शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

वसई जवळच्या नायगाव खाडी रेल्वे पुलाला मोठ्या जहाजाची धडक; जहाजाला जलसमाधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 10:48 IST

drager sinks after hitting naigaon railway bridge: रेल्वे पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या जहाजाची (ड्रेझर) चोरीछुपे  वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस

वसई: मुंबई व गुजरातला जोडणारा अतिशय महत्त्वाचा अशा एकमेव रेल्वे पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या जहाजाची (ड्रेझर) चोरीछुपे  वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. वसई जवळच्या नायगाव रेल्वे पूलाला एका मोठ्या जहाजाने धडक दिली असून  या धडकेत रेल्वे पुलाच्या दोन पिलरमधील मधल्या भागांचं बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. (drager sinks after hitting naigaon railway bridge)एक भला मोठा ड्रेझर दोन पुलाच्या खालून पास होताना पुलाला धडकला. यामुळे रेल्वे पुलाला  काही ठिकाणी तडे गेलेले आहे तर काँक्रिटचा भागदेखील मोठ्या प्रमाणावर निखळून पडला आहे. जवळपास अर्धा ते एक फुटाचं काँक्रिट या अपघातात निघालं आहे. तर ही घटना घडल्यानंतर ड्रेझर हा पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे समजते. दोन दिवसांनंतरही ड्रेझर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आहे. हा ड्रेझर जवळपास ५० फूट लांब आणि २० ते २५ फूट रुंद असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. आतापर्यंत तीन वेळा अशा प्रकारची घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. याआधी २०१४ मध्येही असाच मोठा अपघात येथे घडला होता. मात्र हे ड्रेझर  नेमके येतात कुठून? व ते जातात कुठे? आणि यांना  नेमकी परवानगी आहे का ? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेने रेल्वे पुलाचा बऱयापैकी काही भाग तुटल्याने या पुलाची तात्काळ  पाहणी करून तो कितपत निकामी झाला आहे हे पाहावं लागणार आहे. नायगाव रेल्वे पूल म्हणजे मुंबई व गुजरात राज्यांना जोडणारा दुवा!परिणामी  ज्या ठिकाणी या पुलाचा  भाग तुटला आहे त्यावरून दररोज शेकडो फेऱ्या लोकल ट्रेनच्या होत आहेत. हा पूल मुंबई व गुजरातला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या रेल्वे पुलावरून दररोज लोकल व एक्स्प्रेस गाड्या गुजरात ते मुंबई असा प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला आता तांत्रिक व सुरक्षितता म्हणून  योग्य पाहणी करून अहवाल सादर करावा लागणार आहे.