शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

नालासोपारा-वसई दरम्यान परेवर होतात सर्वाधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:13 IST

पश्चिम रेल्वेवर नालासोपारा आणि वसई या दोन स्टेशनदरम्यान सर्वाधिक अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसई : पश्चिम रेल्वेवर नालासोपारा आणि वसई या दोन स्टेशनदरम्यान सर्वाधिक अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते मीरा रोड दरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या साधारण ३३ ने घटली आहे. दरम्यान, नालासोपारामधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. परिणामी प्रवाशांना लोकलमध्ये चढणे अत्यंत जिकिरीचे आणि धोकादायक झाले आहे.वसई लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या वैतरणा, विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भार्इंदर आणि मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान २०१९ मध्ये तब्बल २१३ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना, गर्दीतून पडून, नैसर्गिक तसेच ओव्हरहेड वायरला शॉक लागून झाले आहेत. तर यात ५६ प्रवाशांचा मृत्यू गर्दीच्या वेळी गाडीतून खाली पडून झाला आहे.नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान सर्वाधिक मृत्यू झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. वैतरणा ते मीरारोडमधील स्थानकांपैकी नालासोपारा रेल्वे स्थानकातून सर्वांत जास्त प्रवासी हे दररोज प्रवास करतात. नालासोपारा परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत आहे. परिणामी प्रवाशांना लोकलमध्ये चढणे अत्यंत जिकिरीचे व धोकादायक झाले आहे. सकाळच्या वेळी कसरत करून विरारवरून डाऊन येऊन आम्हाला गाडी पकडावी लागते, असे प्रवासी वर्गाकडून सांगण्यात येते, परंतु वसई व नायगाव स्थानकांमध्ये गाडीच्या आत शिरणेच अशक्य झाल्याने दारात लटकत प्रवास करावा लागतो. यामध्ये अनेकदा प्रवासी तोल जाऊन गाडीच्या खाली पडतात. ही समस्या महिलांच्या डब्यात सर्वाधिक जाणवते. अशा घडना टाळण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना शिस्तीचे धडे अथवा अशा हुल्लंडबाजावर कडक कारवाई देण्याची गरज असल्याचे मत वसई-विरारमधील अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.>प्रवासी नियम पाळत नाहीत!रेल्वे प्रवाशांनी रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वेतर्फे विविध उपाययोजना करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. रेल्वे रूळ ओलांडताना २०१९ या वर्षात तब्बल ११० जणांना आपला जीव गमवला आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदेशीरच नव्हे तर धोकादायकही आहे. मात्र लवकर पोहोचण्यासाठी, जिने ओलांडायचा कंटाळा येतो म्हणून अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढलेले आहे. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातर्फे विविध मोहिमा राबविल्या जातात. रेल्वेनेही प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पूल, सुरक्षा रक्षक जाळी, पादचारी उड्डाणपूल भुयारी मार्ग बनविले आहेत. परंतु प्रवाशांची रूळ ओलांडण्याची सवय बंद होण्याची चिन्हे दिसत नाही. दरम्यान, २०१८ मध्ये २४६ अपघाती मृत्यू आणि २०१९ मध्ये २१३ मृत्यू झाले.>वैतरणा ते मीरा रोडदरम्यानझालेले अपघाती मृत्यूजानेवारी - १०फेब्रुवारी - २०मार्च - १८एप्रिल - २१मे - १३जून - १९जुलै - १९आॅगस्ट - १९सप्टेंबर - १५आॅक्टोबर - १७नोव्हेंबर - २३डिसेंबर - १९