शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

एसटीच्या भूखंडावर अतिक्रमण

By admin | Updated: December 16, 2015 00:25 IST

या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली

- हितेन नाईक,  पालघरया शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली जागा रिक्षावाले खाजगी वाहनधारक, भाजी विक्रेत्यांनी बळकावली आहे. अनधिकृत खाजगी वाहतुकीमधून महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याच्या हव्यासापोटी गरीबांच्या जीवनवाहिनीचा कणा मोडण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एस.टी व खाजगी वाहतुकीमध्ये सुवर्णमध्य साधावा अशी मागणी केली जात आहे.पालघरमध्ये १ जून १९५२ पासून सुरू झालेल्या एस.टी सेवेने अल्पावधीतच त्यावेळच्या खाजगी सेवेकडून प्रवासीवर्गाला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले होते. सन १८७० च्या सुमारास त्यावेळच्या बॉम्बे बडोदा व सेंट्रल इंडीया रेल्वे सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुंबई महानगरपालिकेने जनतेच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन बाजूची २ कि. मी. ची जागा रेल्वेला उपलब्ध करून दिली होती व त्यातला काही एस.टीला दिल्याने सन १९५२ पासून पालघरमध्ये एस.टी सेवा सुरू झाली. कालांतराने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात एस.टी.ला स्वीकारल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला जागेची कमतरता भासू लागली. त्यानंतर राज्यपालांच्या परिपत्रकानुसार २३जानेवारी १९९८ ला नवीन बस स्थानक सुरू होईपर्यंत ६३२ चौ. मीटरची जागा स्टेशनजवळ उपलब्ध करून देण्यात आली. तत्कालीन खासदार व उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या खासदार निधीमधून चार लाख खर्च करून त्या जागेत प्रवासी निवाराशेडही बांधण्यात आल्याने मोठ्या जोमाने बससेवा सुरू झाल्याचे माहीम सेवा समितीचे अध्यक्ष जयवंत चौधरी यांनी लोकमतला सांगितले. दरम्यानच्या काळात शहरातील वाहतुक सुरळीत करण्याच्या नावाखाली प्रथम स्टेशन जवळच्या टपऱ्या तोडून त्यांचे १ कि. मी. लांब मनोर रोडवर पुनर्वसन करण्यातआले होते. पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मितीच्या संकेतामुळे पालघर रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा पालघर नगरपालिकेसह प्रशासनाने दुसरा घाला घातला तो गरीबांच्या एस.टी सेवेवर. सन २०११ मध्ये पालघर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालघर एस.टी विभागाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावून शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडविण्याच्या नावाखाली रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडून होणारी बससेवा पूर्वेकडील एस.टी विभागाच्या जागेतून १९ डिसेंबर २०११पासून सुरू करण्यास बजावले. यामध्ये नंतरच्या काळात झालेल्या बैठकीनुसार सातपाटी, केळवा, वडराई, खुताडपाडा, बोईसर इ. मोजक्याच फेऱ्या स्टेशन परिसरातून सोडून बाकी सर्व मध्यम पल्ला व लांब पल्ल्याच्या बसेस पालघर आगारातून (१कि. मी.लांबून) सोडण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.महिनाकाठी २ कोटी १० लाखांचा तोटा खाजगी वाहनधारकांचे हित व महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयाने पालघर आगाराचे आर्थिक गणितच कोलमडून पडल्याचे एस.टी विभागाचे म्हणणे आहे. आज आमच्या ६८० बस फेऱ्याच्या दररोजच्या २१ हजार कि. मी. च्या पल्ल्यामधून दररोज २ लाख असा महिनाकाठी २ कोटी १० लाखाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे पालघर डेपो कार्यालयाने सांगितले. याला कोणाचा आशिर्वाद ?पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागेमधून एस.टीला तडीपार केले. आज त्याच ठिकाणी ३ व ६ आसनी रिक्षा उभ्या आहेत. यातील अनेक रिक्षा अनधिकृत असल्याने याला कोणाचा आशिर्वाद आहे? असा प्रश्न आहे. एस.टी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आर्थिक कंबरडे मोडून खाजगी वाहतुकीला छुपा पाठींबा देणाऱ्यांचा बुरखा उघड करणे गरजेचे असून एस.टी. वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे मत सेवा समितीचे अध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केले आहे. परिवहन मंत्र्याशी पत्रव्यवहारएस.टी. वाचविण्यासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी, युती सरकारचे उंबरठे झिजवत असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहारही सुरू केल्याचे सांगितले. प्रशासनाने तीन वर्षे विविध उपाययोजना केल्यात. एस.टीच्या रिकामी केलेली जागा खाजगी वाहतुक व फेरीवाले यांना देवून कुणाचे हात ओले झाले, याचा शोध जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी घ्यायला हवा व अनधिकृत रिक्षा, फेरीवाले यांना हटवून एस.टी व रिक्षा यांचा समन्वय साधून दोघांकडून प्रवाशांना कशी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कराव, अशी प्रवाशांची मागणी आहे.