शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आदिवासींचे भरलेले ताट हिसकावू नका - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 04:29 IST

आदिवासींना वनपट्टे दिलेत तर त्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे

विक्रमगड : आदिवासींना वनपट्टे दिलेत तर त्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. एकदा जमीन दिली, तर तिचा वापर कसा करायचा हे आदिवासींना ठरवू द्या. त्यांचे भरलेले ताट हिसकावू नका, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली.

आदिवासी समाजाला शासनाने वनपट्टे दिले आहेत. त्या जागेत घर आणि विहिरीसह शेतीपूरक बांधकाम करण्याचा अधिकार आदिवासींना आहे, मात्र वनखात्याचे अधिकारी आदिवासींना वनहक्क कायद्याने मिळालेला अधिकार हिसकावून घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. एवढेच नाही तर अनेकांची शेतघरे तोडून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याच्या तक्रारी राज्यपालांनाप्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्वत: मंगळवारी पालघर जिल्ह्याचा दौरा केला.

पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील डोयापाडा या आदिवासी गावाला भेट देत तेथील ग्रामसभेत उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर जेवणाचे भरलेले ताट आदिवासींच्या पुढ्यातून हिसकावून घेऊ नका, असे सांगत आपल्या शैलीत राज्यपालांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

वयम् सामाजिक संस्थेने वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणी आणि वनखात्याच्या आदिवासीविरोधी कार्यशैलीविरोधात राज्यपालांकडे तक्र ार केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्यक्ष आदिवासी भागाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी पालघर जिल्ह्याला भेट दिल्यानंतर येथील आदिवासी महिलांनी पारंपरिक तारपानृत्य करून त्यांचे स्वागत केले. या वेळी जंगलातील फुलांचा वर्षाव करत औक्षण करण्यात आले. जंगलापासून घेतलेल्या तेल, मध यासह विविध पारंपरिक उत्पादनांची भेट त्यांना देण्यात आली.

वनहक्क दाव्यांबाबत केंद्राशी बोलू

डोयापाडा ग्रामसभेत वनपट्टे कसणाºया आदिवासींना जमीन नावावर झाली तरी कशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या जाचाला सामोरे जावे लागते याचा पाढा राज्यपालांसमोर वाचण्यात आला.त्यावेळी राज्यपालांनी एकदा जमीन दिली तर तिचा वापर करण्याचा अधिकार आदिवासींचा आहे. आदिवासी हे पाकिस्तान अथवा बांगलादेशातून आलेले नाहीत. त्यांचा या जमिनीवर अधिकार आहे. आदिवासींच्या पूर्वजांनी जंगल राखल्यानेच आज पर्यावरणाचे रक्षण झाल्याचे म्हणत ज्यांचे वनहक्क दावे प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर सोडवू आणि आवश्यकता भासल्यास केंद्र आणि राज्य सरकारशी बोलू असे ते म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीVasai Virarवसई विरारCentral Governmentकेंद्र सरकार