शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

जि. प. शाळेत फक्त आदिवासी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:37 IST

इंग्रजी माध्यमशाळांचे प्रस्थ वाढले ?

- अनिरुद्ध पाटील बोर्डी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसागणिक कमी होत असतांना, या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या मध्ये, नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अल्प उत्पन्न गटातील आदिवासी पालकांचे पाल्य असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मराठी शाळांचे भवितव्य आणि त्यामध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे पटसंख्ये अभावी काय होणार? हा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात चिंतेचा विषय बनला आहे.या तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत शिक्षण विभागात २६ केंद्रात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या सुमारे आडीचशे शाळा असून कमी पटसंख्येमुळे त्यापैकी काही शाळा बंद पडण्यास सुरु वात झाली आहे. ज्या शाळा सुरु आहेत, त्या मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आदिवासी आहेत. हा तालुका आदिवासी बहुल असला, तरी किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये विविध जाती-धर्माचे लोक राहतात. या शैक्षणिक वर्षात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी हे अल्प उत्पन्न गटातील मजुरी करणाºया आदिवासी पालकांचे आहेत. याकरिता चंद्रनगर, चिखले, घोलवड आणि कंक्राडी या केंद्र शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि अनुदानित शाळांतील शिक्षक आदींचे एकही पाल्य नसल्याची बाब उघड झाली आहे.शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रभाव ग्रामीण भागातील पालकांवर पडल्याने त्यांनी मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांकडे पाठ फिरवल्याचे दिसते. तर शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळेतील शिक्षकांनी त्यांचे पाल्य इंग्रजी माध्यम, सीबीएससी बोर्ड तसेच इंटरनॅशनल शाळांमध्ये घातले आहेत. जि. प. शाळांमध्ये मराठी माध्यमातील शिक्षण देण्यापेक्षा इंग्रजी माध्यमाचे शिक्षण तुलनेत दर्जेदार आणि समाजातील उच्चभ्रूतेचे दर्शन घडविणारे असल्याची मानसिकता अशा शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळेच पटसंख्ये अभावी अनुदानीत शाळांवर टाच येऊन त्या बंद पडू लागल्या असून शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. आजची परिस्थिती पाहता शिक्षण क्षेत्रातील अनुदानीत शाळांमध्ये करियर करू पाहणाऱ्यांची अवस्था बिकट होणार आहे.दरम्यान यंदाच्या दहावीच्या निकालात मराठी विषयात नापास विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता, मातृभाषेतील शिक्षणाची अवस्था विचार करायला भाग पाडणारी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांना नवसंजीवनी देण्याकरिता शिक्षणपद्धती, या शाळांतील शैक्षणिक तसेच भौतिक सुविधा आदींबाबत विचार करण्याची गरज असल्याची मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण