शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

पालिकेच्या अनास्थेमुळे स्वच्छ डहाणू कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:15 IST

पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे.

शौकत शेखडहाणू : पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे.या नगरपरिषदेची स्थापना ३१ मे १९८५ रोजी झाली त्यावेळी पहिले नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दादीशेठ इराणी हे विराजमान झाले. नगरपरिषद स्थापन झाल्याने येथील लोकांच्या अपेक्षा वाढल्या, गेल्या पंचवीस ते तीस वर्षात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेकडो कोटी रूपये विकासकामांवर खर्च झाले. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच दिसून येते. डहाणू शहरात जागोजागी भिकाºयांचे अड्डे असून स्टेशनच्या बाहेरील रस्त्याच्याकडेला कडधान्य भाजीपाला फळे, फुले, हातगाडीवाले तसेच कपडे विक्रते बसल्याने दिवसभर वाहतूक कोंडी होत असते. तर रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती आहे. या परिसरात रस्त्यावरच मोटारसायकल, चारचाकी, रिक्षा उभ्या राहत असल्याने नागरीकांचा जीव गुदमरतो आहे. शिवाय डहाणू-सागरनाका येथे नुकतेच शासनाच्या वैशिष्ठयपूर्ण योजनेत तीन, चार कोटी रूपये खर्च करून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु सागरनाका ते सरावलीपर्यंत जागोजागी बंद व नादुरस्त वाहने गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्याकडेला पडून आहेत. तर भंगारवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यमार्ग अरूंद होऊन अनेक अपघात घडत आहे. मात्र हे अतिक्रमण व काही बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे तर सोडा. परंतु त्यांना नोटीसा पाठविण्याचेही धाडस नगर परिषद करत नसल्याने शहराला बकालपणा प्राप्त झाला आहे.दरम्यान गेल्या अनेक वर्षात डहाणू नगरपालिकेला शासनाच्या दलित वस्ती, आदिवासीवस्ती योजनेअंतर्गत कोटयावधीचा निधी प्राप्त झाला. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे म्हणजेच ज्या पाडयात पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकवस्ती दलित व आदिवासी आहे, त्या ठिकाणी खर्च करण्याचे सोडून पालिका प्रशासनाने इतर ठिकाणी विकासकामांवर खर्च केल्याने आजही डहाणू नगरपरिषदेच्या दामूपाडा, लोणीपाडा, चिमाजीपाडा, संजयनगर, आंबेमोश या वस्त्या विकासापासून वंचित आहेत. डहाणू नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही घनकचरा व्यवस्थानाचा प्रश्न सुटलेला नाही. येथील दररोज जमा होणाºया घनकचरा साठी डंपिंग ग्राऊंड नसल्न्याने दररोज येथील निर्माण होणाºयाा कचरा मिळेल त्या ठिकाणी टाकला जातो. त्यामळे शहरात मोठया प्रमाणात मच्छरांचा उपद्रव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान