शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या भूखंडावर अतिक्रमण

By admin | Updated: December 16, 2015 00:25 IST

या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली

- हितेन नाईक,  पालघरया शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली जागा रिक्षावाले खाजगी वाहनधारक, भाजी विक्रेत्यांनी बळकावली आहे. अनधिकृत खाजगी वाहतुकीमधून महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याच्या हव्यासापोटी गरीबांच्या जीवनवाहिनीचा कणा मोडण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एस.टी व खाजगी वाहतुकीमध्ये सुवर्णमध्य साधावा अशी मागणी केली जात आहे.पालघरमध्ये १ जून १९५२ पासून सुरू झालेल्या एस.टी सेवेने अल्पावधीतच त्यावेळच्या खाजगी सेवेकडून प्रवासीवर्गाला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले होते. सन १८७० च्या सुमारास त्यावेळच्या बॉम्बे बडोदा व सेंट्रल इंडीया रेल्वे सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुंबई महानगरपालिकेने जनतेच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन बाजूची २ कि. मी. ची जागा रेल्वेला उपलब्ध करून दिली होती व त्यातला काही एस.टीला दिल्याने सन १९५२ पासून पालघरमध्ये एस.टी सेवा सुरू झाली. कालांतराने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात एस.टी.ला स्वीकारल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला जागेची कमतरता भासू लागली. त्यानंतर राज्यपालांच्या परिपत्रकानुसार २३जानेवारी १९९८ ला नवीन बस स्थानक सुरू होईपर्यंत ६३२ चौ. मीटरची जागा स्टेशनजवळ उपलब्ध करून देण्यात आली. तत्कालीन खासदार व उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या खासदार निधीमधून चार लाख खर्च करून त्या जागेत प्रवासी निवाराशेडही बांधण्यात आल्याने मोठ्या जोमाने बससेवा सुरू झाल्याचे माहीम सेवा समितीचे अध्यक्ष जयवंत चौधरी यांनी लोकमतला सांगितले. दरम्यानच्या काळात शहरातील वाहतुक सुरळीत करण्याच्या नावाखाली प्रथम स्टेशन जवळच्या टपऱ्या तोडून त्यांचे १ कि. मी. लांब मनोर रोडवर पुनर्वसन करण्यातआले होते. पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मितीच्या संकेतामुळे पालघर रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा पालघर नगरपालिकेसह प्रशासनाने दुसरा घाला घातला तो गरीबांच्या एस.टी सेवेवर. सन २०११ मध्ये पालघर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालघर एस.टी विभागाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावून शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडविण्याच्या नावाखाली रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडून होणारी बससेवा पूर्वेकडील एस.टी विभागाच्या जागेतून १९ डिसेंबर २०११पासून सुरू करण्यास बजावले. यामध्ये नंतरच्या काळात झालेल्या बैठकीनुसार सातपाटी, केळवा, वडराई, खुताडपाडा, बोईसर इ. मोजक्याच फेऱ्या स्टेशन परिसरातून सोडून बाकी सर्व मध्यम पल्ला व लांब पल्ल्याच्या बसेस पालघर आगारातून (१कि. मी.लांबून) सोडण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.महिनाकाठी २ कोटी १० लाखांचा तोटा खाजगी वाहनधारकांचे हित व महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयाने पालघर आगाराचे आर्थिक गणितच कोलमडून पडल्याचे एस.टी विभागाचे म्हणणे आहे. आज आमच्या ६८० बस फेऱ्याच्या दररोजच्या २१ हजार कि. मी. च्या पल्ल्यामधून दररोज २ लाख असा महिनाकाठी २ कोटी १० लाखाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे पालघर डेपो कार्यालयाने सांगितले. याला कोणाचा आशिर्वाद ?पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागेमधून एस.टीला तडीपार केले. आज त्याच ठिकाणी ३ व ६ आसनी रिक्षा उभ्या आहेत. यातील अनेक रिक्षा अनधिकृत असल्याने याला कोणाचा आशिर्वाद आहे? असा प्रश्न आहे. एस.टी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आर्थिक कंबरडे मोडून खाजगी वाहतुकीला छुपा पाठींबा देणाऱ्यांचा बुरखा उघड करणे गरजेचे असून एस.टी. वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे मत सेवा समितीचे अध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केले आहे. परिवहन मंत्र्याशी पत्रव्यवहारएस.टी. वाचविण्यासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी, युती सरकारचे उंबरठे झिजवत असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहारही सुरू केल्याचे सांगितले. प्रशासनाने तीन वर्षे विविध उपाययोजना केल्यात. एस.टीच्या रिकामी केलेली जागा खाजगी वाहतुक व फेरीवाले यांना देवून कुणाचे हात ओले झाले, याचा शोध जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी घ्यायला हवा व अनधिकृत रिक्षा, फेरीवाले यांना हटवून एस.टी व रिक्षा यांचा समन्वय साधून दोघांकडून प्रवाशांना कशी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कराव, अशी प्रवाशांची मागणी आहे.