शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हागणदारीमुक्तीचा मंत्र्याकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:04 IST

जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर

पालघर : जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर ह्यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर ह्यांनी पुरस्काराचा स्विकारला.जि.प.च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. ‘शौचालय असेल तरच बोला’ असा फलक आपल्या कार्यालयात लावून त्यांनी हागणदारी मुक्तीसाठी आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते. २ आॅक्टोबर २०१७ रोजी पालघर जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा शासनाने केली. त्याबद्दल शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ह्या सन्मानाचा स्वीकार केला.पालघर जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १ लाख ३३ हजार १५२ इतकी होती. २०१४-१५ मध्ये १४ हजार १६३ शौचालय, २०१५-१६ मध्ये १४ हजार १६१ शौचालय, २०१६-१७ मध्ये ७० हजार २६० शौचालये आणि २०१७-१८ मध्ये २४ हजार ०८८ इतक्या शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले. तसेच ९ हजार ०५ कुटुंबे सामुदायीक व सार्वजनिक शौचालयचा वापर करत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ५८ ग्रामपंचायती, २०१६-१७ मध्ये १०३ ग्रामपंचायती आणि २०१७-१८ मध्ये ११ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या.या मोहिमेला दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी विभागाला विशेष प्रयत्न करावे लागले. अजुनही काही वाढीव कुटूंबे तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या पालघर जिल्ह्यात लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी अनके विशेष उपक्र म सातत्याने राबविण्यात भर द्यावा लागणार असला तरी किनारपट्टीवरील गावातून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने तेथे अधिक जोमाने प्रबोधन करावे लागणार आहे. या कार्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पाणी व स्वच्छता विभागच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी प्ररिश्रम घेतले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर