शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

मीरा-भाईंदरमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:41 IST

तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वेगाने चालवण्याची नशा तर अतिशय घातक बनलेली आहे.

- धीरज परब

तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वेगाने चालवण्याची नशा तर अतिशय घातक बनलेली आहे. शर्यती लावणे, दुचाकी चालवताना थरारक प्रकार करणे, वेगाने कट मारत दुचाकी चालवणे यामुळे शहरात अनेक तरुणांचे बळी गेले आहेत. स्टंटबाजांना पकडायला गेले तर दुचाकीस्वार तरुणांच्या जीवावर बेतेल, या काळजीने पोलीसही आक्रमक होत नाहीत. शिवाय, अशा दुचाकीस्वारांमुळे आजूबाजूच्या वाहन वा पादचाऱ्यांचाही अपघात होऊ शकतो.

शहरातील महामार्ग, वरसावेनाका, चेकनाका, काशिमीरानाका, सावरकर चौक, मीरा रोड व भार्इंदर रेल्वेस्थानक परिसर, शांतीनगर, शीतलनगरनाका, मॅक्सस मॉल परिसर, शांतीनगर, शांती गार्डन, भार्इंदर फाटक, खारीगावनाका, गोडदेवनाका, शिवसेना गल्लीनाका, उत्तननाका असे एकदोन नाही तर शहरातील जवळपास सर्वच प्रमुख नाक्यांवर कोंडी असते. नाकेच नव्हे तर प्रमुख रस्त्यांचाही कोंडमारा झालेला आहे.

आज काशिमीरानाका ते सावरकर चौकपर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, नवघर मार्ग, महात्मा फुले मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी एकही मुख्य रस्ता वाहतूक व रहदारीला मोकळा शिल्लक राहिलेला नाही.बेशिस्त व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांसह रस्त्यांवर लागणारी बेशिस्त व बेकायदा पार्किंग, सर्रास लागणाºया हातगाड्या व फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण कोंडीला जबाबदार आहे. रस्त्यांची निकृष्ट कामे व पडणारे खड्डे तर नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत.

शहरात अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवूनही ती सुरू नाही. सिग्नलच्या वेळेचे नीट नियोजन केलेले नाही. दुरुस्तीच्या नावाखाली सिग्नल महिनाभर बंद असल्याचा अनुभव आहे. त्यातही मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सिग्नलचे पालन होत नाही. सिग्नल तोडून पळणे नेहमीचेच झाले आहे. सिग्नल तोडणाºयांवर नियमित कारवाई होत नाही. नाक्यांवर वाहतूक पोलीस असले तरी वॉर्डनना जास्त राबवून घेतले जाते. आज वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले जात असले तरी जे आहेत ते पोलीसही बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर सातत्याने कठोर कारवाई करत नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही.

पार्किंगची सोय करणे, सिग्नल देखभाल दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक, मार्गिका व डिव्हायडरला पट्टे मारणे आदी कामे महापालिकेची असली तरी ती केली जात नाहीत. आज झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच राहिले नसून या पट्ट्यांचा रंग लवकर उडतो तरी कसा, असा प्रश्न नागरिकांना पडतो. गतिरोधक आणि रस्त्यांमध्ये चौकउभारणीचे काम तर नगरसेवक, राजकारणी आपल्या राजकीय फायद्याचा विचार करून वाटेल तिकडे सांगत असतात.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडीMira Bhayanderमीरा-भाईंदर