शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतुकीमुळे पिंजाळ नदीवरील पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:54 IST

वर्सोवा पुलाच्या दुरु स्तीच्या कामामुळे गुजरातकडून मुंबईला जाणारी अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्यमहामार्गावर वळविण्यात आली आहे.

वाडा : वर्सोवा पुलाच्या दुरु स्तीच्या कामामुळे गुजरातकडून मुंबईला जाणारी अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्यमहामार्गावर वळविण्यात आली आहे. या महामार्गावरील पिंजाळी नदीवर असलेला जुना पुल धोकादायक असताना आता पुलावरु न मोठ्या संख्येने अवजड वाहतूक वाढल्याने हा धोका वाढला आहे.मुंबई, न्हावाशेवा या बंदराकडे दररोज ४० ते ६० मेट्रिक टनाचे सामान घेऊन जाणारे शेकडो ट्रेलर व अन्य अवजड वाहने या राज्य महामार्गावरील पाली येथे असलेल्या पिंजाळ नदीवरील धोकादायक पुलावरु न जात आहेत. या अवजड वाहतुकीमुळे या पुलाचा धोका अधिक वाढला असून या पुला नजिक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे अपुर्ण काम तातडीने पुर्ण करु न नविन पुलावरु न वाहतूक सुरु करावी अशी मागणी वाडा तालुक्यातील प्रवाशांकडून केली जात आहे.वाडा शहरापासुन अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वाडा-मनोर या राज्य महामार्गावर पिंजाळी नदीवर सुमारे ८५ वर्षापुर्वी बांधलेला हा ब्रिटिश कालीन पुल आहे. दुहेरी वाहतुकीसाठी असलेल्या या जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजीची मलमपट्टी सार्वजनिक बांधकाम खात्याने अनेक वेळा करु न हा पुल वाहतुकीस (अवजड वाहना व्यतिरिक्त) सुरु ठेवला आहे. पण या राज्य महामार्गावर मुंबई-अहमदाबाद या महामार्गाची वाहतूक वळविल्यापासुन गेले पंधरा दिवस या पुलावरु न दररोज शेकडो वाहने ये-जा करु लागल्याने हे पुल अधिक धोकादायक बनले आहे.या पुलाच्या दोन्ही कडेच्या संरक्षक भिंतीवर लहान, मोठी अनेक झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळांनी हा पुल कमकुवत बनविला आहे. हा पुल फक्त दुहेरी वाहतुकीसाठी असल्याने एकाच वेळी या पुलावर १० ते १५ अवजड वाहनांची कोंडीही होते. अशा वेळी या पुलाचा धोका खुप वाढलेला असतो.सा.बां.चे दुर्लक्षघोडबंदर रोडजवळील वर्सोवा पुलाचे दुरु स्तीचे काम हाती घेतल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावरु न वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.या राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने या पुलानजिक पर्यायी पुल बांधलेले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुकडील भरवाचे काम गेल्या चार वर्षांपासून अपुरे असल्याने या नविन पुलावरु न वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPuneपुणे