शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

पालिकेच्या अनास्थेमुळे स्वच्छ डहाणू कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:15 IST

पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे.

शौकत शेखडहाणू : पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे.या नगरपरिषदेची स्थापना ३१ मे १९८५ रोजी झाली त्यावेळी पहिले नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दादीशेठ इराणी हे विराजमान झाले. नगरपरिषद स्थापन झाल्याने येथील लोकांच्या अपेक्षा वाढल्या, गेल्या पंचवीस ते तीस वर्षात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेकडो कोटी रूपये विकासकामांवर खर्च झाले. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच दिसून येते. डहाणू शहरात जागोजागी भिकाºयांचे अड्डे असून स्टेशनच्या बाहेरील रस्त्याच्याकडेला कडधान्य भाजीपाला फळे, फुले, हातगाडीवाले तसेच कपडे विक्रते बसल्याने दिवसभर वाहतूक कोंडी होत असते. तर रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती आहे. या परिसरात रस्त्यावरच मोटारसायकल, चारचाकी, रिक्षा उभ्या राहत असल्याने नागरीकांचा जीव गुदमरतो आहे. शिवाय डहाणू-सागरनाका येथे नुकतेच शासनाच्या वैशिष्ठयपूर्ण योजनेत तीन, चार कोटी रूपये खर्च करून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु सागरनाका ते सरावलीपर्यंत जागोजागी बंद व नादुरस्त वाहने गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्याकडेला पडून आहेत. तर भंगारवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यमार्ग अरूंद होऊन अनेक अपघात घडत आहे. मात्र हे अतिक्रमण व काही बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे तर सोडा. परंतु त्यांना नोटीसा पाठविण्याचेही धाडस नगर परिषद करत नसल्याने शहराला बकालपणा प्राप्त झाला आहे.दरम्यान गेल्या अनेक वर्षात डहाणू नगरपालिकेला शासनाच्या दलित वस्ती, आदिवासीवस्ती योजनेअंतर्गत कोटयावधीचा निधी प्राप्त झाला. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे म्हणजेच ज्या पाडयात पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकवस्ती दलित व आदिवासी आहे, त्या ठिकाणी खर्च करण्याचे सोडून पालिका प्रशासनाने इतर ठिकाणी विकासकामांवर खर्च केल्याने आजही डहाणू नगरपरिषदेच्या दामूपाडा, लोणीपाडा, चिमाजीपाडा, संजयनगर, आंबेमोश या वस्त्या विकासापासून वंचित आहेत. डहाणू नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही घनकचरा व्यवस्थानाचा प्रश्न सुटलेला नाही. येथील दररोज जमा होणाºया घनकचरा साठी डंपिंग ग्राऊंड नसल्न्याने दररोज येथील निर्माण होणाºयाा कचरा मिळेल त्या ठिकाणी टाकला जातो. त्यामळे शहरात मोठया प्रमाणात मच्छरांचा उपद्रव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान