शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ, बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:07 IST

बळीराजा हवालदिल : लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी

पारोळ : परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील जवळपास ७७ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले असून भातपीक आणि भाताचे तणही खराब झाल्याने स्वत:च्या खावटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ओल्या दुष्काळाची गडद छाया शेतावर पडली असून अस्मानी संकटाने हवालदिल झालेला बळीराजा आता नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे आशेने बघतो आहे.

जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, वसई तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हे भाताचे वाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने उत्पन्न चांगले होते. मात्र परतीच्या पावसाने या सोन्यासारख्या भात पिकाचे होत्याचे नव्हते केले. दहा दिवसांपूर्वी कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली. कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आठ-दहा दिवस सतत पडतच राहिल्याने कापून ठेवलेले भात पीक शेतात जसेच्या तसेच पडून आहे. पावसाने करपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगू लागली आहेत.भात पीक खराब झाले तर पावसात भाताचे तण काळभोर पडल्याने तेही वाया गेले. यामुळे वर्षभराचा जनावरांना चारा कुठून आणायचा हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. या पावसाचा फटका फूल तसेच फळ बागायतीलाही बसला. वसई परिसरात जाई, जुई, मोगरा ही फुले पावसात भिजल्याने भातशेती बरोबर बागायतीचेही मोठे नुकसान झाले.रब्बी पिकांवरही परिणामभात पिकाची कापणी होताच शेतकरी रब्बी पीक घेण्याच्या तयारीला लागतो. दिवाळीच्या सुमारास वाल, मूग, याची शेतात पेरणी केली जाते. तर तूर शेताच्या बांधावर लावतात. जिल्ह्यात टोमॅटो, सफेद कांदा, वांगी, भेंडी, काकडी, मिरची इ. पिकांचेही उन्हाळ्यात उत्पादन घेतले जाते. दसºयाच्या दरम्यान रोप तयार करून दिवाळीनंतर लगेच या पिकांची लागवड करतात. पण यंदा पावसामुळे अनेक दिवस भात पीक शेतात राहिले तर जमीनही ओली राहिल्याने महिनाभर तरी पिकांची लागवड करता येणार नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार