शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दुष्काळाचे सावट तीन तालुक्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:05 IST

उपग्रहीय पाहणी : शासनाचा निष्कर्ष, मोखाडा-जव्हारचा समावेश नाही, जनता झाली संतप्त

- हितेंन नाईक

पालघर : राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने अनेक भागातील पीक उत्पादनावर परिणाम झाला असून शेवटच्या दोन मिहन्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकर्यावर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्यातील पालघर, तलासरी व विक्रमगड या तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असल्याचे शासनाने सॅटेलाइट सर्वेक्षणाद्वारे जाहीर केल्यानंतर समितीद्वारे पहाणीला सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यात पावसाच्या अभावी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली असून नवीन निकषांच्या आधारे दुष्काळाची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी काही अधिकाऱ्यांच्या मर्जीने दुष्काळ जाहीर करण्याच्या पद्धतीत बदल करून पेरणी, पाऊस, भूजल पातळी,उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यापैकी १७२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरील तीनही तालुक्यात आॅगस्ट महिन्यात पडलेला पाऊस चार वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर येऊन तो सप्टेंबर महिन्यात चार वर्षाच्या तुलनेत अवघा १० टक्के पडल्याने शेतकºयांच्या हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अगदी वाडा सारख्या भातशेतीला पूरक आणि वाडा कोलम सारख्या भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील शेतकरी पावसाने पाठ फिरविल्याने करपलेल्या शेतीला आगी लावून संताप व्यक्त करीत आहेत. वर्षभर शेतात राबराब राबून पिकविलेले पीक करपून गेल्याने शेतकºयांनी ते पेटवून देण्याचे प्रकार वाढत चालले असून शेतकºयांच्या संतापाचा उद्रेक वाढू लागला आहे. वाडा तालुक्यातील अनेक शेतकरी भातशेती करपून गेल्यानंतरही तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने संताप व्यक्त करीत आहेत.

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच शेतकºयावर अन्याय होत असतांना त्यांचे अश्रू पुसायला त्यांचे हात मात्र थिटे पडले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार ट्रिगर २ नुसार पालघर, विक्रमगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित झाले आहेत. या तीन तालुक्यात प्रत्येकी १० टक्के गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आली आहेत. यात पालघर २२, तलासरी ५ आणि विक्रमगड ९ अशी ३६ गावांची निवड करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालयाचे मंडळ अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांची एक समिती नेमण्यात आली असून निवडलेल्या १० टक्के गावांची पाहणी करतांना सॅटेलाइट वरून आलेल्या माहितीची शहानिशा करण्याच्या कामाला सोमवार पासून सुरुवात करण्यात आली असून जमिनीचा ओलावा, पिकांची स्थिती आदी बाबींची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक के बी तरकसे यांनी लोकमत ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार