शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:03 IST

ईदच्या मुहूर्तावर तालुक्यात झालेल्या पहिल्या पावसाच्या आगमनाने सर्वत्र अल्हाददायी वातावरण निर्माण केले.

बोर्डी : ईदच्या मुहूर्तावर तालुक्यात झालेल्या पहिल्या पावसाच्या आगमनाने सर्वत्र अल्हाददायी वातावरण निर्माण केले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणातील गारव्यामुळे दिलासा मिळाला. दरम्यान रविवारपासून पेरणीच्या हंगामाला प्रारंभ होणार असून किनारी पर्यटन बहरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.जूनचा पंधरवडा उलटला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. शुक्र वारच्या मध्यरात्री पासून पावसाला प्रारंभ झाला असला तरी शनिवार, १६ जूनच्या पहाटेपासून जोराच्या वाऱ्यासह झालेले आगमन पूर्ण ताकदीनिशी होते. दुपारनंतर उघडीप मिळाल्याने रविवारी पेरणी योग्य वातावरण असेल असा विश्वास शेतकºयांनी व्यक्त केला आहे. साप्ताहिक सुट्टी असल्याने या कामाला वेग येईल. शिवाय उकाड्याने हैराण झाल्याने उन्हाळी पर्यटनाकडे पाठ फिरलेले पर्यटक किनाºयावर येऊन पावसाची मजा लुटतांना पहावयास मिळेल, त्याचा फायदा स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि विक्र ेत्यांना होईल.दरम्यान ईदच्या सुट्टीत पहिल्या पावसाचे आगमन झाल्याने बच्चेकंपनींनी भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. तर या सणाच्या शुभेच्छांसह सोशलमीडियावर पावसाचा आनंद शेअर करणारे संदेश फिरत होते. या हंगामात निरंक असलेला पावसाच्या टक्केवारीचा तक्ता आजच्या पावसाने गतिमान झाला. तर मान्सून पूर्व कामं पूर्ण केल्याचा महावितरणचा दावा मात्र फोल ठरताना दिसला. या कालावधीत विजेचा लपंडाव अव्याहत सुरु होता.>तलासरीत सरीवर सरीअनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने तलासरीत शनिवार सकाळपासून दमदार हजेरी लावल्याने भागातील शेतकरी आनंदाने कामाला लागला असून दावणीला बांधलेले बैल नांगराला जुंपून पेरणीला सुरु वात केली आहेपहाटे परिसरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या नंतर सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली. त्यांत काही वेळ सोसाट्याच्या वाºयासह पाऊस कोसळल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. पाऊस सुरू झाल्याने शेतकºयाने आपल्या मोकाट सोडलेल्या गुराचाही शोध सुरू केला आहे.