शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने दीड महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 06:29 IST

आदिवासी पाड्यांवर सुविधांचा दुष्काळ

वाडा/विक्रमगड (जि. पालघर) : गारगाई व पिंजाळ नदी बेटावर असलेल्या म्हसेपाडा येथील दीड महिन्याच्या चिमुकलीला रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.    लावण्या नरेश चव्हाण (वय ४२ दिवस) असे या बालिकेचे नाव आहे.

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचा आरोप होत आहे.  वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर तसेच गारगाई व पिंजाळ नदीच्या बेटावर म्हसेपाडा हे गाव आहे. गावाची लोकसंख्या अवघी २०० च्या आसपास आहे. वाडा येथे ग्रामीण रुग्णालय व विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते या आदिवासी पाड्यापासून दूर आहे. लावण्याला सोमवारी रात्री ताप आला होता. कुटुंबियांनी घरगुती उपचार केले, मात्र त्यानंतर तिला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे पहाटे तिला पायवाटेने मलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. न्यूमोनियाने हे बाळ दगावल्याची माहिती विक्रमगडचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप निंबाळकर यांनी दिली.  

रुग्णाला न्यावे लागते डोलीत पाड्यावर रस्ता नसल्याने बाजार, शाळा-महाविद्यालय व रुग्णालयात जाण्यासाठी नागरिकांना पायी प्रवासा करावा लागतो. अजूनही पाड्यावर रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णाला डोलीत न्यावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाने अनेकांना जीव गमवावा लागतो.   

पाड्यावरील नदीपात्रात पुलाची मागणी मागील वर्षी करण्यात आली होती, परंतु पूल मंजूर झालेला नाही.- एस. एम. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता