शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीवर भर द्या'; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 12:13 IST

पालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे तारापूर येथील नांदबादेवी मंदिरात  'तृणधान्याचे फायदे' या विषयावर  शेतकरी वर्गात जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला.

पालघर: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे निमित्त साधून पालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे तारापूर येथील नांदबादेवी मंदिरात 'तृणधान्याचे फायदे' या विषयावर  शेतकरी वर्गात जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला.

पौष्टिक तृणधान्यात ज्वारी, बाजारी, नाचणी, वरई, राळा, कोद्रा, कुटकी, सावा, राजगिरा व इतर पिकांचा समावेश होतो. मात्र, लहान मुले, मुली, गर्भवती स्त्रिया यांना सध्या या पोषणयुक्त आहारापासून दुरावत चालले आहेत. तृणधान्य पिकांच्या लागवडीबरोबरच त्यांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून आहारातील पौष्टिकतेचे प्रमाण वाढविण्यासाठी, कृषी विभागातर्फे असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शेतकरी वर्गाने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व जाणून घ्यायला हवे, असे मत यावेळी कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक सी.व्ही. मोकाशी यांनी व्यक्त केले.

'आजच्या तरुणांची जंकफूडला अधिक पसंती असते, परंतु त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. त्यामुळे शीतपेये, बाहेरचे पदार्थ, जंकफूड आदींचे सेवन न करता पौष्टिक तृणधान्ये सेवन करा व इतरांनाही त्याचे महत्त्व पटवून द्या,' असे आवाहन नांदगाव तर्फे तारापूर गावातील सरपंच समीर मोरे यांनी शेतकरी बंधू भगिनींना आपल्या भाषणात केले. तसेच पौष्टिक तृणधान्याच्या सेवनामुळे विविध आजारांना प्रतिबंध करता येतो, त्यामुळे तृणधान्याचा आहारात आवर्जून समावेश करावा, असे आवाहन कृषि सहाय्यक तनुजा मुकणे यांनी केले.

कृषी सहाय्यक रेखा पाटील, प्रितम गोवारी व गावाचे कृषी सहाय्यक योगेश साळुंके यांनी पौष्टिक तृणधान्यचे पंचनसंस्थेवरील फायदे सांगितले. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्.या विविध योजनेद्वारे तृणधान्य उत्पादन व लागणारी बाजारपेठ कशी उपलब्ध करून घेता येईल याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, तेजस्वी घरत, दीपा पाटील, गावातील विविध गटाचे गट प्रमुख व महिला व पुरुष शेतकरी वर्गही उपस्थित होते .

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रpalgharपालघर