शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील आदिवासींचे स्थलांतर, रोहयोची कामे कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:01 IST

शेकडो आदिवासी कुटुंब रोजगारासाठी संजाण, भिवंडी, वाशी, पालघर, मुंबई, ठाणे, वापी, सिल्वासा येथे स्थलांतरित झाली आहेत.

डहाणू : तालुक्यातील जामशेत, केनाड, सायवन, रायपूर, बापूगांव, दिवशी, दाभाडी, चळणी, सुकटआंबा, बापुगाव, दादडे, मोडगाव, हळदपाडा, आंबेसरी, बहारे , धरमपूर , विवळवेढे चरी, बांधघर, निंबापूर, धरमपूर, रायपूर, धानिवरी, कोदाड, धानिवारी, चिंचले, आंबोली, शीसने, कारंज्विरा, ओसरविरा, आंबेसरी, कांदरवाडी, थेरोंडा, वेती, मुरबाड, घोळ, सोनाळे, खानीव, महालक्ष्मी, सारणी, पेठ, मोडगांव, धुंदलवाडी या गावातील शेकडो अदिवासी कुटुंब रोजगारासाठी संजाण, भिवंडी , वाशी ,पालघर , मुंबई, ठाणे, वापी, सिल्वासा येथे स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे अनेक गावे ओस पडली आहेत. विटभट्ट्यातून स्थलांतरित झालेली सर्वच आदिवासी कुटुंबे ही शासनाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून दारिद्र्यरेषेखाली जगणारी आदिवासी कुटुंब आहेत.सध्या डहाणू तालुक्यातील ४२,७७८ जॉब कार्ड धारक आहेत. त्यात वन व कृषी अंतर्गत २७ कामे सुरू आहेत.त्यामध्ये १३२० मजूर कामावर आहेत. तर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ८५ ग्रामपंचायतीत रोजगार हमीची १४५ कामे सुरू असून केवळ ६९६ मजूर विविध गावात कामावर आहेत. त्यामुळे उद्योग बंदी उत्खनन बंदीमुळे डहाणू तालुक्यातील आदिवासी मजुरांना रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.पावसाळ्यात रानभाज्या विकून आणि शेतात मजूरीवर कबाड कष्ट करुन व मुला बाळांचे संगोपन करुन उदरिनर्वाह करतात. त्यानंतर मात्र रोजगार नसल््याने पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडावे लागते. दिवसभर उन्हाचे चटके अंगावर घेऊन घामा गाळत ही आदिवासी कुटुंबे मिळेल तिथे काम करुन राबराब राबतात. संपूर्ण रान पायाखाली घालून मोळ्या विकून घर चालवणाऱ्या आदिवासी कुटुंबाची वाताहत अद्यापही सुरुच आहे. त्या कुटुंबापर्यंत शासनाच्या योजना पोहोचलेल्याच नाही. दुर्बंल घटकांसाठी घरकुल योजना असूनही कुडाच्या भिंती, मोडकी गळकी घरे, फाटके छपर यात आदिवासी वर्षानुवर्षे आदिम जीवन जगत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या अभद्र नीतीमुळे आदिवासी समाज दुर्लंक्षित राहिला आहे. रोजगाराची हमी नसल््याने आदिवासी कुटुंबावर सतत स्थलांतरणाची वेळ येते आहे. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहून यांच्या मुलांची शिक्षणाची पाटीही कोरीच राहत आहे. सतत स्थलांतरामुळे आरोग्याकडे दुर्लंक्ष होऊन कुपोषणात वाढ होत आहे.अठरा विश्वे दारिद्रय नशिबी असलेल्या भूमिहीन, अल्पभूधारक आदिवासी शेतमजूरांना पावसाळयात चार महीने शेतीचे काम पुरते मात्र या भागात रोजगार, उद्योग नसल्याने वर्षातले आठ महीने रोजगारासाठी वणवण भटकावे लागते. भरभटीच्या बांधकाम उद्योगातला शेवटचा आणि महत्वाचा घटक असलेल्या वीट उद्योगाकडे ते धाव घेतात. घरदार सोडून परजिल्ह्यात, तालुक्यात रोजगारासाठी स्थलांतर करतात. वीटभट्टीवर राबणाºयांची समस्या खूपच बिकट आहे. अशावेळी त्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याअभावी दुषित पाण्यावर तहान भागवावी लागते. ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या, खरु ज रक्तांचे प्रमाण कमी, वजन कमी आदी आजार दिसून येतात. कुपोषण तर सगळ्यांनाच छळत असते.>स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. त्यांना जॉब कार्ड देण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीकडून ,शासनाकडून त्याची जिहर्तही केली जाते. मागणी नुसार रस्ते,विहिरी,घरकुलाचे कामे दिली जातात. मात्र लोकांची मानिसकता रोख कमाई कडे असल्याने वीटभट्टी, एम आय डी.सी कडे जास्त आहे.-बी.एच. भरक्षे, गट विकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती