना पकडायला गेले तर दुचाकीस्वार तरुणांच्या जीवावर बेतेल, या काळजीने पोलीसही आक्रमक होत नाहीत. शिवाय, अशा दुचाकीस्वारांमुळे आजूबाजूच्या वाहन वा पादचाऱ्यांचाही अपघात होऊ शकतो.

शहरातील महामार्ग, वरसावेनाका, चेकनाका, काशिमीरानाका, सावरकर चौक, मीरा रोड व भार्इंदर रेल्वेस्थानक परिसर, शांतीनगर, शीतलनगरनाका, मॅक्सस मॉल परिसर, शांतीनगर, शांती गार्डन, भार्इंदर फाटक, खारीगावनाका, गोडदेवनाका, शिवसेना गल्लीनाका, उत्तननाका असे एकदोन नाही तर शहरातील जवळपास सर्वच प्रमुख नाक्यांवर कोंडी असते. नाकेच नव्हे तर प्रमुख रस्त्यांचाही कोंडमारा झालेला आहे.

आज काशिमीरानाका ते सावरकर चौकपर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, नवघर मार्ग, महात्मा फुले मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी एकही मुख्य रस्ता वाहतूक व रहदारीला मोकळा शिल्लक राहिलेला नाही.बेशिस्त व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांसह रस्त्यांवर लागणारी बेशिस्त व बेकायदा पार्किंग, सर्रास लागणाºया हातगाड्या व फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण कोंडीला जबाबदार आहे. रस्त्यांची निकृष्ट कामे व पडणारे खड्डे तर नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत.

शहरात अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवूनही ती सुरू नाही. सिग्नलच्या वेळेचे नीट नियोजन केलेले नाही. दुरुस्तीच्या नावाखाली सिग्नल महिनाभर बंद असल्याचा अनुभव आहे. त्यातही मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सिग्नलचे पालन होत नाही. सिग्नल तोडून पळणे नेहमीचेच झाले आहे. सिग्नल तोडणाºयांवर नियमित कारवाई होत नाही. नाक्यांवर वाहतूक पोलीस असले तरी वॉर्डनना जास्त राबवून घेतले जाते. आज वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले जात असले तरी जे आहेत ते पोलीसही बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर सातत्याने कठोर कारवाई करत नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही.

पार्किंगची सोय करणे, सिग्नल देखभाल दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक, मार्गिका व डिव्हायडरला पट्टे मारणे आदी कामे महापालिकेची असली तरी ती केली जात नाहीत. आज झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच राहिले नसून या पट्ट्यांचा रंग लवकर उडतो तरी कसा, असा प्रश्न नागरिकांना पडतो. गतिरोधक आणि रस्त्यांमध्ये चौकउभारणीचे काम तर नगरसेवक, राजकारणी आपल्या राजकीय फायद्याचा विचार करून वाटेल तिकडे सांगत असतात.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडीMira Bhayanderमीरा-भाईंदर