शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

भाडोत्री बैल व्यवहारासही आता दुष्काळाची झळ, परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 00:50 IST

खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी : खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत. मात्र अवकळी पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बैलमालकाला निम्मीच रक्कम देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे.या वर्षी पाऊस लांबल्याने डहाणू तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार ६०६.८ हेक्टर भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे २० हजार ३१९ शेतकरी बाधित झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र अज्ञानामुळे कागदपत्र सादर न केलेले तसेच शासकीय नोकरदार आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि शेत जमिनीचा ७/१२ नावावर नसलेले अशा प्रकारात मोडणाºया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील डोंगरपट्ट्यात राहणाºया शेतक-यांचा शेती कसण्याच्या प्रकारानुसार वेगळा गट या तालुक्यात असून तो किनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वाढवण, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावामधून खरीप हंगामातील भात लागवडीच्या कामाकरिता चार महिन्यांकरिता भाडेतत्त्वावर बैल घेऊन उखळणी, चिखलणी, धान्य आणि पावळीच्या वाहतुकीच्या कामाकरिता वापर केला जातो. मे अखेर ते जून मध्य या काळात मालकांकडून भाडेतत्त्वावर बैल घेऊन जाण्यास प्रारंभ होतो. हा व्यवहार करताना रोख पैसे, धान्य किंवा पावळी यापैकी कोणत्याही एका प्रकारातील हा व्यवहर केला जातो.किना-यालगत गावांमध्ये गुरे चरणाचा अभाव असल्याने पावसाळ्यात जनावरांच्या चा-याचा निर्माण होणारा प्रश्न या व्यवहारामुळे काही अंशी सुटतो. शिवाय नवीन बैलांना नांगरणी, चिखलणी तसेच बैलगाडी ओढण्याकरिता तयार करणे हे जिकरीचे काम असते. त्यामुळे शेतक-यांना तेथे पाठविल्याने अनौपचारिकरित्या ट्रेनिंग स्कूलमधून विनामूल्य प्रशिक्षित बैल मिळतो. अशा पद्धतीने बैलमालकाला या व्यवहारातून अनेक फायदे होतात. तर डोंगरी भागात चढ-उताराची शेती असल्याने पॉवर टिलर चालविणे तितकेसे सोपे नसते. पावसाळ्याव्यतिरिक्त या भागात चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनत असल्याने भाडोत्री बैलांचा व्यवहार येथील शेतकºयांसाठीही लाभदायक ठरतो.दरम्यान, अवकाळी पावसामुळे खरिपातील भात पिकाच्या हंगामाला नुकसानीचे ग्रहण लागल्याने भात, पावळी अशा सर्वच प्रकारचे उत्पन्न घटले. यावर्षी भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका बैलाची किंमत २ हजार रुपये एवढी होती. मात्र दुष्काळामुळे तेवढे भाडे देणे परवडणारे नसल्याने निम्मे म्हणजे १ हजार रुपये बैलमालकाला देण्याची नामुष्की ओढवली आहे. बैलांना माघारी आणून ते मालकाला सोपवताना त्यांची घालमेल झाली होती. मात्र जिल्ह्यात सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याने आम्हाला समजून घेतले. मात्र नावावर ७/१२ नसल्याने शासनाने समजून न घेतल्याची प्रतिक्रि या भाडेतत्त्वावर बैल घेतलेल्या शेतकºयांनी व्यक्त केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार