शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अवजड वाहतुकीमुळे पिंजाळ नदीवरील पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:54 IST

वर्सोवा पुलाच्या दुरु स्तीच्या कामामुळे गुजरातकडून मुंबईला जाणारी अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्यमहामार्गावर वळविण्यात आली आहे.

वाडा : वर्सोवा पुलाच्या दुरु स्तीच्या कामामुळे गुजरातकडून मुंबईला जाणारी अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्यमहामार्गावर वळविण्यात आली आहे. या महामार्गावरील पिंजाळी नदीवर असलेला जुना पुल धोकादायक असताना आता पुलावरु न मोठ्या संख्येने अवजड वाहतूक वाढल्याने हा धोका वाढला आहे.मुंबई, न्हावाशेवा या बंदराकडे दररोज ४० ते ६० मेट्रिक टनाचे सामान घेऊन जाणारे शेकडो ट्रेलर व अन्य अवजड वाहने या राज्य महामार्गावरील पाली येथे असलेल्या पिंजाळ नदीवरील धोकादायक पुलावरु न जात आहेत. या अवजड वाहतुकीमुळे या पुलाचा धोका अधिक वाढला असून या पुला नजिक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे अपुर्ण काम तातडीने पुर्ण करु न नविन पुलावरु न वाहतूक सुरु करावी अशी मागणी वाडा तालुक्यातील प्रवाशांकडून केली जात आहे.वाडा शहरापासुन अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वाडा-मनोर या राज्य महामार्गावर पिंजाळी नदीवर सुमारे ८५ वर्षापुर्वी बांधलेला हा ब्रिटिश कालीन पुल आहे. दुहेरी वाहतुकीसाठी असलेल्या या जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजीची मलमपट्टी सार्वजनिक बांधकाम खात्याने अनेक वेळा करु न हा पुल वाहतुकीस (अवजड वाहना व्यतिरिक्त) सुरु ठेवला आहे. पण या राज्य महामार्गावर मुंबई-अहमदाबाद या महामार्गाची वाहतूक वळविल्यापासुन गेले पंधरा दिवस या पुलावरु न दररोज शेकडो वाहने ये-जा करु लागल्याने हे पुल अधिक धोकादायक बनले आहे.या पुलाच्या दोन्ही कडेच्या संरक्षक भिंतीवर लहान, मोठी अनेक झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळांनी हा पुल कमकुवत बनविला आहे. हा पुल फक्त दुहेरी वाहतुकीसाठी असल्याने एकाच वेळी या पुलावर १० ते १५ अवजड वाहनांची कोंडीही होते. अशा वेळी या पुलाचा धोका खुप वाढलेला असतो.सा.बां.चे दुर्लक्षघोडबंदर रोडजवळील वर्सोवा पुलाचे दुरु स्तीचे काम हाती घेतल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावरु न वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.या राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने या पुलानजिक पर्यायी पुल बांधलेले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुकडील भरवाचे काम गेल्या चार वर्षांपासून अपुरे असल्याने या नविन पुलावरु न वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPuneपुणे