शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियांविरोधात एल्गार !

By admin | Updated: July 14, 2016 01:35 IST

किल्लाबंदर-पाचूबंदर समुद्रात होत असलेल्या रेती उत्खननावर कडक कारवाई झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा कोळी युवा शक्तीने दिला आहे

वसई : किल्लाबंदर-पाचूबंदर समुद्रात होत असलेल्या रेती उत्खननावर कडक कारवाई झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा कोळी युवा शक्तीने दिला आहे. ही संघटना गेल्या दहा वर्षांपासून रेती उत्खननाविरोधात लढत असून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिने बंदी हुकुमही आणला होता. मात्र त्यानंतरही रेती उत्खनन सुरुच असल्याने गावकरी रस्त्यावर उतरणार आहेत.किल्लाबंदर-पाचूबंदर येथील किनाऱ्यावर होत असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाविरोधात मागील एक दशकापासून कोळी युवा शक्तीचा लढा सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, मेरी टाईम बोर्ड तसेच पर्यावरण विभागाला वांरवार पत्रव्यहाराव्दारे सूचित केल्या नंतरही येथील किनाऱ्याची होत असलेली धूप लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने जून २००६ मध्ये रेती उत्खनन करण्यास बंदी घातली होती. तरीही उत्खनन सुरूच राहिल्याने येथील कोळी समाजाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दि. १७ जून २०१० रोजी भार्इंदर पुलाच्या पश्चिमेस अनधिकृत रेती उत्खनन करण्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला. मात्र आजही या ठिकाणी उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून सुमारे ५० च्यावर पडाव दररोज दिवस-रात्र रेती उत्खनन करीत आहेत. यामुळे संपूर्ण किनाऱ्याची वाताहत झाली असून अनेक घरे समुद्राने गिळंकृत केली आहेत. गेल्यावर्षी खोल समुद्रात ओएनजीसी या कंपनीने तेल संशोधन सुरू केल्यामुळे मागील एक वर्षांपासून मासेमारीचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यातच याठिकाणच्या किनाऱ्यावर मत्स्य प्रजननाच्या काळातही दिवस-रात्र होत असलेल्या रेती उत्खननामुळे खाडीत पूर्वी मिळणाऱ्या बोय, कोळंबी, खेकडे तसेच इतर मत्स्यप्रजातींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तसेच सुरुंच्या बागेतील झाडे जमिनीची धूप झाल्याने वाहून जात आहेत. शिवाय रेती उत्खनन करणाऱ्या अनेक पडावावर रजिस्टे्रशन क्रमांकच नाही आणि ही बाब सागरी सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे. मात्र याबाबत वसईच्या तहसीलदाराना प्रत्यक्ष भेटून व निवेदनाव्दारे कळवूनही कारवाई करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याबाबत गेल्याच आठवड्यात संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेचे कार्याध्यक्ष मिल्टन सौदीया यांच्या नेतृत्वाखाली सुनिल दरपाळकर, प्रेम जान, नितीन बाठ्या, जोनास खांडळ्या, संजय मानकर यांनी वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांची भेट असता एक धक्कादाक बाब उघडकीस आली. पाचूबंदर किनाऱ्यावर होत असलेल्या रेती उपसाबाबत विविध वर्तमानपत्रात फोटोसहित बऱ्याच वेळा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी जाधव यांनी पाचूबंदर किनाऱ्यावर रेती उपसाच होत नसल्याचा अजब अहवाल दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कोळी युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना चांगलेच धारेवर धरले व प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता या ठिकाणच्या किनाऱ्याची वाट लावणाऱ्या वाळू माफियावर तातडीने कारवाई न केल्यास कोळी युवा शक्तीच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर समस्त कोळी बांधव धडक मोर्चा नेतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी दिला आहे.