शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाडोत्री बैल व्यवहारासही आता दुष्काळाची झळ, परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 00:50 IST

खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी : खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत. मात्र अवकळी पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बैलमालकाला निम्मीच रक्कम देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे.या वर्षी पाऊस लांबल्याने डहाणू तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार ६०६.८ हेक्टर भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे २० हजार ३१९ शेतकरी बाधित झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र अज्ञानामुळे कागदपत्र सादर न केलेले तसेच शासकीय नोकरदार आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि शेत जमिनीचा ७/१२ नावावर नसलेले अशा प्रकारात मोडणाºया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील डोंगरपट्ट्यात राहणाºया शेतक-यांचा शेती कसण्याच्या प्रकारानुसार वेगळा गट या तालुक्यात असून तो किनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वाढवण, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावामधून खरीप हंगामातील भात लागवडीच्या कामाकरिता चार महिन्यांकरिता भाडेतत्त्वावर बैल घेऊन उखळणी, चिखलणी, धान्य आणि पावळीच्या वाहतुकीच्या कामाकरिता वापर केला जातो. मे अखेर ते जून मध्य या काळात मालकांकडून भाडेतत्त्वावर बैल घेऊन जाण्यास प्रारंभ होतो. हा व्यवहार करताना रोख पैसे, धान्य किंवा पावळी यापैकी कोणत्याही एका प्रकारातील हा व्यवहर केला जातो.किना-यालगत गावांमध्ये गुरे चरणाचा अभाव असल्याने पावसाळ्यात जनावरांच्या चा-याचा निर्माण होणारा प्रश्न या व्यवहारामुळे काही अंशी सुटतो. शिवाय नवीन बैलांना नांगरणी, चिखलणी तसेच बैलगाडी ओढण्याकरिता तयार करणे हे जिकरीचे काम असते. त्यामुळे शेतक-यांना तेथे पाठविल्याने अनौपचारिकरित्या ट्रेनिंग स्कूलमधून विनामूल्य प्रशिक्षित बैल मिळतो. अशा पद्धतीने बैलमालकाला या व्यवहारातून अनेक फायदे होतात. तर डोंगरी भागात चढ-उताराची शेती असल्याने पॉवर टिलर चालविणे तितकेसे सोपे नसते. पावसाळ्याव्यतिरिक्त या भागात चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनत असल्याने भाडोत्री बैलांचा व्यवहार येथील शेतकºयांसाठीही लाभदायक ठरतो.दरम्यान, अवकाळी पावसामुळे खरिपातील भात पिकाच्या हंगामाला नुकसानीचे ग्रहण लागल्याने भात, पावळी अशा सर्वच प्रकारचे उत्पन्न घटले. यावर्षी भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका बैलाची किंमत २ हजार रुपये एवढी होती. मात्र दुष्काळामुळे तेवढे भाडे देणे परवडणारे नसल्याने निम्मे म्हणजे १ हजार रुपये बैलमालकाला देण्याची नामुष्की ओढवली आहे. बैलांना माघारी आणून ते मालकाला सोपवताना त्यांची घालमेल झाली होती. मात्र जिल्ह्यात सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याने आम्हाला समजून घेतले. मात्र नावावर ७/१२ नसल्याने शासनाने समजून न घेतल्याची प्रतिक्रि या भाडेतत्त्वावर बैल घेतलेल्या शेतकºयांनी व्यक्त केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार