शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
2
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
3
"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
4
अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण
5
चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी
6
Sheikh Hasina: 'रक्तपात टाळायचा असेल, तर...'; शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सोडलं पंतप्रधान पद?
7
भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....
8
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
9
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
10
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद; LIC वधारले, तर ITC ला फटका!
11
सर्पदंशाने १९ वेळा मृत्यू झालेला शेतकरी सापडला जिवंत, म्हणाला, आता मी....  
12
केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरा, स्काल्पला होतील भरपूर फायदे
13
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
14
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
15
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
16
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
17
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
18
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
19
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर
20
काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल

विजेअभावी पाणी मिळेना

By admin | Updated: July 2, 2017 05:29 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या असंख्य गावे

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या असंख्य गावे व खेडोपाडयांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून नागरिकांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे धा. डहाणू, तडियाळे, गंगवाडा येथील रहिवासी पंधरा दिवस साठवलेले दूषित पाणी पीत असल्याने येथील त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य वशीदास अंभिरे यांनी केला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील तीस ते चाळीस गावात गेल्या एक महिन्यापासून एक तासही वीजपुरवठा होत नसल्याने येथील लोक कमालीचे संतप्त झाले आहेत. किनारपट्टीवरील गावांत तसेच खेडोपाडयात बाडा पोखरण नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो.सध्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ व उदासीन कारभारामुळे नागरिकांना दररोज शुध्द व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून साखरे गावात वीजेचा सातत्याने लपंडाव होत असल्याने वाणगाव महावितरणकडून त्याची तत्काळ दुरूस्ती होत नाही.वीजेअभावी साखरे धरणाचा जलकुंभ भरला जात नाही. परिणामी ग्रामस्थांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. दरम्यान साखरे येथील जलकुंभ भरण्यासाठी जिल्हा परिषदेने तिथे जनरेटर बसवावे, अशी मागणी संबधित ग्रामपंचायतीने केली आहे. परंतु पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पावसाळयाच्या दिवसांत ग्रामस्थांना पावसाचे दूषित असे पाणी पिण्याची वेळ आली आहे.डायमेकिंग व्यवसायाला लागली घरघरविजेच्या तारा रोजच्या रोज तुटणे ही किरकोळ बाब झाली असून त्याच्या दुरूस्तीसाठी दोन, तीन तास लागणे डिओ, फ्यूज, झंपर उडणे बोईसर येथील होणाऱ्या बिघाडामुळे गाव पाडयात काळोख आहे. वीजेच्या लपंडावाने येथील डायमेकिंग व्यवसाय धोक्यात आले आहेत. डहाणूच्या किनारपट्टीवरील बहुसंख्य गावात घरोघरी डायमेकिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे मोठया प्रमाणातील कुशल अकुशल कामगारांना रोजगार मिळत असतो. परंतु वीजेचाच ठिकाणा नसल्याने हजारो नागरिकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे.