शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या भूखंडावर अतिक्रमण

By admin | Updated: December 16, 2015 00:25 IST

या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली

- हितेन नाईक,  पालघरया शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली जागा रिक्षावाले खाजगी वाहनधारक, भाजी विक्रेत्यांनी बळकावली आहे. अनधिकृत खाजगी वाहतुकीमधून महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याच्या हव्यासापोटी गरीबांच्या जीवनवाहिनीचा कणा मोडण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एस.टी व खाजगी वाहतुकीमध्ये सुवर्णमध्य साधावा अशी मागणी केली जात आहे.पालघरमध्ये १ जून १९५२ पासून सुरू झालेल्या एस.टी सेवेने अल्पावधीतच त्यावेळच्या खाजगी सेवेकडून प्रवासीवर्गाला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले होते. सन १८७० च्या सुमारास त्यावेळच्या बॉम्बे बडोदा व सेंट्रल इंडीया रेल्वे सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुंबई महानगरपालिकेने जनतेच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन बाजूची २ कि. मी. ची जागा रेल्वेला उपलब्ध करून दिली होती व त्यातला काही एस.टीला दिल्याने सन १९५२ पासून पालघरमध्ये एस.टी सेवा सुरू झाली. कालांतराने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात एस.टी.ला स्वीकारल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला जागेची कमतरता भासू लागली. त्यानंतर राज्यपालांच्या परिपत्रकानुसार २३जानेवारी १९९८ ला नवीन बस स्थानक सुरू होईपर्यंत ६३२ चौ. मीटरची जागा स्टेशनजवळ उपलब्ध करून देण्यात आली. तत्कालीन खासदार व उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या खासदार निधीमधून चार लाख खर्च करून त्या जागेत प्रवासी निवाराशेडही बांधण्यात आल्याने मोठ्या जोमाने बससेवा सुरू झाल्याचे माहीम सेवा समितीचे अध्यक्ष जयवंत चौधरी यांनी लोकमतला सांगितले. दरम्यानच्या काळात शहरातील वाहतुक सुरळीत करण्याच्या नावाखाली प्रथम स्टेशन जवळच्या टपऱ्या तोडून त्यांचे १ कि. मी. लांब मनोर रोडवर पुनर्वसन करण्यातआले होते. पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मितीच्या संकेतामुळे पालघर रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा पालघर नगरपालिकेसह प्रशासनाने दुसरा घाला घातला तो गरीबांच्या एस.टी सेवेवर. सन २०११ मध्ये पालघर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालघर एस.टी विभागाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावून शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडविण्याच्या नावाखाली रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडून होणारी बससेवा पूर्वेकडील एस.टी विभागाच्या जागेतून १९ डिसेंबर २०११पासून सुरू करण्यास बजावले. यामध्ये नंतरच्या काळात झालेल्या बैठकीनुसार सातपाटी, केळवा, वडराई, खुताडपाडा, बोईसर इ. मोजक्याच फेऱ्या स्टेशन परिसरातून सोडून बाकी सर्व मध्यम पल्ला व लांब पल्ल्याच्या बसेस पालघर आगारातून (१कि. मी.लांबून) सोडण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.महिनाकाठी २ कोटी १० लाखांचा तोटा खाजगी वाहनधारकांचे हित व महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयाने पालघर आगाराचे आर्थिक गणितच कोलमडून पडल्याचे एस.टी विभागाचे म्हणणे आहे. आज आमच्या ६८० बस फेऱ्याच्या दररोजच्या २१ हजार कि. मी. च्या पल्ल्यामधून दररोज २ लाख असा महिनाकाठी २ कोटी १० लाखाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे पालघर डेपो कार्यालयाने सांगितले. याला कोणाचा आशिर्वाद ?पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागेमधून एस.टीला तडीपार केले. आज त्याच ठिकाणी ३ व ६ आसनी रिक्षा उभ्या आहेत. यातील अनेक रिक्षा अनधिकृत असल्याने याला कोणाचा आशिर्वाद आहे? असा प्रश्न आहे. एस.टी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आर्थिक कंबरडे मोडून खाजगी वाहतुकीला छुपा पाठींबा देणाऱ्यांचा बुरखा उघड करणे गरजेचे असून एस.टी. वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे मत सेवा समितीचे अध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केले आहे. परिवहन मंत्र्याशी पत्रव्यवहारएस.टी. वाचविण्यासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी, युती सरकारचे उंबरठे झिजवत असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहारही सुरू केल्याचे सांगितले. प्रशासनाने तीन वर्षे विविध उपाययोजना केल्यात. एस.टीच्या रिकामी केलेली जागा खाजगी वाहतुक व फेरीवाले यांना देवून कुणाचे हात ओले झाले, याचा शोध जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी घ्यायला हवा व अनधिकृत रिक्षा, फेरीवाले यांना हटवून एस.टी व रिक्षा यांचा समन्वय साधून दोघांकडून प्रवाशांना कशी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कराव, अशी प्रवाशांची मागणी आहे.