शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या अनास्थेमुळे स्वच्छ डहाणू कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:15 IST

पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे.

शौकत शेखडहाणू : पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे.या नगरपरिषदेची स्थापना ३१ मे १९८५ रोजी झाली त्यावेळी पहिले नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दादीशेठ इराणी हे विराजमान झाले. नगरपरिषद स्थापन झाल्याने येथील लोकांच्या अपेक्षा वाढल्या, गेल्या पंचवीस ते तीस वर्षात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेकडो कोटी रूपये विकासकामांवर खर्च झाले. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच दिसून येते. डहाणू शहरात जागोजागी भिकाºयांचे अड्डे असून स्टेशनच्या बाहेरील रस्त्याच्याकडेला कडधान्य भाजीपाला फळे, फुले, हातगाडीवाले तसेच कपडे विक्रते बसल्याने दिवसभर वाहतूक कोंडी होत असते. तर रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती आहे. या परिसरात रस्त्यावरच मोटारसायकल, चारचाकी, रिक्षा उभ्या राहत असल्याने नागरीकांचा जीव गुदमरतो आहे. शिवाय डहाणू-सागरनाका येथे नुकतेच शासनाच्या वैशिष्ठयपूर्ण योजनेत तीन, चार कोटी रूपये खर्च करून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु सागरनाका ते सरावलीपर्यंत जागोजागी बंद व नादुरस्त वाहने गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्याकडेला पडून आहेत. तर भंगारवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यमार्ग अरूंद होऊन अनेक अपघात घडत आहे. मात्र हे अतिक्रमण व काही बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे तर सोडा. परंतु त्यांना नोटीसा पाठविण्याचेही धाडस नगर परिषद करत नसल्याने शहराला बकालपणा प्राप्त झाला आहे.दरम्यान गेल्या अनेक वर्षात डहाणू नगरपालिकेला शासनाच्या दलित वस्ती, आदिवासीवस्ती योजनेअंतर्गत कोटयावधीचा निधी प्राप्त झाला. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे म्हणजेच ज्या पाडयात पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकवस्ती दलित व आदिवासी आहे, त्या ठिकाणी खर्च करण्याचे सोडून पालिका प्रशासनाने इतर ठिकाणी विकासकामांवर खर्च केल्याने आजही डहाणू नगरपरिषदेच्या दामूपाडा, लोणीपाडा, चिमाजीपाडा, संजयनगर, आंबेमोश या वस्त्या विकासापासून वंचित आहेत. डहाणू नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही घनकचरा व्यवस्थानाचा प्रश्न सुटलेला नाही. येथील दररोज जमा होणाºया घनकचरा साठी डंपिंग ग्राऊंड नसल्न्याने दररोज येथील निर्माण होणाºयाा कचरा मिळेल त्या ठिकाणी टाकला जातो. त्यामळे शहरात मोठया प्रमाणात मच्छरांचा उपद्रव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान