शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

पाऊस लांबल्याने बोईसरात पाणीबाणी, भूजल पातळीही खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:32 IST

ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

- पंकज राऊतबोईसर  -  ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जून संपत आला तरी बोईसरच्या काही भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. टँकरच्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांसह रोगराई पसरण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याने एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा कोटा वाढविण्याची मागणी होत आहे.साईबाबा नगरपासून केशवनगर ते ओसवाल व्हॅलीपर्यंतच्या भागातील बहुसंख्य इमारतीमध्ये पाणी टंचाईची झळ व तीव्रता मार्च महिन्यापासूनच जाणवत होती. ती आजतागायत आहे अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा संपून कुपनलिकाही कोरड्या पडल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.अनेक इमारतीतील कूपनलिका कोरड्या पडल्यावर त्या ठिकाणी नव्याने तीनशे फुटापर्यंत खोल कूपनलिका खणूनही थेंबभरही पाणी लागत नसल्याने खर्चही वाया गेला तर काही इमारतीमध्ये तर दोन तीन वेळा कूपनलिका खणण्यात येऊनही पाणी न लागल्याने त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.एका बाजूला ग्रामपंचायतीकडून होणारा अपुरा पाणी पुरवठा तर दुसºया बाजूला कूपनलिका कोरड्या अशा दुहेरी संकटात बोईसरचे नागरिक सापडल्याने नाईलाजास्तव टँकरचे दूषित पाणी विकत घेऊन वापरावे लागते. त्याकरिता अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो आहे. काही नागरिकांना महागड्या २० लीटर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसरच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बोईसरची लोकसंख्या ५६ हजार ४९१ असली तरी खरी लोकसंख्या सध्या सुमारे दीड लाखांच्यावर गेली आहे. पाणी टंचाईची तीव्रता कमी व्हावी याकरीता बोईसर ग्रामपंचायतीने विविध नागरी वसाहतीमध्ये मागील वर्षी १८ व या वर्षी १८ कूपनलिका नव्याने खणल्या. परंतु त्यापैकी काही अजूनही कोरड्या आहेत. तर १० किलो एचडीपी पाईप लाईन मधूर हॉटेलजवळून बिग बाजारमार्गे एस.टी.बस स्टँडपासून सहा इंचाची नवीन पाण्याची एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली असून या लाईनवर कुणालाही नवीन कनेक्शन दिले जात नसल्याने भंडारवाडा टाकीमध्ये पुरेशा दाबाने वेळेवर पाणी साठवणूक करून त्या पाण्याचा इतर भागात पुरेशा दाबाने पुरवठा करणे शक्य होईल. परंतु त्या करीता एमआयडीसीकडून पुरवल्या जाणाºया पाण्याचा कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे .राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार एमआयडीसीने ४० टक्के पाणी कपात सुरु केल्याने त्यामध्ये अधिक भर पडली आहे तर, मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापराचा दंडनीय आकार व विलंब शुल्कामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी बिलाच्या थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. हे वास्तव असले तरी भविष्य काळातील पाणी टंचाई टाळायची असेल तर बोईसरमधील प्रत्येक इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आतापासूनच युद्ध पातळीवर करणे गरजेचे आहे.नागरिकांना पाणी टचाईमुळे टँकरच्या पाण्यावर रहावे लागते अवलंबूनटँकरच्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारासह रोगराई पसरण्याची शक्यतानागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरएमआयडीसीकडून पाणी पुरवठा वाढविण्याची गरजअजून पाऊस दमदारपणे सुरु न झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाली नाही. नागरिकांना प्यायचे पाणी जास्तीत जास्त कसे मिळेल याकरिता आम्ही नियोजन करून पाणी पुरवठा करतो. त्याचप्रमाणे आम्ही ग्रामपंचयतीकडून पैसे आकारुन मागणीप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो.- वैशाली बाबर,सरपंच,बोईसर ग्रामपंचायत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार