शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

एसटीच्या भूखंडावर अतिक्रमण

By admin | Updated: December 16, 2015 00:25 IST

या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली

- हितेन नाईक,  पालघरया शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली जागा रिक्षावाले खाजगी वाहनधारक, भाजी विक्रेत्यांनी बळकावली आहे. अनधिकृत खाजगी वाहतुकीमधून महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याच्या हव्यासापोटी गरीबांच्या जीवनवाहिनीचा कणा मोडण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एस.टी व खाजगी वाहतुकीमध्ये सुवर्णमध्य साधावा अशी मागणी केली जात आहे.पालघरमध्ये १ जून १९५२ पासून सुरू झालेल्या एस.टी सेवेने अल्पावधीतच त्यावेळच्या खाजगी सेवेकडून प्रवासीवर्गाला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले होते. सन १८७० च्या सुमारास त्यावेळच्या बॉम्बे बडोदा व सेंट्रल इंडीया रेल्वे सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुंबई महानगरपालिकेने जनतेच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन बाजूची २ कि. मी. ची जागा रेल्वेला उपलब्ध करून दिली होती व त्यातला काही एस.टीला दिल्याने सन १९५२ पासून पालघरमध्ये एस.टी सेवा सुरू झाली. कालांतराने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात एस.टी.ला स्वीकारल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला जागेची कमतरता भासू लागली. त्यानंतर राज्यपालांच्या परिपत्रकानुसार २३जानेवारी १९९८ ला नवीन बस स्थानक सुरू होईपर्यंत ६३२ चौ. मीटरची जागा स्टेशनजवळ उपलब्ध करून देण्यात आली. तत्कालीन खासदार व उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या खासदार निधीमधून चार लाख खर्च करून त्या जागेत प्रवासी निवाराशेडही बांधण्यात आल्याने मोठ्या जोमाने बससेवा सुरू झाल्याचे माहीम सेवा समितीचे अध्यक्ष जयवंत चौधरी यांनी लोकमतला सांगितले. दरम्यानच्या काळात शहरातील वाहतुक सुरळीत करण्याच्या नावाखाली प्रथम स्टेशन जवळच्या टपऱ्या तोडून त्यांचे १ कि. मी. लांब मनोर रोडवर पुनर्वसन करण्यातआले होते. पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मितीच्या संकेतामुळे पालघर रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा पालघर नगरपालिकेसह प्रशासनाने दुसरा घाला घातला तो गरीबांच्या एस.टी सेवेवर. सन २०११ मध्ये पालघर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालघर एस.टी विभागाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावून शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडविण्याच्या नावाखाली रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडून होणारी बससेवा पूर्वेकडील एस.टी विभागाच्या जागेतून १९ डिसेंबर २०११पासून सुरू करण्यास बजावले. यामध्ये नंतरच्या काळात झालेल्या बैठकीनुसार सातपाटी, केळवा, वडराई, खुताडपाडा, बोईसर इ. मोजक्याच फेऱ्या स्टेशन परिसरातून सोडून बाकी सर्व मध्यम पल्ला व लांब पल्ल्याच्या बसेस पालघर आगारातून (१कि. मी.लांबून) सोडण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.महिनाकाठी २ कोटी १० लाखांचा तोटा खाजगी वाहनधारकांचे हित व महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयाने पालघर आगाराचे आर्थिक गणितच कोलमडून पडल्याचे एस.टी विभागाचे म्हणणे आहे. आज आमच्या ६८० बस फेऱ्याच्या दररोजच्या २१ हजार कि. मी. च्या पल्ल्यामधून दररोज २ लाख असा महिनाकाठी २ कोटी १० लाखाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे पालघर डेपो कार्यालयाने सांगितले. याला कोणाचा आशिर्वाद ?पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागेमधून एस.टीला तडीपार केले. आज त्याच ठिकाणी ३ व ६ आसनी रिक्षा उभ्या आहेत. यातील अनेक रिक्षा अनधिकृत असल्याने याला कोणाचा आशिर्वाद आहे? असा प्रश्न आहे. एस.टी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आर्थिक कंबरडे मोडून खाजगी वाहतुकीला छुपा पाठींबा देणाऱ्यांचा बुरखा उघड करणे गरजेचे असून एस.टी. वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे मत सेवा समितीचे अध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केले आहे. परिवहन मंत्र्याशी पत्रव्यवहारएस.टी. वाचविण्यासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी, युती सरकारचे उंबरठे झिजवत असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहारही सुरू केल्याचे सांगितले. प्रशासनाने तीन वर्षे विविध उपाययोजना केल्यात. एस.टीच्या रिकामी केलेली जागा खाजगी वाहतुक व फेरीवाले यांना देवून कुणाचे हात ओले झाले, याचा शोध जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी घ्यायला हवा व अनधिकृत रिक्षा, फेरीवाले यांना हटवून एस.टी व रिक्षा यांचा समन्वय साधून दोघांकडून प्रवाशांना कशी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कराव, अशी प्रवाशांची मागणी आहे.