शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आदिवासींचे भरलेले ताट हिसकावू नका - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 04:29 IST

आदिवासींना वनपट्टे दिलेत तर त्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे

विक्रमगड : आदिवासींना वनपट्टे दिलेत तर त्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. एकदा जमीन दिली, तर तिचा वापर कसा करायचा हे आदिवासींना ठरवू द्या. त्यांचे भरलेले ताट हिसकावू नका, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली.

आदिवासी समाजाला शासनाने वनपट्टे दिले आहेत. त्या जागेत घर आणि विहिरीसह शेतीपूरक बांधकाम करण्याचा अधिकार आदिवासींना आहे, मात्र वनखात्याचे अधिकारी आदिवासींना वनहक्क कायद्याने मिळालेला अधिकार हिसकावून घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. एवढेच नाही तर अनेकांची शेतघरे तोडून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याच्या तक्रारी राज्यपालांनाप्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्वत: मंगळवारी पालघर जिल्ह्याचा दौरा केला.

पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील डोयापाडा या आदिवासी गावाला भेट देत तेथील ग्रामसभेत उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर जेवणाचे भरलेले ताट आदिवासींच्या पुढ्यातून हिसकावून घेऊ नका, असे सांगत आपल्या शैलीत राज्यपालांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

वयम् सामाजिक संस्थेने वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणी आणि वनखात्याच्या आदिवासीविरोधी कार्यशैलीविरोधात राज्यपालांकडे तक्र ार केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्यक्ष आदिवासी भागाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी पालघर जिल्ह्याला भेट दिल्यानंतर येथील आदिवासी महिलांनी पारंपरिक तारपानृत्य करून त्यांचे स्वागत केले. या वेळी जंगलातील फुलांचा वर्षाव करत औक्षण करण्यात आले. जंगलापासून घेतलेल्या तेल, मध यासह विविध पारंपरिक उत्पादनांची भेट त्यांना देण्यात आली.

वनहक्क दाव्यांबाबत केंद्राशी बोलू

डोयापाडा ग्रामसभेत वनपट्टे कसणाºया आदिवासींना जमीन नावावर झाली तरी कशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या जाचाला सामोरे जावे लागते याचा पाढा राज्यपालांसमोर वाचण्यात आला.त्यावेळी राज्यपालांनी एकदा जमीन दिली तर तिचा वापर करण्याचा अधिकार आदिवासींचा आहे. आदिवासी हे पाकिस्तान अथवा बांगलादेशातून आलेले नाहीत. त्यांचा या जमिनीवर अधिकार आहे. आदिवासींच्या पूर्वजांनी जंगल राखल्यानेच आज पर्यावरणाचे रक्षण झाल्याचे म्हणत ज्यांचे वनहक्क दावे प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर सोडवू आणि आवश्यकता भासल्यास केंद्र आणि राज्य सरकारशी बोलू असे ते म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीVasai Virarवसई विरारCentral Governmentकेंद्र सरकार