शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:41 IST

तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वेगाने चालवण्याची नशा तर अतिशय घातक बनलेली आहे.

- धीरज परब

तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वेगाने चालवण्याची नशा तर अतिशय घातक बनलेली आहे. शर्यती लावणे, दुचाकी चालवताना थरारक प्रकार करणे, वेगाने कट मारत दुचाकी चालवणे यामुळे शहरात अनेक तरुणांचे बळी गेले आहेत. स्टंटबाजांना पकडायला गेले तर दुचाकीस्वार तरुणांच्या जीवावर बेतेल, या काळजीने पोलीसही आक्रमक होत नाहीत. शिवाय, अशा दुचाकीस्वारांमुळे आजूबाजूच्या वाहन वा पादचाऱ्यांचाही अपघात होऊ शकतो.

शहरातील महामार्ग, वरसावेनाका, चेकनाका, काशिमीरानाका, सावरकर चौक, मीरा रोड व भार्इंदर रेल्वेस्थानक परिसर, शांतीनगर, शीतलनगरनाका, मॅक्सस मॉल परिसर, शांतीनगर, शांती गार्डन, भार्इंदर फाटक, खारीगावनाका, गोडदेवनाका, शिवसेना गल्लीनाका, उत्तननाका असे एकदोन नाही तर शहरातील जवळपास सर्वच प्रमुख नाक्यांवर कोंडी असते. नाकेच नव्हे तर प्रमुख रस्त्यांचाही कोंडमारा झालेला आहे.

आज काशिमीरानाका ते सावरकर चौकपर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, नवघर मार्ग, महात्मा फुले मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी एकही मुख्य रस्ता वाहतूक व रहदारीला मोकळा शिल्लक राहिलेला नाही.बेशिस्त व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांसह रस्त्यांवर लागणारी बेशिस्त व बेकायदा पार्किंग, सर्रास लागणाºया हातगाड्या व फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण कोंडीला जबाबदार आहे. रस्त्यांची निकृष्ट कामे व पडणारे खड्डे तर नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत.

शहरात अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवूनही ती सुरू नाही. सिग्नलच्या वेळेचे नीट नियोजन केलेले नाही. दुरुस्तीच्या नावाखाली सिग्नल महिनाभर बंद असल्याचा अनुभव आहे. त्यातही मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सिग्नलचे पालन होत नाही. सिग्नल तोडून पळणे नेहमीचेच झाले आहे. सिग्नल तोडणाºयांवर नियमित कारवाई होत नाही. नाक्यांवर वाहतूक पोलीस असले तरी वॉर्डनना जास्त राबवून घेतले जाते. आज वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले जात असले तरी जे आहेत ते पोलीसही बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर सातत्याने कठोर कारवाई करत नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही.

पार्किंगची सोय करणे, सिग्नल देखभाल दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक, मार्गिका व डिव्हायडरला पट्टे मारणे आदी कामे महापालिकेची असली तरी ती केली जात नाहीत. आज झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच राहिले नसून या पट्ट्यांचा रंग लवकर उडतो तरी कसा, असा प्रश्न नागरिकांना पडतो. गतिरोधक आणि रस्त्यांमध्ये चौकउभारणीचे काम तर नगरसेवक, राजकारणी आपल्या राजकीय फायद्याचा विचार करून वाटेल तिकडे सांगत असतात.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडीMira Bhayanderमीरा-भाईंदर