शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

विहीर योजनेच्या मंजुरीचे प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:41 IST

शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी

रविंद्र साळवेमोखाडा : शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी शेतक-यांना आला आहेतालुक्यातील २७ ग्रामपंचायती मधील हिरवे १६ बेरिस्ते १० खोच १० साखरी १ दाडवळ १ गोमघर १ गोंदेखुर्द १ पोशेरा ६ कोशिमशेत १ मोरहंडा १ आडोशी ३ वाशाळा ४ उधळे ८ सातुर्ली १ किनिस्ते १ अशा ७८ गरजू शेतकº्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या वयक्तिक लाभाच्या सिंचन विहीर योजनेसाठी मोखाडा पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडे देण्यात आलेले प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाच्या अनावस्थेमुळे तांत्रिक मंजुरी अभावी धूळखात पडले आहेत. यामुळे तीव्र नाराजी येथील शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या सिंचन विहीर योजनेसाठी ३ लाखांचा अनुदानीत निधी दिला जात असून आदिवासी शेतकºयाना प्यायला पाणी मिळावे शेतीला पाणी उपलब्ध व्हावे त्यांचा आर्थिक स्थर उंचवावा या उद्देशाने सुरु केलेली व शेतकºयांच्या दृष्टीने महत्वाची असलेली सिंचन योजना स्थानिक प्रशासनने बासनात गुंढाळलेली आहे.अशी आहे योजना..! : पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडून आलेले लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी देऊन हा प्रस्ताव भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवले जातात यानंतर ते घटनास्थळी येऊन विहिरीच्या जागेवर पाणी लागेल कि नाही याची खात्री केली जाते. यानंतर प्रशाकीय मान्यता देण्यात येते.सन २०११-१२ पासून सिंचन विहिरीला ग्रहणशेतकºयांच्या दुरु ष्टीने फायद्याची असलेल्या सिंचन विहीर योजनेला तालुक्यात सन २०११-१२ मध्ये चार कोटी ३० लाखांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते परंतु सरकारी बांबूच्या भोंगळ कारभारामुळे अनेक वयक्तीक लाभाच्या विहिरी अपूर्णच राहिल्या व चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केल्याने मोठ्या प्रमाणात अनुदान परत गेले अधिकार्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे चार कोटीच्या अनुदानाचे तालुक्यात वाटोळे लावले. यानंतर अपूर्ण विहिरी पूर्ण झाल्यावरच नवीन लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल असा फतवा मोखाडा पंचायत समितीने काढला यानंतर गेल्या तीन चार वर्षा पासून पेंडिंग असलेल्या प्रस्तावना मुहूर्त मिळाला खरा, परंतु पाणी पुरवठा विभागाच्या दुर्र्लिक्षत कारभारामुळे तांत्रिक मंजुरीला आलेलेले प्रस्ताव धूळखात पडले असल्याने तालुक्यातील शेतकºयांची प्रतीक्षा कायम आहे.आम्ही वयक्तीक लाभाच्या व सार्वजनिक सिंचन विहिरीचे इिस्टमेट तयार करून पंचायत समतिीकडे पाठवले आहेत-एस एस खाद्री ,पाणी पुरवठा, शाखा अभियंता,मोखाडागेल्या दोन वर्षां पूर्वी आम्ही विहीर योजनेसाठी प्रस्ताव पंचायत समतिीकडे दिला आहे परंतु अद्यापही आमची विहीर मंजूर झालेली नाही- बच्चीबाई लचके, वंचित लाभार्थी, पळसपाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार