शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दुष्काळाचे सावट तीन तालुक्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:05 IST

उपग्रहीय पाहणी : शासनाचा निष्कर्ष, मोखाडा-जव्हारचा समावेश नाही, जनता झाली संतप्त

- हितेंन नाईक

पालघर : राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने अनेक भागातील पीक उत्पादनावर परिणाम झाला असून शेवटच्या दोन मिहन्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकर्यावर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्यातील पालघर, तलासरी व विक्रमगड या तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असल्याचे शासनाने सॅटेलाइट सर्वेक्षणाद्वारे जाहीर केल्यानंतर समितीद्वारे पहाणीला सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यात पावसाच्या अभावी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली असून नवीन निकषांच्या आधारे दुष्काळाची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी काही अधिकाऱ्यांच्या मर्जीने दुष्काळ जाहीर करण्याच्या पद्धतीत बदल करून पेरणी, पाऊस, भूजल पातळी,उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यापैकी १७२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरील तीनही तालुक्यात आॅगस्ट महिन्यात पडलेला पाऊस चार वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर येऊन तो सप्टेंबर महिन्यात चार वर्षाच्या तुलनेत अवघा १० टक्के पडल्याने शेतकºयांच्या हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अगदी वाडा सारख्या भातशेतीला पूरक आणि वाडा कोलम सारख्या भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील शेतकरी पावसाने पाठ फिरविल्याने करपलेल्या शेतीला आगी लावून संताप व्यक्त करीत आहेत. वर्षभर शेतात राबराब राबून पिकविलेले पीक करपून गेल्याने शेतकºयांनी ते पेटवून देण्याचे प्रकार वाढत चालले असून शेतकºयांच्या संतापाचा उद्रेक वाढू लागला आहे. वाडा तालुक्यातील अनेक शेतकरी भातशेती करपून गेल्यानंतरही तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने संताप व्यक्त करीत आहेत.

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच शेतकºयावर अन्याय होत असतांना त्यांचे अश्रू पुसायला त्यांचे हात मात्र थिटे पडले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार ट्रिगर २ नुसार पालघर, विक्रमगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित झाले आहेत. या तीन तालुक्यात प्रत्येकी १० टक्के गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आली आहेत. यात पालघर २२, तलासरी ५ आणि विक्रमगड ९ अशी ३६ गावांची निवड करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालयाचे मंडळ अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांची एक समिती नेमण्यात आली असून निवडलेल्या १० टक्के गावांची पाहणी करतांना सॅटेलाइट वरून आलेल्या माहितीची शहानिशा करण्याच्या कामाला सोमवार पासून सुरुवात करण्यात आली असून जमिनीचा ओलावा, पिकांची स्थिती आदी बाबींची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक के बी तरकसे यांनी लोकमत ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार