शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

‘वॉटर व्हील’मुळे महिलांच्या डोक्यावरील ओझे झाले कमी; पाण्याची वाहतूक झाली सोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 09:34 IST

ग्रामीण भागात पाणीटंचाईग्रस्त भागात होतोय सर्रास वापर

हुसेन मेमन, लोकमत न्यूज नेटवर्क, जव्हार: अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून जव्हारची ओळख आहे. येथील डोंगर, दरी-कपारीत लोकवस्ती वसलेली आहे. या भागातील उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई नेहमीच भासते. त्यामुळे महिलांना अनेक किमीवरून पाण्याचे हंडे भरून डोक्यावरून वाहावे लागतात. यावर मात करण्यासाठी आता ‘वॉटर व्हील’ उपलब्ध झाले आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरचे ओझे कमी झाले असून, किमान दोन-तीन हंडे पाण्याची सहज वाहतूक करणे सोपे होत आहे.

सरकारी तरतूद नसल्याने व व्हीलची किंमत जास्त असल्याने गरीब आदिवासी लोकांना खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे सामजिक संस्थांच्या वाटपावरून येथील गरजूंना निर्भर राहावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वॉटर व्हीलने पाणी वाहतूक करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लांबहून पाणी वाहतूक करणाऱ्या गावपाड्यांना याचा फायदा होत आहे. वॉटर व्हीलची साधारण ४५ लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. 

  • अशी आहे रचना

-वॉटर व्हील प्रत्यक्षात आफ्रिका देशातून भारतात विकसित झाली आहे. ही पद्धत आधी तिथे अवलंबली गेली, त्याला यश मिळाल्याने भारतात त्याची प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या मोठ्या निर्मात्या कंपन्यांनी विकसित करून बाजारात उपलब्ध करून दिली आहे. -साधारण या वॉटर व्हीलची किंमत चार हजारांपर्यंत आहे. पाणी भरताना एका बाजूला झाकण देण्यात आले असून, त्यात पाणी भरून टायरसारखे ढकलत थेट पाणी घरापर्यंत नेता येते. वाहतुकीस सोपे असल्याने याला जास्त पसंती दिली जात आहे. -वॉटर व्हीलमुळे ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त भागात याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, सरकारकडून अद्याप वॉटर व्हीलसाठी वेगळी तरतूद नसल्यामुळे सामाजिक संस्थांच्या माध्यमांची वाट बघावी लागत आहे.

उच्च दर्जाचे जाड प्लास्टिक पावडर कोटेड कोट वापरून गोल आकार देऊन टायरसारखे ड्रम बनवून त्याला हाताने ढकलण्यासाठी दोन्ही बाजूंनी लोखंडी गोल पाइपद्वारे हॅण्डल तयार करण्यात आले आहेत. वॉटर व्हील हा मानवी पाणी पिण्यासाठी उच्च घनता पॉलिथिलिनचा वापर करून तयार करण्यात आला आहे. जेणेकरून यातून आणलेले पाणी शुद्ध व मानवी जीवनात योग्य राहील.

टंचाईग्रस्त भाग व लांब-लांबहून पाणी वाहतूक करणाऱ्या गावपाड्यांना वॉटर व्हीलची खूपच गरज आहे. शासनाने वॉटर व्हीलसाठी वेगळी तरतूद करावी. यामुळे ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल.- सुरेश गवळी, ग्रामस्थ, शिरोशी, जव्हार

टॅग्स :palgharपालघरWaterपाणी