शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्हा हागणदारीमुक्तीचा मंत्र्याकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:04 IST

जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर

पालघर : जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर ह्यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर ह्यांनी पुरस्काराचा स्विकारला.जि.प.च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. ‘शौचालय असेल तरच बोला’ असा फलक आपल्या कार्यालयात लावून त्यांनी हागणदारी मुक्तीसाठी आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते. २ आॅक्टोबर २०१७ रोजी पालघर जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा शासनाने केली. त्याबद्दल शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ह्या सन्मानाचा स्वीकार केला.पालघर जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १ लाख ३३ हजार १५२ इतकी होती. २०१४-१५ मध्ये १४ हजार १६३ शौचालय, २०१५-१६ मध्ये १४ हजार १६१ शौचालय, २०१६-१७ मध्ये ७० हजार २६० शौचालये आणि २०१७-१८ मध्ये २४ हजार ०८८ इतक्या शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले. तसेच ९ हजार ०५ कुटुंबे सामुदायीक व सार्वजनिक शौचालयचा वापर करत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ५८ ग्रामपंचायती, २०१६-१७ मध्ये १०३ ग्रामपंचायती आणि २०१७-१८ मध्ये ११ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या.या मोहिमेला दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी विभागाला विशेष प्रयत्न करावे लागले. अजुनही काही वाढीव कुटूंबे तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या पालघर जिल्ह्यात लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी अनके विशेष उपक्र म सातत्याने राबविण्यात भर द्यावा लागणार असला तरी किनारपट्टीवरील गावातून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने तेथे अधिक जोमाने प्रबोधन करावे लागणार आहे. या कार्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पाणी व स्वच्छता विभागच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी प्ररिश्रम घेतले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर