शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

पाऊस लांबल्याने बोईसरात पाणीबाणी, भूजल पातळीही खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:32 IST

ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

- पंकज राऊतबोईसर  -  ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जून संपत आला तरी बोईसरच्या काही भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. टँकरच्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांसह रोगराई पसरण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याने एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा कोटा वाढविण्याची मागणी होत आहे.साईबाबा नगरपासून केशवनगर ते ओसवाल व्हॅलीपर्यंतच्या भागातील बहुसंख्य इमारतीमध्ये पाणी टंचाईची झळ व तीव्रता मार्च महिन्यापासूनच जाणवत होती. ती आजतागायत आहे अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा संपून कुपनलिकाही कोरड्या पडल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.अनेक इमारतीतील कूपनलिका कोरड्या पडल्यावर त्या ठिकाणी नव्याने तीनशे फुटापर्यंत खोल कूपनलिका खणूनही थेंबभरही पाणी लागत नसल्याने खर्चही वाया गेला तर काही इमारतीमध्ये तर दोन तीन वेळा कूपनलिका खणण्यात येऊनही पाणी न लागल्याने त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.एका बाजूला ग्रामपंचायतीकडून होणारा अपुरा पाणी पुरवठा तर दुसºया बाजूला कूपनलिका कोरड्या अशा दुहेरी संकटात बोईसरचे नागरिक सापडल्याने नाईलाजास्तव टँकरचे दूषित पाणी विकत घेऊन वापरावे लागते. त्याकरिता अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो आहे. काही नागरिकांना महागड्या २० लीटर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसरच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बोईसरची लोकसंख्या ५६ हजार ४९१ असली तरी खरी लोकसंख्या सध्या सुमारे दीड लाखांच्यावर गेली आहे. पाणी टंचाईची तीव्रता कमी व्हावी याकरीता बोईसर ग्रामपंचायतीने विविध नागरी वसाहतीमध्ये मागील वर्षी १८ व या वर्षी १८ कूपनलिका नव्याने खणल्या. परंतु त्यापैकी काही अजूनही कोरड्या आहेत. तर १० किलो एचडीपी पाईप लाईन मधूर हॉटेलजवळून बिग बाजारमार्गे एस.टी.बस स्टँडपासून सहा इंचाची नवीन पाण्याची एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली असून या लाईनवर कुणालाही नवीन कनेक्शन दिले जात नसल्याने भंडारवाडा टाकीमध्ये पुरेशा दाबाने वेळेवर पाणी साठवणूक करून त्या पाण्याचा इतर भागात पुरेशा दाबाने पुरवठा करणे शक्य होईल. परंतु त्या करीता एमआयडीसीकडून पुरवल्या जाणाºया पाण्याचा कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे .राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार एमआयडीसीने ४० टक्के पाणी कपात सुरु केल्याने त्यामध्ये अधिक भर पडली आहे तर, मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापराचा दंडनीय आकार व विलंब शुल्कामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी बिलाच्या थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. हे वास्तव असले तरी भविष्य काळातील पाणी टंचाई टाळायची असेल तर बोईसरमधील प्रत्येक इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आतापासूनच युद्ध पातळीवर करणे गरजेचे आहे.नागरिकांना पाणी टचाईमुळे टँकरच्या पाण्यावर रहावे लागते अवलंबूनटँकरच्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारासह रोगराई पसरण्याची शक्यतानागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरएमआयडीसीकडून पाणी पुरवठा वाढविण्याची गरजअजून पाऊस दमदारपणे सुरु न झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाली नाही. नागरिकांना प्यायचे पाणी जास्तीत जास्त कसे मिळेल याकरिता आम्ही नियोजन करून पाणी पुरवठा करतो. त्याचप्रमाणे आम्ही ग्रामपंचयतीकडून पैसे आकारुन मागणीप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो.- वैशाली बाबर,सरपंच,बोईसर ग्रामपंचायत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार